ॲडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्स ऑफ दि ईस्ट इंडिया कंपनी
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १०:१९, १ मे २०२२चे आवर्तन
ॲडमिनीस्ट्रेशन अँड फायनान्स ऑफ दि ईस्ट इंडिया कंपनी (इंग्रजी: Administration and Finance of the East India Company; मराठी: ईस्ट इंडिया कंपनीचे प्रशासन आणि अर्थनीती) हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला एक शोधनिबंध आहे, जो त्यांनी एम.ए.च्या पदवीसाठी अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठाला इ.स १९१५ मध्ये सादर केला होता. हा ४२ पृष्ठांचा शोधनिबंध होता. डॉ. बाबासाहेबांनी इ.स.१७१२ ते १८५८ या कालखंडात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा राज्यकारभार आणि वित्त या संदर्भातील धोरणांच्या बदलाचा ऐतिहासिक आढावा घेतला आहे. ईस्ट इंडिया कंपनीची आर्थिक धोरणे भारतीयांच्या हालअप्तेष्टांना कसे कारणीभूत ठरले याचे विदारक आर्थिक स्थितीचे स्वरुप या प्रबंधात मांडले आहे.[१]
हे सुद्धा पहा
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखन