रावसाहेब दादाराव दानवे
साचा:माहितीचौकट संसद सदस्य साचा:बदल रावसाहेब दादाराव दानवे (इ.स. १९५५ - ) हे महाराष्ट्रातील राजकारणी आहेत. दानवेंचा राजकीय जीवनातला प्रवेश त्यांच्या ग्रामपंचायतीपासून झाला. दानवे यांनी १९८० मध्ये भोकरदन पंचायत समितीची सभापतिपदाची निवडणूक जिंकली व पुढे १९९० व १९९५ मध्ये ते विधान परिषदेवर निवडून आले. नंतर १९९९, २००४ व २००९ मध्ये भाजपच्या तिकिटावर ते लोकसभेवरही निवडून गेले.
रामेश्वर सहकारी साखर कारखाना उभारल्यानंतर आतापर्यंत दानवे यांनी तो स्वतःच्या ताब्यात ठेवला; भोकरदन तालुक्यात शैक्षणिक संस्थांचे जाळे निर्माण केले. भोकरदन व जाफराबाद पंचायत समित्यांवर नेहमीच अधिपत्य ठेवणाऱ्या दानवे यांचे जालना जिल्हा परिषदेवरही वर्चस्व राहिले आहे. जालना जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्षपद त्यांच्याकडेच राहिले. सध्या ते त्या बँकेचे संचालक आहेत. संघटनाकौशल्याशिवाय त्यांना एवढे राजकीय व सहकार क्षेत्रातील यश मिळाले, हे विशेष.[१]