<?xml version="1.0"?>
<feed xmlns="http://www.w3.org/2005/Atom" xml:lang="mr">
	<id>https://mr.bharatpedia.org/w/index.php?action=history&amp;feed=atom&amp;title=%E0%A4%94%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%AC</id>
	<title>औरंगजेब - आवृत्ती इतिहास</title>
	<link rel="self" type="application/atom+xml" href="https://mr.bharatpedia.org/w/index.php?action=history&amp;feed=atom&amp;title=%E0%A4%94%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%AC"/>
	<link rel="alternate" type="text/html" href="https://mr.bharatpedia.org/w/index.php?title=%E0%A4%94%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%AC&amp;action=history"/>
	<updated>2026-08-22T13:53:04Z</updated>
	<subtitle>विकिवरील या पानाच्या आवृत्त्यांचा इतिहास</subtitle>
	<generator>MediaWiki 1.43.6</generator>
	<entry>
		<id>https://mr.bharatpedia.org/w/index.php?title=%E0%A4%94%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%AC&amp;diff=1631&amp;oldid=prev</id>
		<title>ImportMaster: robot: Import pages using विशेष:आयात</title>
		<link rel="alternate" type="text/html" href="https://mr.bharatpedia.org/w/index.php?title=%E0%A4%94%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%AC&amp;diff=1631&amp;oldid=prev"/>
		<updated>2022-05-01T16:50:17Z</updated>

		<summary type="html">&lt;p&gt;robot: Import pages using &lt;a href=&quot;/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4&quot; title=&quot;विशेष:आयात&quot;&gt;विशेष:आयात&lt;/a&gt;&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;b&gt;नवीन पृष्ठ&lt;/b&gt;&lt;/p&gt;&lt;div&gt;{{इतिहासलेखन}}&lt;br /&gt;
{{माहितीचौकट राज्याधिकारी &lt;br /&gt;
| नाव = औरंगजे़ब&lt;br /&gt;
| पदवी = बादशाह सम्राट&lt;br /&gt;
| चित्र = Aurangzeb reading the Quran.jpg&lt;br /&gt;
| चित्र_शीर्षक = औरंगज़ेब कुराण पठण करताना, इसवी सनाच्या १८व्या शतकातील अनामिक चित्रकाराने रंगविलेले चित्र&lt;br /&gt;
| राजध्वज_चित्र = &lt;br /&gt;
| राजध्वज_चित्र_शीर्षक = &lt;br /&gt;
| राजचिन्ह_चित्र = &lt;br /&gt;
| राजचिन्ह_चित्र_शीर्षक = &lt;br /&gt;
| राज्य_काळ = [[इ.स. १६५९|१६५९]]-[[इ.स. १७०७|१७०७]]&lt;br /&gt;
| राज्यारोहण = &lt;br /&gt;
| राज्याभिषेक = &lt;br /&gt;
| राज्यव्याप्ती = &lt;br /&gt;
| राजधानी = &lt;br /&gt;
| पूर्ण_नाव = अबू मुझफ्फर मुहिउद्दीन मुहम्मद औरंगज़ेब आलमगीर&lt;br /&gt;
| इतर_पदव्या = &lt;br /&gt;
| जन्म_दिनांक = [[नोव्हेंबर ३]], [[इ.स. १६१८|१६१८]]&lt;br /&gt;
| जन्म_स्थान = [[दाहोद]], [[भारत]]&lt;br /&gt;
| मृत्यू_दिनांक = [[मार्च ३]], [[इ.स. १७०७|१७०७]]&lt;br /&gt;
| मृत्यू_स्थान = [[अहमदनगर]], [[महाराष्ट्र]], [[भारत]]&lt;br /&gt;
| पूर्वाधिकारी = [[शाह जहान]]&lt;br /&gt;
| राजपद_वारस = &lt;br /&gt;
| राजपद_वारस_प्रकार = &lt;br /&gt;
| उत्तराधिकारी = [[पहिला बहादुर शाह]]&lt;br /&gt;
| वडील = शहाजहान&lt;br /&gt;
| आई = &lt;br /&gt;
| पत्नी = रबीया दुराणी, दिलरास बानो बेगम&lt;br /&gt;
| इतर_पत्नी = &lt;br /&gt;
| पती = &lt;br /&gt;
| इतर_पती = &lt;br /&gt;
| संतती = &lt;br /&gt;
* [[पहिला बहादूर शाह]], पुत्र&lt;br /&gt;
* [[आझम शाह]], पुत्र&lt;br /&gt;
* [[सुलतान मुहम्मद अकबर]], पुत्र&lt;br /&gt;
* [[मुहम्मद कामबक्श]], पुत्र&lt;br /&gt;
* [[झेबुन्निसा]], कन्या&lt;br /&gt;
| राजवंश = [[मुघल]]&lt;br /&gt;
| राजगीत = &lt;br /&gt;
| राजब्रीदवाक्य = &lt;br /&gt;
| राजचलन = &lt;br /&gt;
| तळटिपा = &lt;br /&gt;
|}}&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&amp;#039;&amp;#039;&amp;#039;औरंगजे़ब&amp;#039;&amp;#039;&amp;#039; (इ.स. १६१८ - इ.स. १७०७) हे [[मुघल साम्राज्य|मोगल सम्राट]] होते. त्यांनी त्या वेळी आपल्या राज्यात शरियत (इस्लामी कायदा) लागू केला होता.{{संदर्भ हवा}} गैर-मुसलमान जनतेवर असा कायदा लागू करणारे ते पहिले मुसलमान राज्यकर्ता होते. तसेच त्यांनी जिझिया कर परत लागू केला.{{संदर्भ हवा}} त्यांनी आपल्या आयुष्यातील बराच काळ दक्षिणेत [[मराठा साम्राज्य|मराठा साम्राज्यावर]] आणि इतर  विरोधकांवर अंकुश ठेवण्याच्या प्रयत्‍नांत घालवला. सम्राट औरंगजेब सत्ताधीश झाल्यानंतर उत्तर पूर्वेकडील सीमेच्या संरक्षणाकडे त्याने लक्ष दिले वारसा हक्काच्या युद्धामुळे निर्माण झालेला गोंधळाचा फायदा घेऊन आसाम व कुछ बिहारच्या अहोम शासकांनी स्वतंत्र होण्याचे ठरविले यावेळी कुचबिहारचा शासक प्रेमनारायण यांनी शेजारचा काही मुघल प्रदेश ताब्यात घेण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या  सन १६५८मध्ये त्याच्या सैन्याने आसामची राजधानी गोहाटी ताब्यात घेऊन प्रचंड लूट केली तेव्हा प्रेम नारायणाचा बंदोबस्त करण्यासाठी औरंगजेबाने मीर जुमलाची बंगालची सुभेदारपदी नेमणूक केली परंतु विशेष काही साध्य न होताच १६६३मध्ये मीर जुमलाचा मृत्यू झाला&lt;br /&gt;
रायबाघन एक थोर करारी औरंगजेबची सेनापती म्हणून काम करत होती ती महाराष्ट्र मधील वर्हाड प्रांतातील होती&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
== राजकीय कारकिर्दीची सुरुवात ==&lt;br /&gt;
१६३४ मधे [[शाहजहान]]ने औरंगजे़बांस मुघल प्रथेनुसार [[दख्खन]]चा सुभेदार म्हणून नियुक्त केले. औरंगजे़बांनी मराठवाड्यातील खडकी या शहराचे नाव बदलून ते [[औरंगाबाद]] केले. इ.स.१६३७  साली औरंगजे़बांनी रबीया दुराणीशी लग्न केले. त्या दरम्यान शहाजहानने थोरला मुलगा दाराशुकोहला मुघल दरबारातील कामकाजात लक्ष घालण्यास सांगितले. [[जहान‍आरा]] बेगम ही औरंगजे़बांची थोरली बहीण. इ.स.१६४४  मध्ये औरंगजे़बांची दुसरी एक बहीण एका दुर्घटनेत जळून मरण पावली. या घटनेनंतर तीन आठवड्यांनी औरंगज़ेब आग्रा येथे आला, यामुळे शहाजहान बादशहा भयंकर संतापला आणि त्याने औरंगजे़बाला दख्खनच्या सुभेदारीवरून पायउतार केले. यानंतर तो सात महिने दरबारात आला नाहीॅं. नंतर शहाजहानने त्याची नियुक्ती गुजरातच्या सुभेदारपदी केली. तेथे त्याने आपल्यातील कसब पणाला लावून काम केले. फलस्वरूपी त्याला बदख्शान ([[अफगाणिस्तान]]) बाल्ख येथील सुभेदारीही देण्यात आली.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
=== सत्तासंघर्ष ===&lt;br /&gt;
सन्१६५२ मध्ये शाहजहान आजारी पडला तर औरंगजेबाने त्याला कैद करून मारले.. दाराशुकोह, शाह सुजा आणि औरंगज़ेब यांच्यांत सत्तासंघर्ष सुरू झाला. ज्याने स्वतःला बंगालचा गव्हर्नर म्हणून घोषित केले होते त्या शाह सुज़ाला औरंगजे़बाकडून हार पत्करून [[म्यानमार|ब्रह्मदेश]] येथील [[अराकान]]क्षेत्री जावे लागले. १६५९ साली औरंगजे़बानेनी शाहजहानला कैद करून स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला व  [[दारा शिकोह|दाराशुकोहचा]] शिरच्छेद करवला. अशी वदंता आहे की शाहजहानला मारण्यासाठी औरंगजे़बांनी दोनदा विष पाठवले होते पण ज्या वैद्यांकरवी विष पाठविले होते ते इतके स्वामिनिष्ठ होते की त्यानी शाहजहानला विष न देता ते स्वतःच पिऊन टाकले.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
== मराठ्यांविरुद्ध युद्ध ==&lt;br /&gt;
मुघल साम्राज्याचा नर्मदा नदीपलीकडे विस्तार तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यविस्ताराला वेसण घालणे या दोन हेतूंसाठी औरंगजेबांनी त्यांचे मामा शाहिस्तेखान यांना दख्खनच्या मोहिमेवर पाठविले. प्रचंड मोठा लवाजमा, सैन्य आणि फौजफाटा सोबत घेऊन शाहिस्तेखान निघाले आणि वाटेत असणाऱ्या प्रत्येक राज्यात, गावात त्याने दहशत पसरवीत जमेल तेवढा जमेल तेथे विध्वंस केला. शेवटी पुण्याजवळील चाकणचा किल्ला जिंकून पुण्यातील शिवाजीराजांच्या लाल महालातच तळ ठोकला. शिवाजीराजांनी खानाचा बंदोबस्त करण्यासाठी एक धाडसी निर्णय घेतला तो म्हणजे लाल महालात शिरून खानाला संपविण्याचा. लाल महालात आणि अवतीभोवती खडा पहारा असे, आणि महालात शिरणे अतिशय जोखमीचे काम होते. एके रात्री लाल महालाजवळून जाणाऱ्या एका लग्नाच्या मिरवणुकीचा आधार घेऊन काही मोजक्या माणसांसह स्वतः शिवाजी महाराज लाल महालात शिरले. महालाचा कानाकोपरा माहीत असल्यामुळे लवकरच प्रत्यक्ष शाहिस्तेखानच्या खोलीत शिवाजी महाराजांनी प्रवेश केला. तोपर्यंत महालात कोठेतरी झटापट सुरू झाल्यामुळे शाहिस्तेखानना जाग आली आणि तेवढ्यातच शिवाजीराजांना समोर पाहून खाननी जीव वाचविण्यासाठी सरळ खिडकीतून खाली उडी घेतली. शिवाजी महाराजांनी चपळाईने केलेला वार हुकल्यामुळे खानाच्या प्राणावर बेतण्याऐवजी त्याची तीन बोटे कापली गेली. या प्रकरणामुळे मुघल साम्राज्याची जी नाचक्की झाली ती स्वराज्यासाठी अधिकच फायद्याची ठरली. जे राजे मुघल आश्रयामुळे शिवाजी महाराजांना जुमानत नसत ते आता शिवाजीराजांच्या पराक्रमामुळे त्यांच्या बाजूने झुकले. आणखी एक वेगळा परिणाम या प्रकरणामुळे झाला तो म्हणजे शिवाजीराजांना मिळालेला मानवी क्षमतेपेक्षा मोठा काल्पनिक दर्जा आणि त्यामुळे जोडलेल्या दंतकथा. अनेकदा या गोष्टीचा अप्रत्यक्ष फायदा शिवाजी महाराज किंवा त्यांच्या सैन्याला मिळाला. शत्रुसैन्यामध्ये शिवाजी महाराज घुसल्याच्या केवळ अफवा पसरवून संख्येने किरकोळ असलेल्या मावळ्यांनी संख्येने अनेक पटींनी मोठ्या सैन्याची उडविलेली दाणादाण ही याच गोष्टीची साक्ष देऊ शकते. इ.स. १६६३ सालचे शाहिस्तेखान प्रकरण शिवाजीराजांच्या जीवनात आणखी एका नाट्यमय प्रसंगाची भर घालून गेले.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
=== सुरतेचा पहिला छापा===&lt;br /&gt;
इ.स. १६६४. सततची युद्धे आणि त्यामुळे रिता होत असलेला खजिना यामुळे छत्रपती शिवाजीराजे चिंतित होते. मुघलांना किंवा इतर सुलतानांना ही चिंता फार सतावीत नसे. अन्याय्य कर लादून किंवा बळजबरीने खंडणी जनतेकडून वसूल करण्यात बादशाही कारभारास कमीपणा वाटत नव्हता. अनेक दिवसांच्या खलबतांनंतर छत्रपती शिवाजीराजांनी शेवटी एक उपाय शोधून काढला तो म्हणजे इतिहासाला माहीत असलेली सुरतेची पहिली लूट. आजच्या गुजरात राज्यातील सुरत शहर हे तत्कालीन मुघल राज्यात होते आणि व्यापारामुळे अतिशय श्रीमंत शहरांमध्ये गणले जात होते. सुरत शहरावरच्या छापमुळे दोन गोष्टी साध्य करता आल्या, एक म्हणजे मुघल सत्तेला आव्हान आणि राज्याच्या खजिन्यात भर. लुटीचा इतिहास भारतामध्ये अतिशय रक्तरंजित आणि विनाशक आहे. त्या पार्श्वभूमीवर सुरतेचा छापा ही पूर्णपणे वेगळी जाणवते.छत्रपती शिवाजीराजांच्या आज्ञेनुसार स्त्रिया, मुले आणि वृद्ध यांच्या केसालाही धक्का न लावता ही लूट केली गेली. [[मशिदी]], [[चर्च]] यासारख्या देवस्थानांनाही लुटीतून संरक्षण दिले गेले.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
=== मिर्झाराजे जयसिंहाची मोहीम ===&lt;br /&gt;
इ.स. १६६५. औरंगजेबाने त्याचे पराक्रमी सेनापती मिर्झाराजे जयसिंह याला प्रचंड सैन्यासह पाठविले. शिवाजीराजांचा प्रतिकार थिटा पडला आणि निर्णायक लढाईनंतर पुरंदरचा तह झाला आणि शिवाजीराजांना तहाच्या अटींनुसार मुघलांना २३ किल्ले द्यावे लागले. त्याबरोबरच स्वतः आग्रा (तत्कालीन मुघल राजधानी) येथे पुत्र संभाजी यासह औरंगजेबांसमोर हजर होण्याचे कबूल करावे लागले.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
आगऱ्याहून सुटका&lt;br /&gt;
 &lt;br /&gt;
=== शिवाजी महाराजांची आगऱ्यातील नजरकैद ===&lt;br /&gt;
इ.स. १६६६ साली औरंगजेबाने शिवाजीराजांना दिल्ली येथे भेटीसाठी आणि विजापूरवर त्यांनी केलेल्या आक्रमणावर चर्चा करण्यास बोलाविले. त्यानुसार शिवाजीराजे दिल्लीला पोहोचले. त्यांच्यासोबत नऊ वर्षांचा संभाजीदेखील होता. परंतु दरबारात त्यांना कनिष्ठ सरदारांच्या समवेत उभे करून शिवाजीसारख्या राजांचा उपमर्द केला. या अपमानामुळे अतिशय नाराज होऊन शिवाजीराजे तडक दरबाराबाहेर पडले असता त्यांना तत्क्षणी अटक करून नजरकैदेत ठेवण्यात आले. लवकरच त्यांची रवानगी जयसिंहाचे पुत्र मिर्झाराजे रामसिंग यांच्याकडे आग्रा येथे करण्यात आली. शिवाजीराजेंबद्दल आधीपासूनच धास्ती असल्यामुळे त्यांच्यावर कडक पहारा ठेवला होता. काही दिवस निघून गेले. सुटकेसाठी प्रयत्‍न फोल ठरले होते. शेवटी शिवाजीराजांनी एक योजना आखली. त्या योजनेनुसार त्यांनी आजारी पडल्याचे निमित्त केले आणि त्यांच्या प्रकृतीस्वास्थ्यासाठी विविध मंदिरांना मिठाईचे पेटारे पाठविण्यात येऊ लागले. सुरुवातीला पहारेकरी प्रत्येक पेटारा बारकाईने तपासून पहात पण काही दिवसांनी यात ढिलाई होऊ लागली. नंतर त्यांनी तपासण्याचेदेखील सोडले. या गोष्टीचा फायदा घेऊन एक दिवस शिवाजीराजे आणि संभाजी एकेका पेटाऱ्यामध्ये बसून निसटण्यात यशस्वी झाले. कोणास संशय येऊ नये यास्तव शिवाजीराजांचा विश्वासू हिरोजी फर्जंद हा शिवरायांचे कपडे चढवून आणि त्यांची अंगठी दिसेल अशा पद्धतीने हात बाहेर काढून झोपल्याचे नाटक करीत होता. शिवराय दूरवर पोहोचल्याची खात्री आल्यावर तो देखील पहारेकऱ्यांना बगल देऊन निसटला. बराच वेळ आतमध्ये काही हालचाल नाही हे वाटून पहारेकरी आत गेले असता त्यांना तेथे कोणीही आढळले नाही तेव्हा त्यांना सत्य परिस्थिती समजली.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
आग्रा येथून शिवाजीराजांनी वेषांतर केले आणि एका संन्याशाच्या वेषात महाराष्ट्रात प्रवेश केला. त्यातदेखील त्यांना अनेक खबरदाऱ्या घ्याव्या लागल्या. संभाजी महाराजांना त्यांनी वेगळ्या मार्गाने काही दुसऱ्या विश्वासू माणसांबरोबर पाठविले होते. ते स्वतः अतिशय लांबच्या आणि तिरकस, वाकड्या मार्गाने मजल-दरमजल करीत आले. उद्देश हाच होता की काही झाले तरी पुन्हा औरंगजेबाच्या हातात पडायचे नाही.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
यात आणखी एक गोष्ट उल्लेखनीय आहे. दिल्लीभेटीपूर्वी त्यांनी राज्यकारभारासाठी जे अष्टप्रधानमंडळ स्थापले होते, त्या मंडळाने राजांच्या अनुपस्थितीमध्ये देखील राज्याचा कारभार चोख चालविला होता. हे शिवाजीराजांचे आणि अष्टप्रधानमंडळाचे फार मोठे यश आहे&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==सर्वत्र विजयी घोडदौड==&lt;br /&gt;
शिवाजीराजे परतल्यानंतर त्यांनी झालेल्या अपमानाचा सूड घेण्यासाठी पुरंदरच्या तहात दिलेले सर्व तेवीस किल्ले जिंकून घेतले. इ.स. १६७९ मध्ये स्वतः औरंगज़ेब मोठ्या फौजेसह दक्षिणेच्या मोहिमेवर निघाले. याच दरम्यान ३ एप्रिल, इ.स. १६८० रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचे रायगडावर निधन झाले. त्यांच्यानंतर संभाजी राजांनी मुघलांचा कडवा प्रतिकार केला. औरंगजेबाने इ.स.१६८९मध्ये संभाजीराजे यांना ठार मारवले. २७ वर्षे सतत लढाई करूनही औरंगजे़बांच्या हाती काहीच लागले नाही.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
औरंगजे़ब कडवे धर्मवेडे होते. त्यांनी अनेक हिंदूना इस्लाममध्ये आणले. त्यातच दक्षिणेतील मोहीमेत अपेक्षेच्या उलट मराठ्यांनी कडवी झुंज दिल्याने एवढ्या प्रदीर्घ आणि खर्चिक मोहिमेतून त्यांना काहीच साधता आले नाही. जबरदस्तीच्या धर्मपरिवर्तनाच्या धोरणांमुळे औरंगजे़बाच्या इस्लामेतर सैन्यात बंडाळी खदखदू लागली. औरंगज़ेबांचा ३ मार्च, इ.स. १७०७ रोजी महाराष्ट्रातील अहमदनगर येथे मृत्यू झाला. औरंगजे़बानंतर मुघल साम्राज्याला हिंदुस्तानवर कधीच अधिराज्य गाजवता आले नाही. इ.स. १७५१ मध्ये दिल्लीची अवस्था इतकी बिकट बनली की पेशव्यांना &amp;quot;अहमदिया&amp;quot; करार करून दिल्लीच्या आणि &amp;quot;शहेनशहाच्या&amp;quot; संरक्षणाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घ्यावी लागली.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==मृत्यू==&lt;br /&gt;
औरंगजेबाचा मृत्यू वयाच्या ९१व्या वर्षी महाराष्ट्राच्या (भिंगार)अहमदनगर येथे झाला. व त्यांची कबर खुलदाबाद येथे आहे&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==औरंगजेबावरील मराठी पुस्तके==&lt;br /&gt;
* मुकद्दर कथा औरंगजेबाची २०२० (लेखक : स्वप्निल रामदास कोलते )&lt;br /&gt;
* अकबर ते औरंगजेब (१९२३) : मूळ इंग्रजी, लेखक : विल्यम हॅरिसन मूरलॅंड (१८६८ - १९३८).  मराठी भाषांतर [[राजेंद्र बनहट्टी]] &lt;br /&gt;
* आलमगीर ([[नयनतारा देसाई]])&lt;br /&gt;
* औरंगजेब : कुळकथा (लेखक : प्रा. रा.आ. कदम)&lt;br /&gt;
* औरंगजेब - शक्यता आणि शोकांतिका (लेखक : रवींद्र गोडबोले)&lt;br /&gt;
* औरंगजेब बादशाहाचें चरित्र, १८९६ ([[चि.गं. गोगटे]])&lt;br /&gt;
* मराठे व औरंगजेब (लेखक : सेतुमाधव पगडी)&lt;br /&gt;
* रणसंग्राम (मूळ इंग्रजी &amp;#039;फ्रॉंटियर्स&amp;#039; लेखिका : मेधा देशमुख भास्करन; मराठी अनुवादक - नंदिनी उपाध्ये) (शिवाजी आणि औरंगजेब यांच्या जीवनातील समकालीन प्रसंगांवर आधारलेली कादंबरी)&lt;br /&gt;
* शहेनशहा (लेखक : [[ना.सं. इनामदार]]).  हिंदी रूपांतर - शाहंशाह&lt;br /&gt;
* India of Aurangzeb : Topography, Statistics and Roads (१९०१) (लेखक : यदुनाथ सरकार)&lt;br /&gt;
* India Under Aurangzeb (मूळ इंग्रजी, लेखक : यदुनाथ सरकार, मराठी अनुवाद : `औरंगजेब&amp;#039; - डाॅ. श.गो. कोलारकर). पाच खंड&lt;br /&gt;
* औरंगजेबाचा इतिहास- [[भ.ग. कुंटे]] (जदुनाथ सरकार यांच्या History of Aurangzeb ह्या पाच खंडी ग्रंथाचा अनुवाद)&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==औरंगजेब रोड==&lt;br /&gt;
नवी दिल्लीतील औरंगजेब रोडचे नाव बदलून एपीजे अब्दुल कलाम रोड करण्यात आले. (२९-८-२०१५)&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
{{मराठा साम्राज्य}}&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
[[वर्ग:मुघल साम्राज्य]]&lt;br /&gt;
[[वर्ग:इ.स. १६१८ मधील जन्म]]&lt;br /&gt;
[[वर्ग:इ.स. १७०७ मधील मृत्यू]]&lt;br /&gt;
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]&lt;/div&gt;</summary>
		<author><name>ImportMaster</name></author>
	</entry>
</feed>