<?xml version="1.0"?>
<feed xmlns="http://www.w3.org/2005/Atom" xml:lang="mr">
	<id>https://mr.bharatpedia.org/w/index.php?action=history&amp;feed=atom&amp;title=%E0%A4%86%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%80</id>
	<title>आगरी - आवृत्ती इतिहास</title>
	<link rel="self" type="application/atom+xml" href="https://mr.bharatpedia.org/w/index.php?action=history&amp;feed=atom&amp;title=%E0%A4%86%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%80"/>
	<link rel="alternate" type="text/html" href="https://mr.bharatpedia.org/w/index.php?title=%E0%A4%86%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%80&amp;action=history"/>
	<updated>2026-08-23T05:08:21Z</updated>
	<subtitle>विकिवरील या पानाच्या आवृत्त्यांचा इतिहास</subtitle>
	<generator>MediaWiki 1.43.6</generator>
	<entry>
		<id>https://mr.bharatpedia.org/w/index.php?title=%E0%A4%86%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%80&amp;diff=7757&amp;oldid=prev</id>
		<title>२१:११, १ मे २०२२ वर ImportMaster</title>
		<link rel="alternate" type="text/html" href="https://mr.bharatpedia.org/w/index.php?title=%E0%A4%86%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%80&amp;diff=7757&amp;oldid=prev"/>
		<updated>2022-05-01T21:11:48Z</updated>

		<summary type="html">&lt;p&gt;&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;b&gt;नवीन पृष्ठ&lt;/b&gt;&lt;/p&gt;&lt;div&gt;&lt;br /&gt;
&amp;#039;&amp;#039;&amp;#039;आगरी समाज&amp;#039;&amp;#039;&amp;#039; प्रामुख्याने उत्तर कोकणात राहणारा समाज आहे. अलिबाग [[पनवेल]],[[उरण]],[[ठाणे]],आणि [[कल्याण]]  तालुक्यातील ९५% पेक्षा जास्त गावं आगरी लोकवस्तीची आहेत.या चारही तालुक्यात सर्वात जास्त आगरी लोकसंख्या आहे. तर भिवंडी,पेण तालुक्यातील ८०% पेक्षा गाव आगरी लोकवस्तीची आहेत. तसेच वसई, अंबरनाथ, कर्जत, मुरबाड, अलिबाग, मुरुड, तळा, म्हसळा, श्रीवर्धन, मंडणगड, दापोली, माणगाव तालुक़्यात पण आगरी लोकावस्ती मोठया प्रमाणात आढळते.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
[[मुंबई]], [[ठाणे]], [[रायगड]],[[पालघर]] जिल्ह्यात आगरी समाजाची लोकसंख्या मोठी आहे.नामवंत पखवाज वादक श्री. विवेक पाटील आगरी समाजातील देसाई, ठाणे येथील उत्कृष्ट कलाकार आहेत. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
  आगरी जात शुद्ध [[क्षत्रिय]] आहे.मुळात समुद्राच्या जवळ राहत असल्याने आगरी माणसांना [[मासळी]] अधिक प्रिय म्हणून ते [[खाडी]]मध्ये अथवा [[समुद्रात]] जाऊन [[मासे]] पकडतात.मूळचा क्षत्रिय असलेला हा समाजाच्या मालकीचे भाताचे आगार, मिठाचे आगर असल्याने हा समाज आगरी म्हणून ओळखला जाऊ लागला. भातशेतीसोबतच [[गोड्या]] पाण्यात मत्स्यशेतीचाही व्यवसाय सुरू केला. [[बंगाली]] लोकांप्रमाणेच आपल्या घराजवळ आपल्याच शेतामध्ये तलाव खोदून त्या तलावात [[मत्स्यबीज]] सोडून मासळीची पैदास अनेक वर्षे आगरी माणूस करीत आहे. [[अलिबाग]] तालुक्यातील शहापूर-धेरंड या गावातील आगरी माणसे व त्यांनी निर्माण केलेले छोटे-मोठे तलाव आहेत. आगरी समाजामध्ये [[पाटील]],मढवी,[[केणे]],[[भगत]],[[गावंड]],[[ठाकूर]],[[भोईर]], [[म्हात्रे]],[[मोकल]], कडवे, दळवी, थळे,&lt;br /&gt;
[[घरत]],माळी,शेळके,कडू.आडनावाची लोक जास्त आहेत.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
== इतिहास ==&lt;br /&gt;
हस्तिनापुरचा सोमवंशी राजा नहुषाचा पुत्र&lt;br /&gt;
[[ययाती]] (तो पांंडव आणि यदुवंशीयांचा पूर्वज सुद्धा होता. प्रयाग जवळील प्रति ही त्याची राजधानी होती.)  &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
याचा [[बलिंद्र]] नावाचा वंशज होता, त्यास [[आगलिका]] नावाची पत्नी होती ,तिला आगला नावाचा पुत्र झाला. आगला हा बलिंद्र राजाच्या पश्चात [[मुंगी]] [[पैठण]] येथे राहू लागला, त्याचे वंशज हे ‘आगले’ लोक १३व्या शतकात [[मुंगी]] [[पैठण]]च्या बिंबराजाच्या सैन्यात तैनात झाले. आगरी शुद्ध सोमवंशी क्षत्रिय  [[राजपूत्र]] आहेत, ह्याचा उल्लेख ज्ञाती निर्णय नावाच्या प्राकृत पोथित आला आहे,जे आगरी मुंगी पैठण वरून आले त्यांचं कुलदैवत आहे एकविरा आई आणि खंडोबा तर जे आगरी [[भोईर]] व [[माळी]] कुळातील आहेत त्यांचे कुलदैवत आहेत महिषासुरमर्दिनी, तुळजाभवानी , खंडोबा आणि भैरीदेव हेही शुद्ध सोमवंशी क्षत्रिय आहेत. तर जे आगरी चितोडगडावरून महाराष्ट्रात, दिल्लीत, गुजरातमध्ये आले आहेत ते शिसोदिया राजपूत असुन श्रीरामाचे वंशज आहेत त्यांना सुर्यवंशी मराठा असं संबोधतात.&lt;br /&gt;
(https://archive.org/stream/in.ernet.dli.2015.101309/2015.101309.Agris-A-Socio-economic-Survey_djvu.txt)&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
 बादशहाच्या राजवटीत कोकणातील सागरगडावरील एक अहिंदु सरदार बादशहाला डोईजड झाला. सागरगडाशेजारील हिंदू राजवटीवर ताबा मिळवून स्वतंत्र राज्यकारभार करू लागला. बादशहाने पाठवलेल्या सर्व सरदारांचा पराभव झाल्याने, त्याने बलाढय़ बिंबराजाला मदतीची विनंती केली. आगले लोकांची ताकद बिंबराजाकडे होती. तो मुंगीपैठणहून कोकणात निघाला. त्याचे सैन्य वाटेत [[नाशिक]], [[घोटी]], [[इगतपुरी]], [[शहापूर]], [[कल्याण]],[[मुरबाड]] येथे राहिले. कलांमध्ये निपुण असल्यामुळे त्यांनी दगडांमध्ये शिल्पे कोरली. तेच पुढे आगरी पाथरवट म्हणून ओळखले जाऊ लागले. नंतर बिंबराजाने सैन्यानिशी कोकणात येऊन [[अलिबाग]], [[आवास]], [[सासवणे]] आणि [[सागरगडावर]] सरदाराचा पाडाव केला. त्याला बादशहाच्या ताब्यात दिले आणि स्वतः राज्यकारभार पाहू लागला. ह्या सोमवंशी क्षत्रिय समाजाला मुंगी पैठणहुन कोकणात आणणारा बिंबराजा म्हणजे महिबिंब ह्या महिबिंबाने शके १०६९ पासुन शके ११३४ पर्यंत ६५ वर्ष राज्य केले .येथील निसर्गाने बिंबराजाला भुरळ घातली आणि त्याने मुंगीपैठणला न जाता कोकणातच राहण्याचा निर्णय घेतला. प्रजेला गावठाणे वसवून दिली आणि [[मिठागरे]] बांधून दिली.तर वाडी मळा करणार्या समाजाला वाडवळ म्हणतात , त्यांचं पाचकळशी आणि चौकळशी असे भेद आहेत हा सोमवंशी क्षत्रिय समाज आगरी ज्ञाती पासुन भिन्न आहे परंतु त्यांचे मुळ एक आहे, ते सोमवंशी क्षत्रियांच्या सहस्त्रार्जुन शाखेतील आहेत.&lt;br /&gt;
 मिठागरांत काम करणारे मीठ-आगरी म्हणून ओळखले जाऊ लागले.  शेती-मळे पिकवू लागले, तर काही मत्स्य व्यवसाय करू लागले.तेथिल मुळ रहीवासी आदिवासी व कोळी लोक आगरी ह्या नव्या नावाने संबोधु लागले  [[अलिबाग]], [[पेण]], [[पनवेल]], [[उरण]], [[कर्जत]], [[रोहे]], [[जंजिरा]], [[श्रीवर्धन]], [[ठाणे]] इत्यादी ठिकाणी आगरी समाज पसरला आणि स्थिरावला. भौगोलिक रचनेनुसार समाजाचा व्यवसायही विभागला गेला. मात्र ह्या क्षत्रिय समाजाला महाराष्ट्रात आगरी तर महाराष्ट्राबाहेर  गुजरातमधिल अहमदाबाद ,बडोदा,जंबुसर,भडोज, सुरत,करंजगाव, गायस,वरई,संजाण,वाघळीपा,बलसाड येथे सुर्यवंशी मराठा,रजपुत मराठा,खानदेशी,आगळे आगरी या नावाने संबोधिले जाते &lt;br /&gt;
(https://www.loksatta.com/navimumbai-news/articles-in-marathi-on-agri-samaj-1632929/)&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
== आगरी समाजाच्या पोटजाती ==&lt;br /&gt;
[[ठाणे]] आणि [[रायगड]] जिल्ह्यात खाड्या, नदीकाठी आणि भात खाचरांच्या ठिकाणी हा समाज बहुसंख्येने आहे १९३१ च्या जनगणनेनुसार  आगरी लोकांची जनसंख्या ठाणे जिल्ह्यात ९८ हजार ७१७, तर [[कुलाबा]] जिल्ह्यात १ लाख ३७ हजार ५२८ एवढी होती,  [[मुंबई शहर]] जिल्ह्यात ७,४८६ तर  [[मुंबई उपनगर]] जिल्ह्यांत ७,३२० , [[जंजिरा]] संस्थानात ९,९४२, [[भोर]] संस्थानात ४३३,  तर [[कराची]] जिल्ह्यांत ६,६८०  (सध्या पाकिस्तानात असलेला जिल्हा). तत्कालिन मुंबई राज्यातील एकूण लोकसंख्या २,६५,२८५ होती. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
संदर्भ.(krishikosh.egranth.ac.in)&lt;br /&gt;
आगरी समाजाच्या तीन पोटजाती. शुद्ध आगरी, दास आगरी आणि वरप आगरी आहेत.  अलिबाग, उरण, मुरूड, श्रीवर्धन, म्हसळा, मंडणगड, दापोली  तालुक्यात जे आगरी राहतात, त्यांना खारकी, खारपाटे म्हणतात. मीठ पिकविणाऱ्या आगरी लोकांना खारवी म्हणतात. &lt;br /&gt;
आगरी प्रामुख्याने शेतीचे मालक असून  भातशेती मळे पिकवणे फळझाडे पिकवणे, व स्वतःच्या घराच्या बाजूच्या तळ्यात माशांचे संवर्धन करणे हे व्यवसाय करतात. [[ठाणे]], [[भिवंडी]], [[कल्याण]], [[पनवेल]], [[पेण]], [[अलिबाग]], [[मुरूड]], [[श्रीवर्धन]], [[म्हसळा]], [[माणगाव]], [[महाड]], [[खेड]], [[मंडणगड]],[[दापोली]], हा समाज प्रामुख्याने समुद्रकिनारी, खाडी किनारी व डोंगरी भातशेतीच्या भागात वास्तव्य करून आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
;बारा, चौदा, बावन्न पाटील  :&lt;br /&gt;
एकेकाळी आगरी समाजाची वस्ती मुंबईत चार भागात विखुरली होती. मूळ आगरी लोक चौदा गावांमध्ये राहत होते म्हणून त्यांना चौदा पाटील म्हटले जात असे. या चौदा गावांमध्ये मोठी [[शिवडी]], धाकटी शिवडी, [[भोईवाडा]],[[ठाकूरवाडी]], [[बामनोली]], [[नायगाव]],[[वडाळा]],[[माटुंगा]], खडा माटुंगा, [[गोवारी]] (वडाळा स्टेशन), [[शीव]], माहीम, माखाडी आणि परळ यांचा समावेश होता. काही आगरी स्वतःला बावन्न पाटील म्हणत असत. हे आगरी नागोठण्याहून येऊन [[डोंगरी]],[[चिंचबंदर]],[[भायखळा]], [[उमरखाडी]] भागात स्थायिक झाले.[[गोवंडी]], [[मानखुर्द]],[[तुर्भे]],[[गवाण]],[[माहूल]], [[चेंबूर]] भागात जे आगरी लोक राहत, तेथे त्यांची बारा गावे होती. म्हणून हे आगरी बारा पाटील नावाने ओळखले जात होते. आगरी माणसे प्रामुख्याने अलिबागच्या पोयनाड,चरी,पेझारी, सांबरी, फणसापूर गावातून मुंबईत आली. त्यांच्या पाठोपाठ वडखळ, [[रोहा]], कोलाड, माणगाव, आणि त्यानंतर हाशिवरे, माणकुळे – रेवस भागातून आगरी मुंबईत आले. अखेरीस [[रेवदंडा]], [[सुडकोली]], [[श्रीवर्धन]], म्हसळा भागातून आलेले आगरी बांधव मुंबई सेंट्रल परिसरात स्थायिक झाले. चेंबूरच्या आरसीएफ (राष्ट्रीय केमिकल्स ॲन्ड फर्टिलायझर्स) आणि बीएआरसी (भाभा ॲटॉमिक रिसर्च सेन्टर) प्रकल्पांमुळे आगरी समाजाची जवळपास बारा गावे उठवली गेली, त्याने समाजाचे मोठे नुकसान झाले.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
आगरी बांधवांच्या गावात मधोमध [[गावदेवी]]&lt;br /&gt;
किंवा [[जरीमरी]]चे [[देऊळ]] असते. सोबत [[हनुमान]], [[राधाकृष्ण]], [[विठ्ठलरूक्मिणी]],[[महादेव]], [[गणपती]], [[शंकर]] यांचीही देवळे असतात.[[वाघेश्वरी]], [[बापदेव]], [[खंडोबा]], [[भैरी]], [[भवानी]], [[जोगेश्वरी]], [[सालबाई]], [[मोठयाबाया]] ही समाजाची मुख्य दैवते आहेत.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
=== चरी-कोपरचा शेतकरी संप ===&lt;br /&gt;
विशेषतः रायगड जिल्ह्यात कृषीवलनेते म्हणून प्रसिद्ध असलेल्या कै. नारायण नागू पाटील यांनी शेतकरी लढा उभारला.  अलिबाग तालुक्यात चरी गावामध्ये दि. २७-१०-१९३३ रोजी परिसरातील पंचवीस गावामधील शेतकर्यांची सभा बोलावून नारायण नागू पाटील यांनी शेतकर्यांना संपाचे आव्हान केले. शेतकऱ्यांनाही वाटायचे- ‘आमचा तारणहार फक्त नारायण नागू पाटीलच!’ शेतकऱ्यांचा संप सुरू झाला. हा संप १९३९ साली मिटला.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
जगाच्या पाठीवर सात वर्षे टिकलेला शेतकऱ्यांचा एकमेव यशस्वी संप म्हणजे चरी-कोपरचा शेतकरी संप होय. या संपाचे नेतृत्व नारायण नागू पाटील यांनी केले. संपाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर व अनंत चित्रे यांनी पाठिंबा दिला होता.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
बिहारच्या नीळ पिकविणाऱ्या शेतकऱ्यांच्या चळवळीपेक्षा हा लढा मोठा आहे. बार्डोलीच्या शेतकऱ्यांच्या सत्याग्रहापेक्षाही ‘चरी-कोपर’च्या शेतकऱ्यांचा लढा मोठा होता, पण शालेय इतिहासामध्ये याची नोंद दिसत नाही, चरी-कोपरच्या आगरी शेतकऱ्यांच्या संपामुळे खोती पद्धती उद्ध्वस्त झाली. कुळकायदा अस्तित्वात आला. नारायण नागू पाटील यांच्या नेतृत्वाखाली चिरनेर परिसरात अक्कादेवीच्या जंगलात ‘जंगल सत्याग्रह’ झाला. या सत्याग्रहामध्ये आगरी माणसासोबत आदिवासी बांधवसुद्धा खांद्याला खांदा भिडवून लढले. जंगल सत्याग्रहींना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मदत केलीच, पण सुभाषबाबूंनीसुद्धा सहकार्य दिले होते. स्वतः सुभाषबाबू जंगल सत्याग्रहींना भेटण्यासाठी पनवेलमध्ये आले होते.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
== समाजकारण आणि राजकारणातील सहभाग ==&lt;br /&gt;
माजी आमदार दत्ता पाटील, माजी खासदार दि.बा. पाटील यांनी विरोधी पक्षनेते म्हणून विधानसभा अनेक वेळा गाजवून समाजाचे विविध प्रश्न सरकार दरबारी सोडविले आहेत. रायगड मध्ये सहकार रुजत नाही असे म्हणणाऱ्यांना भाई ॲड. दत्ता पाटील यांनी रायगड बाजार यशस्वी चालवून उत्तर दिले. मीनाक्षी पाटील यांनी विधान सभेत मंत्री म्हणून काम पाहिले. तत्कालीन शिवसेना, भाजपा युतीच्या मंत्रिमंडळात गणेश नाईक, ॲड. लीलाधर डाके, जगन्नाथ पाटील यांना मंत्रिपद लाभले होते. पहिले जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून वाजेकर, प्रभाकर पाटील, आगरी सेना संस्थापक राजाराम साळवी यांचे कार्य उल्लेखनीय आहे. नारायण नागू पाटील हे आगरी समाजाचे पहिले आमदार तर सोनुभाई दगडू बसवंत हे पहिले खासदार, तुकाराम हिरुजी म्हात्रे पहिले एलएलबी, जनार्दन हीराजी दमामे हे पहिले जेपी तर डोंबिवलीत आपल्या अनेक आगरी सहकाऱ्यांच्या जोडीने प्रिमियर कंपनी व त्या माध्यमातून स्वतःच्या घरात चालू केलेल्या शाळेला कंपनीकडून जागा मिळवून दहावी पर्यंत यशवंत विद्यालय स्थापन करून त्यात जास्तीत जास्त स्थानिक आगरी युवकांना नोकरी व शिक्षण देणाऱ्या स्व.सखारामशेठ पाटील यांचे शिष्य नकुल पाटील हे पहिले मंत्री असे सांगण्यात येत आहे. पुढे स्व.सखाराम शेठ पाटील यांचा वारसा त्यांचे कनिष्ठ बंधू  कै.रतनबुवा पाटील यांनी चालवला. आगरा ज्ञाती परिषद (१९१७), आगरी शिक्षण संस्था (१९३४), आगरी सेवा संघ, वरळी (१९३५) यांच्यासह अनेक लहान-मोठ्या संस्था मुंबईत कार्यरत आहेत. आगरी बांधवांच्या बोलीचा यादवकालीन प्राकृत भाषेशी संबंध जोडला जात आहे. शाहीर राघोबा कोपरकर कलगीवाले ऊर्फ कवी राघवदास हे समाजातील पहिले कवी-कीर्तनकार होते. आगरी बोलीचा लेखनात कलात्मक वापर करून मराठी साहित्यात ती सर्वपरिचित करण्याचा बहुमान प्रा. शंकर सखाराम (कोपर,चरी-अलिबाग) यांना जातो.१९९० मध्ये अस्सल आगरी बोलीतील पहिले काव्यसंग्रह  &amp;#039;&amp;#039;निंगोलीच पानी&amp;quot; हे प्रबोधनात्मक काव्यसंग्रह रामनाथ म्हात्रे तुर्भे नवीमुंबई याना प्रकाशित करण्याचा मन मिळाला &lt;br /&gt;
सन २०१८ पासून मुंबई विद्यापीठाने पहिल्यांदाच अग्रिबोलीतील कविता ,कथांचा समावेश असणारे   &amp;quot;आगारातील वाटा&amp;quot; हे पुस्तक एस वाय बी एच्या विद्याथ्यांसाठी अभ्यासक्रमासाठी उपलब्ध केले आहे  आगरी समाजाचा इतिहास प्रेरणादायी आहे; परंतु त्यांच्याच शेतीवर आणि मिठागरांवर पुढे चौफेर आक्रमण सुरू झाले.&amp;lt;ref&amp;gt;{{संकेतस्थळ स्रोत|title=नवशक्ती|दुवा=http://navshakti.co.in/closed/election/matpanchayat/32119/|संकेतस्थळ=नवशक्ती.कॉम|प्रकाशक=नवशक्ती}}&amp;lt;/ref&amp;gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
===आगरी सेना===&lt;br /&gt;
आगरी सेना ही या समाजाचे प्रतिनिधित्व करू पाहणारी राजकीय संघटना आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==  लोकसभेतील आगरी नेते [खासदार ] ==&lt;br /&gt;
२) [[कपिल मोरेश्वर पाटील]] हे २०१९ मध्ये भिवंडी लोकसभा संघामधुन निवडणुकींत विजयी होणारे  [[आगरी]] समाजातील नेते आहेत.&lt;br /&gt;
१) सोनू भाऊ बसवंत हे आगरी समाजाचे पहिले खासदार होते&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==  विधानसभेतील आगरी नेते [आमदार ] ==&lt;br /&gt;
१)प्रमोद रतन पाटील ( राजु दादा ) कल्याण ग्रामीण&lt;br /&gt;
२)महेंद्र दळवी ( अलिबाग  )&lt;br /&gt;
३)रवी सेठ पाटील  ( पेण )&lt;br /&gt;
४)प्रशांत ठाकुर ( पनवेल ) &lt;br /&gt;
५)मंदा म्हात्रे ( बेलापूर )&lt;br /&gt;
६)गणेश नाईक  ( ऐरोली )&lt;br /&gt;
७)गणपत गायकवाड  ( कल्याण पूर्व )&lt;br /&gt;
८)विश्वनाथ भोईर  ( कल्याण पश्चिम  )&lt;br /&gt;
९} संदीप नाईक (ऐरोली )&lt;br /&gt;
१०) भाई बाळाराम पाटील(कोकण शिक्षक मतदार)&lt;br /&gt;
११) भाई जयंत पाटील (विधान परिषद)&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
== हे सुद्धा पहा ==&lt;br /&gt;
*[[आगरी बोलीभाषा]]&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
== संदर्भ ==&lt;br /&gt;
{{संदर्भयादी}}&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
* [http://www.ketkardnyankosh.com/index.php/2012-09-06-10-40-02/391-2012-10-07-08-46-36]&lt;br /&gt;
*[www.krishikosh.egranth.ac.in › bitstream]&lt;br /&gt;
[[वर्ग:महाराष्ट्रामधील जाती]]&lt;br /&gt;
[[वर्ग:चित्र हवे]]&lt;br /&gt;
{{DEFAULTSORT:आगरी समाज-आगरी जात}}&lt;br /&gt;
आगरी समाजाचा इतिहास&lt;/div&gt;</summary>
		<author><name>ImportMaster</name></author>
	</entry>
</feed>