<?xml version="1.0"?>
<feed xmlns="http://www.w3.org/2005/Atom" xml:lang="mr">
	<id>https://mr.bharatpedia.org/w/index.php?action=history&amp;feed=atom&amp;title=%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3_%28%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%29</id>
	<title>काळ (वृत्तपत्र) - आवृत्ती इतिहास</title>
	<link rel="self" type="application/atom+xml" href="https://mr.bharatpedia.org/w/index.php?action=history&amp;feed=atom&amp;title=%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3_%28%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%29"/>
	<link rel="alternate" type="text/html" href="https://mr.bharatpedia.org/w/index.php?title=%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3_(%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0)&amp;action=history"/>
	<updated>2026-08-29T05:18:00Z</updated>
	<subtitle>विकिवरील या पानाच्या आवृत्त्यांचा इतिहास</subtitle>
	<generator>MediaWiki 1.43.6</generator>
	<entry>
		<id>https://mr.bharatpedia.org/w/index.php?title=%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3_(%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0)&amp;diff=2133&amp;oldid=prev</id>
		<title>ImportMaster: robot: Import pages using विशेष:आयात</title>
		<link rel="alternate" type="text/html" href="https://mr.bharatpedia.org/w/index.php?title=%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3_(%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0)&amp;diff=2133&amp;oldid=prev"/>
		<updated>2022-05-01T11:06:19Z</updated>

		<summary type="html">&lt;p&gt;robot: Import pages using &lt;a href=&quot;/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4&quot; title=&quot;विशेष:आयात&quot;&gt;विशेष:आयात&lt;/a&gt;&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;b&gt;नवीन पृष्ठ&lt;/b&gt;&lt;/p&gt;&lt;div&gt;&amp;#039;&amp;#039;&amp;#039;काळ&amp;#039;&amp;#039;&amp;#039; या वृत्तपत्राची सुरुवात [[शिवराम महादेव परांजपे]] यांनी केली. हे पत्र सुरू झाले तो काळ राजकीय चळवळीला व वृत्तपत्रांना खूपच प्रतिकूल होता.पण शिवरामपंतंवर झालेल्या शैक्षणिक व इतर संस्कारांमुळे अशा परिस्थितीतहि पत्र सुरू करण्याचे धाडस यांनी दाखविले. &amp;quot;धार्मिक,सामाजिक,राजकीय,ऐतिहासिक आणि वाङ्मयीन विषयांची निःपक्षपाताने व निर्भयपणे पूर्ण चर्चा करणारे साप्ताहिक &amp;quot; अशी जाहिरात करून २५ मार्च १८९८ रोजी हे वृत्तपत्र सुरू झाले.&amp;lt;ref&amp;gt;{{स्रोत पुस्तक|title=मराठी वृत्तपत्रांचा इतिहास|last=लेले|first=रा.के.|publisher=कॉंटिनेंटल प्रकाशन|year=१९७४|isbn=|location=पुणे|pages=}}&amp;lt;/ref&amp;gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
== उद्दिष्टे ==&lt;br /&gt;
काळ या शब्दाची व्यापक कल्पना स्पष्ट करणारा अग्रलेख शिवरामपंतांनी पहिल्याच अंकात लिहला. यात प्रतिभा कल्पकता आणि देशभक्तीची चुणूक दिसते.काळ हा सर्वसाक्षी आहे तसा सर्वविनाशीही आहे,आपल्या अग्रलेखात कालतत्त्वाचे मोठे विलोभनीय व व्यापक रूप त्यांनी उभे केले होते. आपल्या पत्राचा उदेश बाळबोधपणे सांगण्यापेक्षा काव्यमय कल्पकतेने त्यांनी सांगितला. शिवरामपंतांना काळ हे नाव टाइम्स या इंग्रजी पत्रावरून सुचले असावे. कारण केसरीत जाहिरात करताना काळच्या नावाखाली त्यांनी इंग्रजीत [[द टाइम्स ऑफ इंडिया|टाइम्स]] हा शब्द लिहला होता काळ या शोब्दातून ध्वनित होणारे काळ घडवणारे,काळावर प्रभुत्व गाजविणे, इंग्रजांसाठी काळ असे अनेक प्रकारचे कार्य या पत्राने केले. या पत्रातील शिवरामपंतांच्या लेखनात निबंधात स्वत्रांची आकांक्षा आणि प्रखर राष्टीय बाणा याचा उत्कट आणि प्रभावी अविष्कार झालेला दिसतो वक्रोक्ती-व्याजोक्तीची धार असलेली लेखणी यांनी अस्त्राप्रमाणे वापरून प्रतिपक्षाला नामोहरम केले.&amp;lt;br&amp;gt;&lt;br /&gt;
== प्रवास ==&lt;br /&gt;
वृत्तपत्राचा प्रसिद्धीचा वार शुक्रवार होता. लोकांत दृढमुल व रूढ झालेल्या कित्येक राजकीय कल्पनांच्या उच्छेदासाठी काळाचा जन्म आहे. असे हे पत्र काढण्यामागचे उदिष्ट शिवरामपंतांनी जाहीर केले होते. लोकांच्या मनात पारतंत्र्याची चीड निर्माण व्हावी व त्यांनी स्वतंत्राचा ध्यास घ्यावा, असा आपल्या मनातील विचार लोकांपर्यंत पोचविण्याचे व्यापक व्यासपीठ निर्माण करावे या विचाराने काळची निर्मिती झाली. असा विशिष्ट मताचा प्रचार हेच मुख्य उदिष्ट असल्याने काळ मध्ये बातम्याना फारसे स्थान नव्हते. काही जाहिराती,थोड्या बातम्या वगळल्या,तर सर्व मजकूर शिवरामपंतांचाच असे. त्यांच्या लेखनात भावनेला अधिक प्राधान्य होते आणि लेखनही शैलीदार होते.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
काळ मधील कडक लेखनाची छापखानेवाल्यांना भीती वाटली. सरकारच्या रोषाला बळी पडू असे वाटल्याने त्यांनी पत्र छापण्यास नकार दिला. यांची कल्पना असल्याने शिवरामपंतांनी आपला स्वतंत्र छापखाना काढला. पुढे लोकप्रियता वाढत गेल्याने काळ ने लवकरच त्यांना चांगली परिस्थिती प्राप्त करून दिली. अर्थात हा व्यवसाय त्यांनी पैशासाठी अजिबातच सुरू केला नव्हता.&amp;lt;ref&amp;gt;{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand17/index.php/23-2015-01-15-05-42-45/9964-2012-06-14-09-33-10?showall=&amp;amp;start=12|title=वृत्तपत्रे|last=अकलूजकर|पहिले नाव=प्रसन्नकुमार|दिनांक=|संकेतस्थळ=http://marathivishwakosh.maharashtra.gov.in|archive-url=|archive-date=|dead-url=|ॲक्सेसदिनांक=१५ जानेवारी २०१९}}&amp;lt;/ref&amp;gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
[[वर्ग:भारतीय स्वातंत्र्यलढ्याशी संबंधित साहित्य]]&lt;br /&gt;
[[वर्ग:वृत्तपत्रे]]&lt;/div&gt;</summary>
		<author><name>ImportMaster</name></author>
	</entry>
</feed>