<?xml version="1.0"?>
<feed xmlns="http://www.w3.org/2005/Atom" xml:lang="mr">
	<id>https://mr.bharatpedia.org/w/api.php?action=feedcontributions&amp;feedformat=atom&amp;user=2409%3A4042%3A2D17%3ADD9F%3ABA20%3AABBC%3A1924%3AB2CC</id>
	<title>मराठीपिडिया - User contributions [mr]</title>
	<link rel="self" type="application/atom+xml" href="https://mr.bharatpedia.org/w/api.php?action=feedcontributions&amp;feedformat=atom&amp;user=2409%3A4042%3A2D17%3ADD9F%3ABA20%3AABBC%3A1924%3AB2CC"/>
	<link rel="alternate" type="text/html" href="https://mr.bharatpedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8/2409:4042:2D17:DD9F:BA20:ABBC:1924:B2CC"/>
	<updated>2026-08-25T11:08:07Z</updated>
	<subtitle>User contributions</subtitle>
	<generator>MediaWiki 1.43.6</generator>
	<entry>
		<id>https://mr.bharatpedia.org/w/index.php?title=%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%9C_%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE&amp;diff=3794</id>
		<title>रामशेज किल्ला</title>
		<link rel="alternate" type="text/html" href="https://mr.bharatpedia.org/w/index.php?title=%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%9C_%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE&amp;diff=3794"/>
		<updated>2022-05-01T11:33:47Z</updated>

		<summary type="html">&lt;p&gt;2409:4042:2D17:DD9F:BA20:ABBC:1924:B2CC: &lt;/p&gt;
&lt;hr /&gt;
&lt;div&gt;{{माहितीचौकट किल्ला&lt;br /&gt;
| नाव = रामशेज&lt;br /&gt;
|चित्र = &lt;br /&gt;
|चित्रशीर्षक = &lt;br /&gt;
|चित्ररुंदी = &lt;br /&gt;
|नकाशा = Maharashtra&lt;br /&gt;
| lat_d =  | lat_m =  | lat_s =  | lat_NS = &lt;br /&gt;
| long_d =  | long_m =  | long_s =  | long_EW = &lt;br /&gt;
| उंची = ३,२०० फूट&lt;br /&gt;
| प्रकार = गिरिदुर्ग&lt;br /&gt;
| श्रेणी = सोपी&lt;br /&gt;
| ठिकाण = [[नाशिक|महाराष्ट्र]], [[भारत]]&lt;br /&gt;
| डोंगररांग = &lt;br /&gt;
| अवस्था = व्यवस्थित&lt;br /&gt;
| गाव = &lt;br /&gt;
| स्थापना = &lt;br /&gt;
| अक्षांश = &lt;br /&gt;
| रेखांश = &lt;br /&gt;
}}&lt;br /&gt;
&#039;&#039;&#039;रामशेज किल्ला&#039;&#039;&#039; हा [[नाशिक]] [[शहर]]ाच्या [[उत्तर]]ला १४ कि.मी. अंतरावर आहे. नाशिकजवळच्या [[दिंडोरी]] पासून हा १० मैलाच्या अंतरावर आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
हा किल्ला मराठ्यांनी साडेसहा वर्ष मुघलांविरुद्ध लढवला होता. ह्या किल्ल्याबद्दल अशी आख्यायिका सांगतली जाते की येथे श्रीराम जेव्हा श्रीलंकेकडे जात होते तेव्हा येथे त्यांनी काही काळ वास्तव्य केले होते.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
श्रीराम या किल्ल्यावर विश्रांतीला जायचे, आणि तिथे त्यांची शेज आहे म्हणून या किल्ल्याला रामशेज असे नाव पडले. [[सिंहगड]], [[प्रतापगड]] असे सह्याद्रीच्या रांगेतील बरेचसे किल्ले घनदाट जंगलात आहेत, डोंगर  दऱ्यांमध्ये वसलेले आहेत. परंतु रामशेज हा किल्ला एका सपाट आणि मोकळ्या मैदानावर आहे.रामशेज किल्ल्याजवळचा एकमेव किल्ला म्हणजे त्र्यंबकगड, परंतु तो देखील ८ कोस अंतरावर होता. ही सर्व परिस्थिती पाहता किल्ला अगदी एकाकी होता.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==मार्ग==&lt;br /&gt;
गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या [[नाशिक]]-[[पेठ]] मार्गावरील [[आशेवाडी]] ह्या [[गाव]]ातून किल्ल्यावर जायला मळलेली वाट आहे. तासाभरात किल्ल्यावर पोहोचता येते. किल्ल्याचा विस्तार प्रचंड असला तरी पाण्याचे टाके, स्थानिक देव-देवतांची [[मंदिर]]े आणि पडझड झालेली तटबंदी ह्याखेरीज किल्ल्यावर फारसे बघण्यासारखे काही नाही. हा किल्ला मराठ्यांनी [[मुघल]] सैन्याला केलेल्या चिवट प्रतिकाराबद्दल प्रसिद्ध आहे.&amp;lt;ref&amp;gt;[http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2756881.cms महाराष्ट्र टाइम्स मधील लेख]&amp;lt;/ref&amp;gt;&amp;lt;ref&amp;gt;[http://loksatta.com/index.php?option=com_content&amp;amp;view=article&amp;amp;id=71580:2010-05-21-14-50-16&amp;amp;Itemid=1 लोकसत्तेतील लेख]{{मृत दुवा}}&amp;lt;/ref&amp;gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==इतिहास==&lt;br /&gt;
[[छत्रपती शिवाजी महाराज]]ांच्या निधनानंतर [[औरंगजेब]]ाने [[महाराष्ट्र]] जिंकायचा चंग बांधला होता. मोठ्या सैन्यबळानिशी तो [[इ.स. १६८२]]ला महाराष्ट्रावर चाल करून आला. आपल्या शहाबुद्दीन फिरोजजंग ह्या सरदाराला त्याने नाशिक प्रांतातील किल्ले काबीज करायची आज्ञा दिली. फिरोजजंगाने रामशेजपासून सुरुवात केली. किल्ल्यावर (अज्ञात.. किल्लेदारावरून बरेच मतभेद आहेत)   नावाचे किल्लेदार होते. ते धाडसी, हट्टेकट्टे आणि पराक्रमी होते. ते रामशेजच्या तटावरून फिरत राहायचे. दिवसा आणि रात्रीही. ते कधी झोपायचे हेच कोणाला माहित नव्हते. किल्ल्यावर तोफा नव्हत्या.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
शहाबुद्दीन फिरोजजंग ३५ ते ४० हजार फौजफाट्यासह रामशेज किल्ल्यावर चाल करून गेला तेव्हा किल्लेदार (अज्ञात.. किल्लेदारावरून बरेच मतभेद आहेत) ५००-६०० मावळ्यांसोबत गडावर होता. मुघलांची अपेक्षा ही होती की एका फटक्यात आपण हा किल्ला जिंकू. पण मराठ्यांच्या गनिमी काव्याने त्याच्या सैन्याला पुरते जेरीस आणले. गडावरील दगडगोट्यांच्या वर्षावाने मुघल सैन्याचे स्वागत झाले. गडावर असलेली रसद फारच तुटपुंजी होती. अशा वेळी रात्रीच्या अंधारात मावळे मुघल सैन्यातून दारुगोळा, शस्त्रास्त्रे आणि दाणागोटा गडावर पळवून आणीत.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
संभाजी राजांनी स्वतः लक्ष घालून प्रत्येक किल्ल्यावर मुबलक प्रमाणात दारुगोळा उपलब्ध करून ठेवला होता. किल्ल्यावरच्या किल्लेदाराने आणि मावळ्यांनी जनारावरांचे कातडे लावून लाकडाच्या तोफा बनवल्या. आणि किल्ल्यावरून खाली तोफगोळ्यांचा मारा सुरू केला. या आक्रमणाने शहाबुद्दीन खान पार गांगरून गेला. ५ महिने झाले पण तरीही किल्ल्या काही जिंकता आला नाही.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
मोगलांचे तोफगोळे किल्ल्यावर पोहोचत नव्हते, पण किल्ला तर जिंकायचा होता. मग त्याने आपल्या सैनिकांना आजूबाजूच्या जंगलातील झाडे तोडायला सांगितली. सगळी लाकडे जमा केली. आणि किल्ल्याच्या उंचीचा ८०-९० तोफा आणि 200 सैनिक बसतील एवढा मोठा लाकडी बुरूज बनवला. (याला लाकडी दमदामा असेही म्हणतात). या लाकडी बुरुजांवरून मोगल सैनिक किल्ल्यावर तोफांचा मारा करू लागले. मराठेसुद्धा या लाकडी बुरुजांवर तोफगोळे डागत होते. मोठे घनघोर युद्ध चालू होते. मराठे मागे हटायला तयार नव्हते. शहाबुद्दीनच्या हाती यश येत नव्हते.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
दोन वर्षांनंतरही रामशेज किल्ला अजिंक्यच राहिला.&lt;br /&gt;
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी [https://creativesankey.blogspot.com/2019/12/Ramshej-fort-killa-information.html रामसेज किल्ला पूर्ण इतिहास] विसीट करा&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==फतेह खान==&lt;br /&gt;
मग मात्र औरंगजेबाने शहाबुद्दीनला परत बोलावून घेतले. त्याने रामशेजची मोहीम फतेह खान नावाच्या जिगरबाज सरदारावर सोपविली.  मग फतेहखान २० हजारीची फौज घेऊन आला. आणि त्याने रामशेजवर जोरदार आक्रमण चढवले. पण तरीही मराठे काही माघार घेईनात. मोगल सेना किल्ल्याच्या जरा जरी जवळ आली तरी किल्ल्यावरून मावळ्यांच्या गोफणीतून धडाधड दगड गोटे सुटायचे, हे दगड इतके जोरात यायचे की बरेचसे सैनिक जागेवरच ठार  व्हायचे. त्या फतेहखानाला मावळे तसूभरहि पुढे सरकू देईनात. या मरहट्ट्यांनी फतेहखानच्या सैन्याला सळो की पळो करून सोडले. इतका खटाटोप करूनही किल्ला काही शरण येईना. फतेहखानच्या हाती फक्त निराशा, अपमान आणि माघारच आली.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
फतेहखानाच्या तोफांचे गोळे शक्यतो किल्ल्यावर पोहोचत नव्हते, पण त्यातूनही एखादा तोफगोळा किल्ल्यापर्यंत पोहोचत असे. त्या तोफ्याच्या गोळ्यामुळे किल्ल्याच्या तटबंदीची किंवा एखाद्या बुरुंजाची पडझड होत असे. ते पाहून फतेह फार खुश व्हायचा. पण रात्र सरून सकाळ झाली की ती पडझड झालेली तटबंदी किंवा बुरूज परत बांधून झालेला असायचा. ते  दृश्य पाहून फतेहखान आश्चर्यचकित व्हायचा मग मात्र त्याचा राग अनावर होत होता. किल्ल्यावरचे मावळे, लहान मोठी सगळी माणसे अपार कष्ट करून एका रात्रीतच ही पडलेली तटबंदी पुन्हा बांधून काढायचे. परंतु फतेहखानाला मात्र वेगळाच संशय यायला लागला, त्याला वाटू लागले की या मरहट्ट्यानां जादूटोणा येतो, भुताटकी येते, आणि म्हणूनच संध्याकाळी पडलेली तटबंदी सकाळपर्यंत परत आहे तशी सुस्थितीत असायची.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
अनेक महिने सरले, हजारो मुगल सैनिक मारले गेले, खूपसारा दारुगोळा हकनाक वाया गेला, तरीही किल्ला हाती यायचे नाव नव्हते. मग एके दिवशी फतेहखानच्या एका सरदाराने फतेहखानाला सांगितले की युद्ध तर करून बघितले, आता एका मांत्रिकाला बोलावून बघा. फतेहखानला हे पटले नाही, पण किल्ला जिंकण्यासाठी तो काहीही करायला तयार होता. मग त्याने आपल्या सरदाराकडून मांत्रिकाला बोलावून घेतले. मांत्रिक आला, तो फतेहखानला म्हणाला, – -हुजूर, चिंता मत करो, मैने तो भूत प्रेत भी वश किये है, ये मरहट्टे क्या चीज है? आप बस मुझे एक सोने का नाग दे दिजीये बाकी मी संभाल लेता हूॅं –  मग त्या मांत्रिकाने मागितल्याप्रमाणे त्याला सोन्याचा नाग बनवून देण्यात आला.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
मांत्रिकाने तो सोन्याचा नाग आपल्या छातीजवळ धरला आणि किल्ल्याच्या मागच्या बाजूने किल्ल्याजवळ जायला निघाला. मांत्रिक पुढे आणि फतेहखानाचे  सैन्य त्याच्या मागे. मांत्रिक किल्ल्याचे दिशेने पुढे सरकत होता. तो जसा किल्ल्याच्या जवळ आला तसा किल्ल्यावरून गोफणीचा एक दगड जोरात मांत्रिकाच्या छाताडाला जोरात लागला.मांत्रिक डोळे पांढरे करून पडला. मांत्रिक तिसरीकडे, सोन्याच्या नांग दुसरीकडे , फत्तेखान पळत मागे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
फतेहखानने अजून एक डाव आखला, त्याने मध्य रात्रीच्या वेळी किल्ल्याच्या मुख्य दरवाज्याच्या दिशेने तोफांचा जोरदार मारा सुरू केला. या तोफांचा आवाज खूप जबरदस्त होता. त्या आवाजाने किल्ल्यावरचे सगळे मावळे मुख्य बुरुंजाजवळ येऊन फतेहखानची करामत बघत होते. पण किल्ल्यावर एक पण तोफ गोळा पोहोचत नाही हे पाहून त्यांना हसू येत होते. जवळपास सगळ्या तोफा किल्ल्याच्या दिशेने आग ओकत होत्या. पण फतेहखान मात्र त्या तोफांच्या जवळ नव्हताच. कारण तो होता एका वेगळ्याच बेताच्या तयारीत. त्याने आपल्या सोबतीला काही निवडक मोगल सैनिक घेतले आणि तो निघाला किल्ल्याच्या मागच्या दिशेने. दबक्या पावलांनी, बिलकुल आवाज न करता. किल्ल्याच्या मागच्या दिशेला पोहोचल्यावर फतेहखानाने आपल्या सैनिकांना आदेश दिला, – -उपरवाले का नाम लो और उपर किले पार चढो, अगर कामयाब हो जोगे तो तुम्हारा नाम होगा- – वर जायला कोणी तयार होत नव्हते, पण फतेहखान सुद्धा माघार घ्यायला तयार नव्हता, मग त्यातले काही सैनिक जिवावर उदार होवून किल्ल्यावर चढाई करायला तयार झाले. अंधाराचा फायदा घेऊन झाडाझुडपाच्या साहाय्याने ते हळूहळू वर चढू लागले. त्यांनतर एका मागोमाग एक असे बरेचसे सैनिक वर जाऊ लागले.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
एकंदरीत फतेहखानाचा बेत असा होता की, किल्ल्यावरच्या मावळ्यांना पुढच्या बाजूने तोफगोळ्यांमध्ये गुंतवून ठेवायचे आणि मग काही निवडक मोगल सैनिकांना किल्ल्यावर पोहोचवायचे. मग दोरखंड लावून खाली उरलेले सगळ्या सैनिकांनी किल्ल्यावर जायचे आणि किल्ला काबीज करायचा. ठरल्याप्रमाणे किल्ल्याच्या मागे फतेहखानाचा बेत किल्ल्याच्या मागच्या बाजून चालू होता. किल्ल्यावर किल्लेदार (अज्ञात.. किल्लेदारावरून बरेच मतभेद आहेत)  पुढच्या बाजूला मुख्य बुरुजाजवळ होते. ते आणि त्यांचे सर्व मावळे फतेहखानच्या तोफांच्या करामती बघत होते. पण ते संभाजी राजांचे पराक्रमी सरदार होते, अशाही परिस्थितीत गाफील राहणारे ते नव्हते. २ गोष्टी त्यांच्या लक्षात आल्या, त्या म्हणजे एक तर आज अचानकच फतेहखानाने रात्रीचा मारा सुरू केला आहे आणि दुसरे म्हणजे तोफांचे एकपण गोळा किल्ल्याच्या डोंगरावर पडत होते, याचा अर्थ कुठेतरी पाणी मुरते आहे. मग ते तडक घोड्यावर बसले आणि तडक निघाले, आपल्या सोबतीला त्यांनी २०० मावळे घेतले, त्यांनी स्वतःहून किल्ल्याच्या सर्व बाजूने पहारे देण्यास सुरुवात केली. ज्या वेळी ते किल्ल्याच्या मागच्या बाजूला आले तेव्हा त्यांना रात्रीच्या अंधारात चाललेला फतेहखानचा डाव समाजाला, तसे ते आणि त्यांचे मावळे बुरुजावर दबा धरून मोगल सैनिकांवर पाळत ठेवून बसले.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
वर चढणाऱ्या मोगल सैनिकांपैकी एक दोघे तटावर पोहोचले, ते आणखी वर येणार इतक्यात मावळ्यांच्या गोफणीत दगड धरले गेले आणि सप्प करून गोफण चालली, त्या मोगल सैनिकाच्या डोक्यात इतक्या जोरात धोंडा बसला की तो घायाळ झाला आणि गडावरून खाली पडला. मग मात्र सगळे मावळे धावले तटबंदीच्या जवळ. त्यांनी वर चढणाऱ्या मोगलांवर गोफणीने दगडांचा जोरदार मारा केला, किल्ल्यावरच्या मोठ मोठाल्या दगडी शिळा ढकलून दिल्या. इतकेच नव्हे तर तेलात बुडवलेली कपडे आणि पोती पेटवली आणि त्या सैनिकाच्या अंगावर फेकून दिली. अचानक झालेल्या या मृत्युतांडवामुळे सगळे मोगल सैनिक जिवाच्या आकांताने ओरडू लागले. काही सैनिक दगडांनी घायाळ होऊन मेले तर काही पेटत्या कापडांनी भाजून मेले, आणि उरलेल्या सैनिकांनी त्या उंच डोंगरावरून उड्या मारल्या. ते पाहून किल्ल्याच्या खाली उभे असलेले फतेहखान आणि त्याचे मोगल सैन्य जीव मुठीत धरून पळू लागले. गनीम (शत्रू) पळून जाताना बघून किल्ल्यावर मावळे आनंदित झाले, आणि जोर जोरात आरोळ्या देऊ लागले, – -हर हर महादेव, जय शिवाजी, जय शंभूराजे!!!!- –&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==कासम खान==&lt;br /&gt;
औरंगजेबाने फतेह खानाला परत बोलावून घेतले. आणि कासम खानला पाठवले. कासाम खान नव्या दमाची फौज घेऊन रामशेज वर चालून आला. कासम खान ने रामशेज किल्ल्याभोवती एकदम कडेकोट पहारे लावले. किल्ल्यावर जाण्यासाठी थोडीसुद्धा वाट मोकळी ठेवली नाही. किल्ल्यावर दारुगोळा आणि अन्न धान्य पोहोचवण्याच्या सगळ्या वाट त्याने रोखून धरल्या होत्या. किल्ल्यापासून काही कोसावर संभाजी महाराजांनी पाठवलेले सरदार रूपजी भोसले, मानाजी मोरे रसद घेऊन तयार होते. पण कासमखानच्या त्या कडक बंदोवस्तातून आणि कडेकोट पहाऱ्यातून त्यांना गडावर रसद पोहोचवता येत नव्हती. किल्ल्यावरचे अन्न धान्य संपत आले होते. गडावरील मावळ्यांवर वाईट दिवस आले होते, अन्नावाचून सगळ्यांचे हालहाल होत होते.  ही परीस्थिती पाहता ४ ते ५ दिवसात किल्ला कासमखानच्या हातात जाईल असे वाटत होते. पण निसर्ग मराठ्यांच्या मदतीला धावून आला. खूप जोराचा पाऊस पडला. हा पाऊस सलग २ दिवस पडत होता. या पावसामुळे किल्ल्याच्या सर्व परिसरात चिखल आणि पाणी झाले होते. किल्ल्याच्या एका बाजूला तर चिखल पाण्यामुळे मेलेल्या जनावारचे मांस सडू लागले. त्यामुळे सर्वत्र खूप दुर्गंधी पसरली होती. इतका घाण वास येऊ लागला तो बिलकुल सहन होत नव्हता. त्या वासाने माणसे आणि जनावरे उलट्या करू लागले. मोगल सैनिकांना पहारा देणे खूपच अवघड होऊ लागले. मग कासमखानाने त्या परिसरातला पहारा थोडा सैल केला. एका दिवसासाठी तेथील सैनिकांना दुसरीकडे पहारा देण्यास सांगितले.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
तो दिवस सरला, रात्र झाली. रात्रही सरली. दुसऱ्या दिवशी सकाळी पहारे परत पूर्ववत करण्यात आले. तेवढ्यात कासमखानाने किल्ल्यावर पहिले आणि त्याच्या लक्षात आले की, किल्ल्यावरील मावळे ताजेतवाने दिसत होते, त्यांच्या जिवात जीव आला होता. इतकेच नव्हे तर तिथे काही नवीन मावळेहीहि दिसत होते. कासम खान चक्रावून गेला. मग त्याला त्याची चूक लक्षात आली. आदल्या रात्री दुर्गंधीमुळे त्याने पहारे क्मी केले होते, त्याच्याच फायदा घेऊन दबा धरून बसलेली रूपजी आणि मानाजी यांची फौज नवीन रसद, अन्न धान्य आणि दारुगोळा किल्ल्यावर पोहोचवून आले होते. कासमखानाला कळून चुकले की रामशेज काबीज करणे हे फक्त स्वप्नच राहणार आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
दिवसा किल्ल्यावरून मराठे मोगलांवर मारा करायचे आणि रात्री संभाजी राजांनी पाठवलेली फौज मोगलांवर हल्ला करायची.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
किल्ल्याभोवती वेढा टाकलेल्या सैन्यावर आजूबाजूच्या झाडी मधून अचानक हल्ले व्हायचे. मोगालंना सळो की पळो करून सोडले होते.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
कासमखान देखील किल्ला जिंकू शकला नाही. तब्बल साडेसहा वर्षे हा किल्ला मराठ्यांनी लढवत ठेवला होता. आणि रामशेज शेवटपर्यंत अजिंक्य राहिला.&lt;br /&gt;
}}&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==संदर्भ==&lt;br /&gt;
&amp;lt;references /&amp;gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
{{विस्तार-किल्ला}}&lt;br /&gt;
{{महाराष्ट्रातील किल्ले}}&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
[[वर्ग:महाराष्ट्रातील किल्ले]]&lt;br /&gt;
[[वर्ग:नाशिक जिल्हा]]&lt;/div&gt;</summary>
		<author><name>2409:4042:2D17:DD9F:BA20:ABBC:1924:B2CC</name></author>
	</entry>
	<entry>
		<id>https://mr.bharatpedia.org/w/index.php?title=%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80_%E0%A4%AD%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%87&amp;diff=1378</id>
		<title>संभाजी भोसले</title>
		<link rel="alternate" type="text/html" href="https://mr.bharatpedia.org/w/index.php?title=%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80_%E0%A4%AD%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%87&amp;diff=1378"/>
		<updated>2022-05-01T11:14:00Z</updated>

		<summary type="html">&lt;p&gt;2409:4042:2D17:DD9F:BA20:ABBC:1924:B2CC: &lt;/p&gt;
&lt;hr /&gt;
&lt;div&gt;{{बदल}}&lt;br /&gt;
{{संदर्भहीन लेख}}&lt;br /&gt;
{{गल्लत|छत्रपती संभाजी शहाजी भोसले}}&lt;br /&gt;
{{माहितीचौकट राज्याधिकारी&lt;br /&gt;
| नाव =छत्रपती संभाजी महाराज&lt;br /&gt;
| पदवी = [[छत्रपती]]&lt;br /&gt;
| चित्र = &lt;br /&gt;
| चित्र_शीर्षक = &lt;br /&gt;
| राजध्वज_चित्र = Flag_of_the_Maratha_Empire.svg| राजध्वज_चित्र_शीर्षक = भगवा&lt;br /&gt;
| राजचिन्ह_चित्र = &lt;br /&gt;
| राजचिन्ह_चित्र_शीर्षक = &lt;br /&gt;
| राज्य_काळ = [[जानेवारी १६]], [[इ.स. १६८१]] – [[मार्च ११]], [[इ.स. १६८९]]&lt;br /&gt;
| राज्यारोहण = &lt;br /&gt;
| राज्याभिषेक = [[जानेवारी १६]], [[इ.स. १६८१]]&lt;br /&gt;
| राज्यव्याप्ती = [[पश्चिम महाराष्ट्र]], [[कोकण]],&amp;lt;br /&amp;gt; [[सह्याद्री]] डॊंगररांगांपासून [[नागपूर]]पर्यंत &amp;lt;br /&amp;gt;आणि&amp;lt;br /&amp;gt; [[उत्तर महाराष्ट्र]], [[खानदेश]]ापासून ते &amp;lt;br /&amp;gt;[[दक्षिण भारत]]ात [[तंजावर]] पर्यंत&lt;br /&gt;
| राजधानी = [[रायगड]]&lt;br /&gt;
| पूर्ण_नाव = छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले&lt;br /&gt;
| जन्म_दिनांक = १४ मे,इ.स. १६५७&lt;br /&gt;
| जन्म_स्थान = [[पुरंदर]] किल्ला, [[पुणे जिल्हा]], [[महाराष्ट्र]]&lt;br /&gt;
| मृत्यू_दिनांक = [[मार्च ११|११ मार्च]], [[इ.स. १६८९]]&lt;br /&gt;
| मृत्यू_स्थान = [[तुळापूर]] , [[महाराष्ट्र]] (समाधी: [[वढू]], [[महाराष्ट्र]])&lt;br /&gt;
| पूर्वाधिकारी = [[छत्रपती शिवाजी महाराज]]&lt;br /&gt;
| राजपद_वारस = &lt;br /&gt;
| राजपद_वारस_प्रकार = &lt;br /&gt;
| उत्तराधिकारी = [[राजाराम महाराज]]&lt;br /&gt;
| वडील = [[छत्रपती शिवाजी महाराज]]&lt;br /&gt;
| आई = [[सईबाई]]&lt;br /&gt;
| पत्नी = [[येसूबाई] &lt;br /&gt;
| संतती = [[पहिले शाहू महाराज]], भवानीबाई&lt;br /&gt;
| राजवंश = [[भोसले]]&lt;br /&gt;
| राजगीत = &lt;br /&gt;
| राजब्रीदवाक्य = {{!}}{{!}}श्री शंभो: शिवजातस्य मुद्रा व्यविव राजते यडंमतस्ये विनोलेशा वद्य ते वस्य लोपही&lt;br /&gt;
| राजचलन = [[होन]] व [[शिवराई]] &lt;br /&gt;
| तळटिपा = &lt;br /&gt;
|}}&lt;br /&gt;
&#039;&#039;&#039;छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले&#039;&#039;&#039; (जन्म : [[पुरंदर]] किल्ला, १४  मे १६५७;  - [[तुळापूर]], [[महाराष्ट्र]]), संभाजी महाराज हे छत्रपती [[शिवाजी महाराज]] आणि [[सईबाई]] यांचे थोरले चिरंजीव आणि [[मराठा साम्राज्य]]ाचे दुसरे छत्रपती होते.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
महाराष्ट्राचे आराध्य असणाऱ्या देवाचे चिरंजीव,ज्यांना शिवरायांचा छावा म्हणून देखील संबोधल जातं असे युगधुरंदर महाराज म्हणजेच छत्रपती संभाजी राजे भोसले होय.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
== बालपण ==&lt;br /&gt;
छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म [[१४ मे]] [[इ.स. १६५७]] रोजी [[किल्ले पुरंदर]] येथे झाला. राजपुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
संभाजी महाराजांच्या आई, महाराणी [[सईबाईंचे]] निधन महाराज लहान असतानाच झाले. त्यानंतर [[पुणे|पुण्याजवळील]] [[कापूरहोळ]] गावची [[धाराऊ पाटील गाडे]] ही कुणब्याची स्त्री त्यांची &#039;&#039;दूध आई&#039;&#039; बनली. संभाजीं महाराजांचा सांभाळ त्यांची आज्जी राजमाता [[जिजाबाई]] यांनी केला.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
त्यांच्या सावत्र आई, [[पुतळाबाई]]&amp;lt;ref&amp;gt;{{स्रोत पुस्तक|title=शापित राजहंस - (लेखक) अनंत तिबिले|last=|first=|publisher=|year=|isbn=|location=|pages=}}&amp;lt;/ref&amp;gt; यांनी देखील त्यांच्यावर खूप माया केली. मात्र त्यांंची सावत्र आई [[सोयराबाई भोसले|सोयराबाई]]&amp;lt;ref&amp;gt;{{स्रोत पुस्तक|title=संभाजी|last=पाटील|first=विश्वास|publisher=मेहता पब्लिशिंग हाऊस|year=February 2018 16th edition|isbn=|location=Pune|pages=Whole book}}&amp;lt;/ref&amp;gt; यांनी संंभाजी महाराजांना पोरकेेेपणाने वागवले तसेच संभाजी महाराजांच्या राजकीय कारकिर्दीत ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न केला.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
अनेक ऐतिहासिक नोंदींप्रमाणे संभाजी महाराज अत्यंत देखणे आणि शूर होते.  तसेच ते अनेक भाषांत विद्याविशारद व अत्यंत धुरंदर राजकारणी होते. राजकारणातील बारकावे त्यांनी भराभर आत्मसात केले होते. मुघल दरबारातील घडामोडी आणि राजकारण त्यांना लहान वयातच कळले तर त्याचा त्यांना भविष्यात उपयोग होईल या विचाराने शिवाजी महाराजांनी त्यांना [[आग्रा भेट]]ीच्या वेळी बरोबर नेले. त्यावेळी संभाजीराजे ९ वर्षाचे होते. शिवाजी महाराज  कैदेतून निसटल्यानंतर स्वराज्यापर्यंतची धावपळ संभाजी राजांनी सोसू नये आणि त्यामुळे त्यांना काही काळ सुरक्षित ठिकाणी ठेवणे गरजेचे होते. त्यामुळे शिवाजी महाराजांनी त्यांना [[मोरोपंत पिंगळे|मोरोपंत पेशव्यांच्या]] मेहुण्याच्या घरी [[मथुरा|मथुरेला]] ठेवले. मुघली सैनिकांचा संभाजी राजांच्या मागचा ससेमिरा थांबवण्याच्या उद्देशाने शिवाजी महाराजांनी संभाजीराजांचे निधन झाल्याची अफवा पसरवून दिली. ते महाराष्ट्रात पोहोचल्यानंतर काही काळाने संभाजी महाराज सुखरूपपणे स्वराज्यात येऊन पोहोचले.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
== तारुण्य ==&lt;br /&gt;
[[इ.स. १६७४]] मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तोपर्यंत संभाजीराजे राजकारणातील लहान बारकावे आणि रणांगणातील डावपेचांमध्ये तरबेज झाले होते. त्यांच्या विनम्र स्वभावाने राज्याभिषेकासाठी [[रायगड]]ावर आलेल्या प्रतिनिधींना त्यांनी आपलेसे केले.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर १२ दिवसात जिजाऊंचे निधन झाले. त्यानंतर संभाजीराजांकडे मायेने लक्ष देणारे कोणी राहिले नाही. [[शिवाजी महाराज]] स्वराज्याच्या राजकारणात आणि रणांगणावर गुंतले होते.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
तरुण संभाजीराजांचे शिवाजी महाराजांच्या दरबारातील अनुभवी मानकऱ्यांशी अनेकदा मतभेद होऊ लागले. संभाजी महाराजांचा  अमात्य अण्णाजी दत्तोंच्या कारभाराला सक्त विरोध होता. शिवाजी महाराजांनी अण्णाजी हे अनुभवी आणि कुशल प्रशासक असल्यामुळे त्यांच्या भ्रष्ट कारभाराकडे अनेकदा दुर्लक्ष केले. पण संभाजी महाराजांना ते मान्य होणे कठीण होते. अण्णाजी दत्तो आणि इतर अनुभवी मानकरी संभाजी महाराजांच्या विरोधात गेले.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
दरबारातील काही मानकरी संभाजी महाराजांना अपमानास्पद वागणूक देऊ लागले; हे केवळ अण्णाजी दत्तोंच्या सांगण्यावरून केले. त्यांच्या विरोधामुळे त्यांना शिवाजी महाराजांबरोबर दक्षिण हिंदुस्थानच्या मोहिमेवर जाता आले नाही. तसेच शिवाजी महाराजांच्या अनुपस्थितीत संभाजी महाराजांचे हुकूम पाळण्यास [[अष्टप्रधानमंडळ]]ाने नकार दिला. त्यामुळे शिवाजी महाराजांना कोकणातील [[शृंगारपूर]]चे सुभेदार म्हणून संभाजी महाराजांना पाठवावे लागले.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
== मुद्रा व दानपत्र ==&lt;br /&gt;
&#039;&#039;&#039;श्री शंभो: शिवजातस्य मुद्राद्यौरिव राजते |&#039;&#039;&#039;&lt;br /&gt;
&#039;&#039;&#039;यडंमतस्ये विनोलेशा वद्य से वस्य लोपही ||&#039;&#039;&#039;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&#039;&#039;&#039;अर्थ&#039;&#039;&#039;: छत्रपती शिवरायांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांची ही राजमुद्रा जणू काही स्वर्गीय तेजाने तळपत आहे, आकाशाप्रमाणे अमर्याद आहे. या राजमुद्रेच्या आश्रयात प्रत्येक माणूस, प्रत्येक प्राणिमात्र महाराजांच्या छत्रछायेखाली असेल. छत्रपतींच्या या राजमुद्रेपेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
संभाजी महाराजांना साधुसंतांबद्दल आदरभाव होता. ज्येष्ठ मांत्रिक कुडाळ ग्रामनिवासी नामदेवभट्टपुत्र बाकरेशास्त्री यांना करून दिलेल्या संस्कृतमधील दानपत्रावरून त्यांचा आदरभाव कळतो. छत्रपती संभाजी महाराजांना राजपद महत्&amp;amp;zwnj;प्रयासाने प्राप्त झाले होते. त्यांनी राजपद प्राप्तीसाठी नवस केला होता आणि त्यांना राज्याधिकार मिळाल्यानंतर तो नवस फेडण्याच्या इच्छेने त्यांनी नामदेवभट्टपुत्र बाकरेशास्त्री (ज्यांना संभाजी महाराज स्वामी म्हणतात) यांना दरसाल १०,००० पादशाही होनांचे संस्कृत दानपत्र करून दिले. हे दानपत्र संभाजी महाराजांच्या मंचाकारोहणानंतर एका महिन्याने म्हणजे दि. २४ ऑगस्ट १६८० (भाद्रपद शुद्ध १० सोमवार शके १६०२) रोजी केले आहे. दानपत्र ३०० से.मी. लांब आणि २३.५ से.मी. रुंद आहे. या दानपत्राच्या सर्वात वर मधोमध संभाजी महाराजांची १६ बुरुजी मुद्रा आहे व खाली सुवाच्य अक्षरात संस्कृतमध्ये २ ओळी लिहिल्या आहेत. त्या स्वतः शंभूराजांच्या हस्ताक्षरातील आहेत. त्या ओळी खालीलप्रमाणे :&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&#039;&#039;&#039;|| मतं मे श्री शिवराजपुत्रस्य श्रीशंभूराज ||&#039;&#039;&#039;&lt;br /&gt;
&#039;&#039;&#039;|| छत्रपते: यद्त्रोपरिलेखितं || छं || श्री ||&#039;&#039;&#039;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
यात ते तत्कालीन दानपत्र लेखन पद्धतीप्रमाणे आपल्या पूर्वजांच्या व स्वतःच्या पराक्रमाचे व सद्गुणांचे वर्णन अतिशय सार्थ अशा शब्दांमध्ये करतात. आपले पणजोबा मालोजीराजे यांना शूरश्रेष्ठ व देवब्राम्हण प्रतिपालक असे संबोधतात तर आपले आजोबा महाराज शाहजीराजांस निशायुद्धप्रवीण, तसेच &#039;हैन्दवधर्मजीर्णोद्धाकरणघृतमति&#039; म्हणजे स्वतःचा जीव धोक्यात घालून हिंदवी ([[हिंदू]]) धर्माचा जीर्णोद्धार करणारा असे संबोधतात. आपले वडील श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख &#039;म्लेंव्छक्षयदीक्षित&#039; म्हणजे आपल्या तारुण्यातच ज्यांनी म्लेंछ क्षयाची दीक्षा घेतली व अनेक ताम्रांना पराभूत केले असा करतात. यावरून छत्रपती संभाजी महाराजांना आपल्या पराक्रमी पूर्वजांविषयी वाटणाऱ्या भावनेचे यथार्थ दर्शन होते.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
== धार्मिक धोरण ==&lt;br /&gt;
दि. ६ जानेवारी १६८१ रोजी छत्रपती संभाजी महाराजांनी गोपळभट अग्निहोत्री महाबलेश्वरकर यांच्या पुत्रास लिहिलेल्या पत्रात एक अतिशय समर्पक असे वाक्य आले आहे. ते वाक्य असे, ..राजश्री आबासाहेबांचे जे संकल्पित आहे ते चालवावे हे आम्हास अगत्य... युवराज शंभू राजे छत्रपती झाल्यानंतर त्यांचे अलौकिक आणि अद्भुत अशा कार्याचा जर कुणी आढावा घेतला तर त्याला पदोपदी या वाक्याची प्रचीती येते. त्यांचे राजकीय धोरण, आर्थिक धोरण, प्रजाहितदक्षता या सर्व बाबींमध्ये त्यांनी आपल्या अद्वितीय अशा वडिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवलेला दिसतो. या प्रमाणेच त्यांच्या धार्मिक धोरणावरही छत्रपती शिवाजी महाराजांचाच ठसा कोरलेला आढळतो.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&#039;&#039;&#039;संतजनांस राजाश्रयः&#039;&#039;&#039;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
१. संतश्रेष्ठ जगद्गुरू [[तुकाराम महाराज]] यांचे पुत्र महादोबा गोसावी यांस छत्रपती संभाजी महाराजांनी वर्षासनाची नेमणूक करून दिली. (दि. १९ ऑगस्ट १६८०)&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
२. शिवकालातील प्रसिद्ध पाटगावचे मौनीबाबा यांच्या पालखीस भोई व वाजंत्रीची कायमची व्यवस्था लावून दिली. त्यासाठी वार्षिक १२५ होनांचे आज्ञापत्र करून दिले. (दि.१३ सप्टेंबर १६८०)&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
३. समर्थ रामदास स्वामींनी अंगापूरच्या डोहात मिळालेल्या राममूर्तीची चाफळ येथे स्थापना करून मंदिर उभारले. तेथील पूजेअर्चेसाठी व नैवेद्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी चैत्र शु. १ शके १५९७ रोजी सनद करून दिली.  तीच पुढे छत्रपती संभाजी महाराजांनी चालू ठेवली. तसेच चाफळच्या यात्रेस जमणाऱ्या भाविकांना लष्करातील लोकांचा अथवा मुसलमानी सैन्याचा त्रास होऊ नये व यात्रा यथासांग पार पडावी म्हणून वासुदेव बाळकृष्ण या आपल्या अधिकाऱ्यास आज्ञापत्र लिहिले. (दि. १८ ऑक्टोबर १६८०)&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
४. चिंचवडचे श्री मोरया गोसावी यांच्या &#039;माणसांस, शेतापोतांस तसेच गुरांढोरांस काडीचाही तसविज देऊ नये&#039; यासाठी आपल्या लष्करी अधिकाऱ्यास ताकीदपत्र लिहिले. (दि. ६ नोव्हेंबर १६८०)&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
५. प्रचंडगडाच्या पायथ्याशी गडाच्या संरक्षणासाठी आलेल्या लोकांच्या गाई व म्हशी यांची चराई (वणी) छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच संभाजी महाराजांनी पण माफ केली (दि. ३१ मार्च १६८१)&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
६. श्री समर्थांनी अवतारकार्य पूर्ण केल्यावर त्यांच्या मागे सज्जनगड व चाफळ येथील धर्मादाय ऐवज, उत्सव, देवस्थानांची व्यवस्था, यात्रा, समर्थांच्या निर्वाणस्थळी हनुमानाचे देवालय उभारणे इत्यादी गोष्टींकडे जातीने लक्ष पुरविले. त्या संबंधी आपल्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी सूचना, आज्ञा, प्रसंगी ताकीद व कडक शब्दात कानउघाडणी देखील केली आहे. या संबधी एका पत्रात संभाजी महाराजांनी कऱ्हाड प्रांताचा सुभेदार रंगो विश्वनाथ यांस श्रीचे कार्यास हैगै कराया तुम्हास काय गरज?... अशा स्पष्ट शब्दात खडसावले आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
७. चिंचवडच्या देवस्थानास आपल्या लष्कराकडून उपद्रव होतो अशी तक्रार आल्यावर छत्रपती संभाजी महाराजांनी पुणे प्रांताच्या सुभेदार व जुमलेदारांना ..जो धामधूम करील त्याला स्वामी जीवेच मारतील... अशी अत्यंत परखड शब्दात समज दिली आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
८. वाई प्रांताचा सुभेदार येसाजी मल्हार यास निंब येथील सदानंद गोसावींच्या मठास दरसाल नेमून दिलेला ऐवज पोचता न केल्याचे कळताच संभाजी महाराजांनी धर्मकार्यात खलेल न करणे. अशा शब्दांत ताकीद दिली आहे. व तेथील आनंदगिरी गोसावी यांना पत्र लिहून धर्माच्या कार्यास अंतर पडणार नाही... असे अभिवचन दिले आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&#039;&#039;&#039;सक्तीने धर्मांतरास विरोध:&#039;&#039;&#039;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या वडिलांप्रमाणेच सक्तीने धर्मांतर करणाऱ्या इंग्रज, पोर्तुगीज, व मुसलमान सत्ताधीशांना कडाडून विरोध केलेला दिसतो. छत्रपती संभाजी महाराज व हेनरी ग्यारी यांच्यात इ.स. १६८४ साली झालेल्या तहातील एक कलम आहे,&#039;That the English shall buy none of my people belonging to my dominion, to make them slaves or Christians&#039;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&#039;&#039;&#039;अंत्रुज परगण्यातील अडकोळण गावचा शिलालेख:&#039;&#039;&#039;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत मराठी राज्याचा अंमल गोमंतक परिसरात सुरू झाला. तेव्हापासून व्यापारी माणसांकडून घेण्यात येणारा अंगभाडे कर संभाजी महाराजांच्या आज्ञेने माफ करण्यात आला. या संबंधी फोंड्याजवळ अंत्रुज येथील हडकोळण या गावी एक शिलालेख आहे. या शिलालेखात संभाजी महाराजांनी मुख्याधिकारी मामले फोंडा धर्माजी नागनाथ यास करमाफीसंबंधी आज्ञा करताना मराठी अंमलाला उद्देशून खालील वाक्य कोरले आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&#039;...आता हे हिंदुराज्य जाहलेपासोन...पुढे या प्रमाणे सकळाहि चालवावे सहसा धर्मकृत्यास नाश करू नये करतील त्यांसी महापातक आहे...&#039;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
== प्रधान मंडळ ==&lt;br /&gt;
सिंहासनाधीश्वर श्रीमंत छत्रपती - संभाजीराजे शिवाजीराजे भोसले&lt;br /&gt;
(सेनाधीशांचे सेनाधीश - सर्वोच्च अधिकार असलेले)&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
श्री सखी राज्ञी जयति छत्रपती येसूबाई संभाजीराजे भोसले&lt;br /&gt;
(संभाजीराजांच्या गैरहजेरीत राजव्यवस्थेच्या कारभारी)&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
* सरसेनापती -                                     हंबीरराव मोहिते&lt;br /&gt;
* छांदोगामात्य   -                                 कवी कलश&lt;br /&gt;
* पेशवे  -                                           निळो मोरेश्वर पिंगळे&lt;br /&gt;
* मुख्य न्यायाधीश -                          प्रल्हाद निराजी&lt;br /&gt;
* दानाध्यक्ष -                                    मोरेश्वर पंडितराव&lt;br /&gt;
* चिटणीस -                                     बाळाजी आवजी&lt;br /&gt;
* सुरनीस -                                       आबाजी सोनदेव&lt;br /&gt;
* डबीर -                                           जनार्दनपंत&lt;br /&gt;
* मुजुमदार -                                     अण्णाजी दत्तो&lt;br /&gt;
* वाकेनवीस -                                   दत्ताजीपंत&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
== औरंगजेबाची दख्खन मोहीम ==&lt;br /&gt;
औरंगजेबाने [[इ.स. १६८२]] मध्ये मराठ्यांवर हल्ला केला. औरंगजेबाचे सामर्थ्य सर्वच बाबतीत संभाजी महाराजांपेक्षा जास्त होते. त्याचे सैन्य मराठ्यांच्या सैन्याच्या पाचपटीने जास्त होते तर औरंगजेबाचे साम्राज्य संभाजी महाराजांच्या स्वराज्यापेक्षा कमीतकमी १५ पटींनी मोठे होते.  त्याकाळी जगातील सर्वांत शक्तिशाली सैन्यांमध्ये औरंगजेबाच्या सैन्याचा समावेश होत होता. तरीही संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी हिमतीने लढा दिला. मराठ्यांची प्रबळ इच्छाशक्ती आणि झुंझारपणाचे ठळक उदाहरण म्हणजे [[नाशिक]]जवळील [[रामशेज किल्ला|रामशेज किल्ल्याचा लढा]] होय. औरंगजेबाच्या सरदारांची अशी अपेक्षा होती की तो किल्ला काही तासांतच शरणागती पत्करेल. पण मराठ्यांनी असा चिवट प्रतिकार केला की तो किल्ला जिंकण्यासाठी त्यांना तब्बल साडेसहा वर्षे लढावे लागले. संभाजी महाराजांनी [[गोवा|गोव्याचे]] पोर्तुगीज, जंजिऱ्याचा सिद्दी आणि म्हैसूरचा चिक्कदेवराय या शत्रूंना असा जोरदार धडा शिकवला की त्यांची संभाजी महाराजांविरुद्ध औरंगजेबाला मदत करायची हिंमत झाली नाही. तसेच त्यांपैकी कोणीही त्यांच्याविरुद्ध उलटू शकला नाही.  संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी सर्व शत्रूंशी एकहाती झुंज दिली.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
इ.स. १६८७-८८ मध्ये [[महाराष्ट्र]]ात मोठा दुष्काळ पडला.त्यामुळे परिस्थिती कठीण झाली होती.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
== दगाफटका ==&lt;br /&gt;
[[इ.स. १६८९]]च्या सुरुवातीला संभाजी महाराजांनी त्यांच्या महत्त्वाच्या सरदारांना बैठकीसाठी [[कोकण]]ात [[संगमेश्वर]] येथे बोलावले. १ फेब्रुवारी, इ.स. १६८९ रोजी बैठक संपवून संभाजी महाराज [[रायगड]]ाकडे रवाना होत असतानाच [[औरंगजेब]]ाचा सरदार [[मुकर्रबखान]] याने [[नागोजी माने]] यांच्या साथीने संगमेश्वरावर हल्ला केला. या कारवाईसाठी गुप्तता बाळगली आणि सर्व कारवाईची आखणी खूपच काळजीपूर्वक केली. मराठ्यांत आणि शत्रूच्या सैन्यात चकमक झाली. मराठ्यांचे संख्याबळ कमी होते. प्रयत्‍नांची शर्थ करूनही मराठे शत्रूचा हल्ला परतवून लावू शकले नाहीत. शत्रूने संभाजीराजांना व त्यांच्यासोबत असलेल्या कवि कलश यांना जिवंत पकडले.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
== महाराजांना वाचवण्याचे प्रयत्न ==&lt;br /&gt;
छत्रपती संभाजी महाराज संगमेश्वरी पकडले गेल्यानंतर त्यांना वाचवण्याचे प्रयत्न झाले नाही असे नाही. महाराजांना वाचवण्यासाठी प्रयत्न मावळ्यांनी केले पण ते त्यात यशस्वी झाले नाही. यात सर्वात पहिला प्रयत्न हा जोत्याजी केसरकर यांनी केला. पुढे जाऊन अप्पा शास्त्री यांनी देखील महाराजांना सोडवण्याचा प्रयत्न केला पण हे दोन्ही प्रयत्न अयशस्वी ठरले.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
== शारीरिक छळ व मृत्यू ==&lt;br /&gt;
त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांचे सल्लागार [[कवी कलश]] यांना औरंगजेबापुढे [[बहादुरगड]], आता [[धर्मवीरगड]] येथे आणण्यात आले. औरंगजेबाने संभाजी महाराजांना सर्व किल्ले त्याच्या स्वाधीन केल्यास जीवदान देण्याचे मान्य केले. पण संभाजी महाराजांनी त्याला स्पष्टपणे नकार दिला. औरंगजेबाने संभाजी महाराज आणि कवी कलश यांची विदूषकाचे कपडे घालून अत्यंत मानहानीकारक अशी धिंड काढण्यात आली. तरीही संभाजी महाराजांनी शरणागती पत्करण्यास नकार दिला. तेव्हा औरंगजेबाने त्यांना क्रूरपणे अत्यंत हालहाल करून ठार मारायचा आदेश दिला.तरीसुद्धा संभाजी महाराजांनी हार मनली नाही&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
== साहित्य ==&lt;br /&gt;
अफाट मोगली सैन्याशी धैर्याने आणि असामान्य शौर्याने लढा देणारा हा छत्रपती उत्तम साहित्यिक आणि संस्कृत भाषेचा उत्तम जाणकारही होता.&lt;br /&gt;
संभाजी महाराजांनी वयाच्या चौदाव्या वर्षी बुधभूषण-राजनीती हा संस्कृत ग्रंथ लिहिला.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
[[बुधभूषण]] या ग्रंथात अतिशय सुंदर आणि अलंकारिक भाषेत आपले वडील [[शिवाजी]]राजे यांचा उल्लेख आहे :&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&#039;कलिकालभुजंगमावलीढं निखिलं धर्मवेक्ष्य विक्लवं यः ।&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
जगत: पतिरंशतोवतापो: (तीर्ण:)स शिवछत्रपतिजयत्यजेयः ॥&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
अर्थ-&amp;quot;कलिकालरूपी भुजंग घालितो विळखा, करितो धर्माचा ऱ्हास&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
तारण्या वसुधा अवतरला जगत्पाल, त्या शिवप्रभूंची विजयदुंदुभी गर्जू दे खास ॥ &amp;quot;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
याचबरोबर संभाजी महाराजांनी [[नाईकाभेद|नायिकाभेद]], [[नखशिखा]], [[सातसतक|सातशतक]] या तीन ग्रंथांचे लिखाण केले. [[गागाभट्टांनी]] [[समयनयन|समयनय]] हा ग्रंथ लिहून संभाजी महाराजांना अर्पण केला.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
== संभाजीमहाराजांविषयी इतिहास लेखन ==&lt;br /&gt;
* ज्वलज्वलनतेजस संभाजीराजा - डॉ. [[सदाशिव शिवदे]]&lt;br /&gt;
*अद्वितीय छत्रपती श्रीसंभाजी महाराज (संशोधनात्मक ग्रंथ - खंड १ ते ५) - अनंत दारवटकर&lt;br /&gt;
* राजा शंभूछत्रपती - विजयराव देशमुख&lt;br /&gt;
* पोर्तुगीज कागदपत्रे -  डॉ.पांडुरंग पिसुर्लेकर&lt;br /&gt;
* पोर्तुगीज-मराठे संबंध - डॉ.पांडुरंग पिसुर्लेकर&lt;br /&gt;
* The Portuguese and The Marathas translated by P.R. Kakodkar&lt;br /&gt;
* फ्रेंच-मराठा संबंध - लेखक ?&lt;br /&gt;
* बिकानेर पुरालेखाभिगार - राजस्थान&lt;br /&gt;
* संभाजीकालीन पत्रसार संग्रह (शा.१६०२ - शा.१६१०) : संपादक - [[शंकर नारायण जोशी]]; प्रकाशक भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे) (पहिली आवृत्ती - १९४९; नवीन आवृत्ती - ऑगस्ट २०१५)&lt;br /&gt;
* छत्रपती संभाजी महाराजांची पत्रे : डॉ. सदाशिव शिवदे यांच्या या पुस्तकात छत्रपती संभाजीराजांच्या ३१५ पत्रांचा परिचय करून देण्यात आला आहे.&lt;br /&gt;
* बुधभूषण-राजनीती  - संपादक :  प्रा. रामकृष्ण आनंदराव कदम (कदंब), राजमयूर प्रकाशन, पुणे&lt;br /&gt;
* शाक्तवीर संभाजी महाराज (ॲडव्होकेट अनंत दारवटकर)&lt;br /&gt;
* छत्रपती संभाजी महाराज प्रकाशन &#039;&#039;&#039;[[यशवंतराव चव्हाण]]&#039;&#039;&#039;  यांच्या हस्ते&#039;&#039;&#039;&#039;&#039; &#039;&#039;&#039;&#039;&#039;(पृष्ठसंख्या ७५०, पहिली आवृत्ती १९६०,पी.पी.एच.बुक स्ट.प्रकाशन १९७१ २री-आवृती,मनोरमा प्रकाशन ३री आवृती २००१,  लेखकः [[वासुदेव सीताराम बेंद्रे|वा.सी. बेंद्रे]] ( इ.स.१९१८ ते इ.स.१९५८म्हणजे सुमारे ४० वर्षे अथक मेहनत करून त्यांनी अखेर १९६० मध्ये संभाजी महाराजांचे सत्य चरित्र सर्वांसमोर आणले).&lt;br /&gt;
* छत्रपती संभाजी महाराजांची राजनीती (डॉ. केदार महादेवराव फाळके)&lt;br /&gt;
* छ. संभाजी स्मारक ग्रंथ - संपादन- डॉ. जयसिंगराव पवार&lt;br /&gt;
*रणझुंजार : डॉ. सदाशिव शिवदे&lt;br /&gt;
*शिवपुत्र संभाजी : डॉ. कमल गोखले&lt;br /&gt;
*सभासद बखर, चिटणीस बखर, शेडगावकर बखर, पंतप्रतिनिधी बखर, बावडेकर अमात्यांची बखर, न्यायशास्त्री बखर इत्यादी निरनिराळ्या मराठी बखरींमध्येही संभाजीराजांसंबंधी माहिती मिळते. याशिवाय मनुचीसारख्या परकीय फिरस्त्याच्या Storio De mogor मधून सुद्धा माहिती मिळू शकते.&lt;br /&gt;
*फारसी दस्तावेज -&lt;br /&gt;
 *फुतूहाते आलमगिरी - ईश्वरदास नागर&lt;br /&gt;
 *खुतूते शिवाजी मधील निवडक पत्रे&lt;br /&gt;
*मुन्तखबुललुबाब महंमदशाही - खाफी खान&lt;br /&gt;
 *तारीखे दिल्कुशा - भीमसेन सक्सेना&lt;br /&gt;
 *मासिरे आलमगिरी - साकी मुस्तैदखान&lt;br /&gt;
 *अहकामे आलमगिरी - इनायतुल्ला खान&lt;br /&gt;
*मोगल दरबाराची बातमीपत्रे&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
== ललित साहित्य ==&lt;br /&gt;
(संभाजी महाराजांवरील ऐतिहासिक कथा कथने आणि कादंबऱ्या)&lt;br /&gt;
* अर्घ्य - [[नयनतारा देसाई]] (१९७३)&lt;br /&gt;
* अश्रू ढळले रायगडाचे - अर्जुनराव झेंडे, नाटक.&lt;br /&gt;
* आम्ही यातनांचे स्वामी - वा.ना. देशपांडे, १९७३&lt;br /&gt;
* इथे ओशाळला मृत्यू - [[वसंत कानेटकर]], नाटक.&lt;br /&gt;
* खरा संभाजी - प्रा. [[नामदेवराव जाधव]]&lt;br /&gt;
* छत्रपती संभाजी - [[मनमोहन नातू]]&lt;br /&gt;
* छत्रपती संभाजी महाराज अथवा राजाचे दुष्कर्म राजाला भोवतेव प्रजेलाही भोवते - ना.वि. बापट&lt;br /&gt;
* छत्रपती संभाजी राजे - नाटक, वासुदेवशास्त्री खरे, १८८५)&lt;br /&gt;
* छावा - [[शिवाजी सावंत]] &lt;br /&gt;
* छावा (कादंबरी, लेखक - [[शिवाजी सावंत]]); (कॉन्टिनेन्टल प्रकाशन, १९७९)&lt;br /&gt;
* धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज -  [[अरुण जाखडे]] (पद्मगंधा प्रकाशन)&lt;br /&gt;
* धर्मवीर संभाजी- ग.कृ. गोडसे, नाटक-१९४१&lt;br /&gt;
* बेबंदशाही - [[विष्णूपंत औंधकर|वि.ह. औंधकर]], नाटक-१९२४&lt;br /&gt;
* मराठी साहित्यातील संभाजी - प्रबंध - डॉ. शालिनी मोहोड&lt;br /&gt;
* मराठ्यांची धारातीर्थे - प्रवीण व. भोसले (नरसिंह पब्लिकेशन्स)&lt;br /&gt;
* मानी मराठा - नाना कोचरेकर, नाटक-१९५०&lt;br /&gt;
* मी मृत्युंजय संभाजी ([[संजय सोनवणी]])&lt;br /&gt;
* राजसंन्यास - [[राम गणेश गडकरी]], नाटक-१९२२&lt;br /&gt;
* राजा शंभू छत्रपती - विजय देशमुख&lt;br /&gt;
* रायगडाला जेव्हा जाग येते - [[वसंत कानेटकर]], नाटक-१९६३&lt;br /&gt;
* वज्‍रदेही संभाजी - ना.ल. मोरे, नाटक-१९८३&lt;br /&gt;
* शंभूराजे - गावंडे, २०००&lt;br /&gt;
* शंभूराजे - दशरथ यादव (काव्य)&lt;br /&gt;
* शंभूराजे - प्रा. सु.ग. शेवडे (धर्मसेवा प्रकाशन)&lt;br /&gt;
* शहेनशाह - [[ना.सं. इनामदार]] (कॉन्टिनेन्टल प्रकाशन, १९९८)&lt;br /&gt;
* शापित राजहंस - [[अनंत तिबिले]] (रिया पब्लिकेशन्स, कोल्हापूर, १९७८).&lt;br /&gt;
* शिवतेज संभाजी (त्रिमिती चरित्र, संतोष रासकर)&lt;br /&gt;
* शिवपुत्र - राजकुंवर बोबडे, १९८१&lt;br /&gt;
* शिवपुत्र संभाजी  - डॉ. कमल गोखले (कॉन्टिनेन्टल प्रकाशन)&lt;br /&gt;
* शिवस्नुषा येसूबाई, - सुशीला खेडकर (उन्मेष प्रकाशन, १९९२)&lt;br /&gt;
* संभवामि युगे युगे - [[मनमोहन नातू]]&lt;br /&gt;
* संभाजी - [[विश्वास पाटील]] (मेहता पब्लिशिंग हाउस)&lt;br /&gt;
* सह्याद्री सांगे कथा शंभुची - आबासाहेब आचरेकर (नाटक-त्रिदल प्रकाशन, गिरगांव, मुंबई, १९८४)&lt;br /&gt;
* स्वधर्मसूर्य संभाजी - स्वामी धर्मव्रत (नाटक-शुभेच्छा प्रकाशन, डोंबिवली (पश्चिम), १९९५)&lt;br /&gt;
* स्वराज्यावरील संकट - [[नाथ माधव]]&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
== नाटके ==&lt;br /&gt;
संभाजी महाराजांवरील [[नाटक]]े&lt;br /&gt;
* इथे ओशाळला मृत्यू (लेखक : [[वसंत कानेटकर]])&lt;br /&gt;
* चैतन्यगाथा तेजपुत्राची (लेखक : ?)&lt;br /&gt;
* संगीत छत्रपती संभाजी (लेखक : आत्माराम मोरेश्वर पाठारे)&lt;br /&gt;
* बेबंदशाही (लेखक : वि.ह. औंधकर)&lt;br /&gt;
* मृत्युंजय&lt;br /&gt;
* मृत्युंजय अमावस्या (महा-नाट्य : लेखक/दिग्दर्शक : नीलेश भिसे)&lt;br /&gt;
* राजसंन्यास (लेखक : राम गणेश गडकरी)&lt;br /&gt;
* रायगडाला जेव्हा जाग येते (लेखक : [[वसंत कानेटकर]]);  एप्रिल २०१३पर्यंत २४२५ प्रयोग&lt;br /&gt;
* शंभुराजे (महानाट्य) : (लेखक : [[नितीन बानुगडे पाटील]])&lt;br /&gt;
* शूर संभाजी (लेखक : ?)&lt;br /&gt;
* शिवपुत्र शंभुराजे (महानाट्य) (दिग्दर्शन/संवादः महेंद्र महाडीक)&lt;br /&gt;
* नरशार्दुल राजा संभाजी (लेखक - इंद्रजित सावंत)&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
== हे सुद्धा पहा ==&lt;br /&gt;
* [[संभाजी महाराज यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी]]&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
== संदर्भ ==&lt;br /&gt;
{{संदर्भयादी}}&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
== बाह्यदुवे ==&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
{{मराठा साम्राज्य}}&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
[[वर्ग:मराठा साम्राज्य|छत्रपती संभाजी भोसले]]&lt;br /&gt;
[[वर्ग:भोसले घराणे|छत्रपती संभाजी भोसले]]&lt;br /&gt;
[[वर्ग:छत्रपती|छत्रपती संभाजी भोसले]]&lt;br /&gt;
[[वर्ग:चित्र हवे]]&lt;br /&gt;
[[वर्ग:भारतीय राज्यकर्ते]]&lt;/div&gt;</summary>
		<author><name>2409:4042:2D17:DD9F:BA20:ABBC:1924:B2CC</name></author>
	</entry>
</feed>