<?xml version="1.0"?>
<feed xmlns="http://www.w3.org/2005/Atom" xml:lang="mr">
	<id>https://mr.bharatpedia.org/w/index.php?action=history&amp;feed=atom&amp;title=%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%9C%E0%A5%80_%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%BE</id>
	<title>जमशेदजी टाटा - आवृत्ती इतिहास</title>
	<link rel="self" type="application/atom+xml" href="https://mr.bharatpedia.org/w/index.php?action=history&amp;feed=atom&amp;title=%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%9C%E0%A5%80_%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%BE"/>
	<link rel="alternate" type="text/html" href="https://mr.bharatpedia.org/w/index.php?title=%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%9C%E0%A5%80_%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%BE&amp;action=history"/>
	<updated>2026-08-25T11:04:37Z</updated>
	<subtitle>विकिवरील या पानाच्या आवृत्त्यांचा इतिहास</subtitle>
	<generator>MediaWiki 1.43.6</generator>
	<entry>
		<id>https://mr.bharatpedia.org/w/index.php?title=%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%9C%E0%A5%80_%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%BE&amp;diff=704&amp;oldid=prev</id>
		<title>ImportMaster: robot: Import pages using विशेष:आयात</title>
		<link rel="alternate" type="text/html" href="https://mr.bharatpedia.org/w/index.php?title=%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%9C%E0%A5%80_%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%BE&amp;diff=704&amp;oldid=prev"/>
		<updated>2022-05-01T17:13:22Z</updated>

		<summary type="html">&lt;p&gt;robot: Import pages using &lt;a href=&quot;/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4&quot; title=&quot;विशेष:आयात&quot;&gt;विशेष:आयात&lt;/a&gt;&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;b&gt;नवीन पृष्ठ&lt;/b&gt;&lt;/p&gt;&lt;div&gt;[[चित्र:JNTata.jpg|thumb|right|250px|{{लेखनाव}}]]&lt;br /&gt;
&amp;#039;&amp;#039;&amp;#039;जमशेदजी नसरवानजी टाटा&amp;#039;&amp;#039;&amp;#039;  (३ मार्च, इ.स. १८३९ - १९ मे, इ.स. १९०४) [[पारशी]], [[भारत|भारती]]य उद्योजक होते. [[टाटा उद्योगसमूह]] या भारतातल्या आघाडीच्या उद्योगसमूहाचे ते संस्थापक होते. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
त्यांचा जन्म [[गुजरात]]मध्ये [[नवसारी]] येथे झाला. त्यांना [[दोराबजी टाटा|दोराबजी]] आणि [[रतनजी जमसेटजी टाटा|रतनजी]] अशी दोन अपत्ये होती. [[जमशेदपूर]] येथील पोलाद कारखाना, [[मुंबई]]चे [[ताजमहाल हॉटेल - पॅलेस अँड टॉवर|ताजमहाल हॉटेल]], [[बंगळूर|बंगळुरातील]] इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अशा अनेक संस्थांची स्थापना ही त्यांची महत्त्वाची कार्ये होत. त्यांनी नंतर टाटा समूह उद्योगाची स्थापना केली. टाटांना &amp;quot;भारतीय उद्योगाचे जनक&amp;quot; म्हणून ओळखले जाते. आज त्यांच्या योगदानामुळे भारतीय उद्योगास विदेशांत ओळख मिळाली. ज्यावेळी भारत आर्थिक संकटांशी झगडत होता त्या वेळी त्यांनी चपळतेने टाटा ग्रुप आणि कंपनीची मुहूर्तमेढ रोवली. त्यांचे असे मत होते की आम्ही सरळ कोणतेच मोठे काम करू शकत नाही, कोणतेही मोठे काम करण्यासाठी आधी छोटी-छोटी कामे करण्याची आवश्यकता असते. उद्योगजगतात त्यांचा इतका प्रभाव होता की जवाहरलाल नेहरूंनी टाटा यांना वन-मॅन प्लॅनिंग कमिशन म्हणून संबोधले.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&amp;lt;blockquote&amp;gt;&amp;quot;जेव्हा तुम्हाला कृतीत, कल्पनांमध्ये आघाडी द्यायची असते - अशी आघाडी जी मताच्या वातावरणाशी जुळत नाही - ते खरे धैर्य, शारीरिक किंवा मानसिक किंवा आध्यात्मिक, तुम्हाला जे आवडते ते म्हणा आणि हा प्रकार जमशेदजी टाटा यांनी दाखवलेले धैर्य आणि दूरदृष्टी आहे. आपण त्यांच्या स्मृतीचा सन्मान केला पाहिजे आणि आधुनिक भारताचे एक मोठे संस्थापक म्हणून त्यांचे स्मरण केले पाहिजे हे योग्य आहे.&amp;quot; - [[जवाहरलाल नेहरू]]&amp;lt;/blockquote&amp;gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==सुरुवातीचे जीवन==&lt;br /&gt;
जमशेदजी नसरवानजी टाटा यांचा जन्म ३ मार्च १८३९ रोजी दक्षिण गुजरातमधील नवसारी शहरात झाला. त्यांचे वडील [[नसरवानजी]] व आई [[जीवनबाई टाटा]] हे त्यांच्या पारशी कुटुंबातील पहिले व्यापारी होते. कुटुंबाची परंपरा तोडून त्यांनी मुंबईत निर्यात व्यापार संस्था सुरू केली.&lt;br /&gt;
जमशेदजी टाटा १४ व्या वर्षी मुंबईत आपल्या वडिलांकडे आले. आणि त्यांनी एलफिन्स्टन महाविद्यालयातून आपले ग्रॅज्युएशन पूर्ण केले. तेथे ते कॉलेजातील एक हुशार विद्यार्थी म्हणून ओळखले जात होते. त्यांची बुद्धिमत्ता पाहून काॅलेजच्या प्रिन्सिपाॅलांनी त्यांची डिग्री समाप्त होईपर्यंतची पूर्ण फी परत केली. जमशेदजीनी १६ वर्षाचे असताना १० वर्षाच्या हीराबाई दबू हिच्याशी विवाह केला. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
१८५८ मध्ये जमशेदजींनी महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली आणि आपल्या वडिलांच्या व्यवसायामध्ये प्रवेश घेतला. १८५७ सालचे भारतीय बंड [[ब्रिटिश साम्राज्य|ब्रिटिश]] शासनाने दडपून काढले होते. ब्रिटिश सरकारच्या विरुद्धचा विद्रोह त्यावेळी नवीनच होता. मात्र टाटांनी अशा परिस्थितीतही आपल्या व्यापारास शिखरावर घेऊन जाण्याचा निश्चय केला. आपल्या वडिलांच्या व्यवसायाच्या शाखा स्थापन करण्यासाठी टाटा यांनी [[इंग्लंड]], [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]], [[युरोप]], [[चीन]] आणि [[जपान]] सारख्या परदेशांत अनेकदा प्रवास केला.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==व्यवसाय==&lt;br /&gt;
१८६८ पर्यंत टाटा आपल्या वडिलांच्या कंपनीत काम करत होते. त्यावर्षी त्यांनी एका स्वतंत्र कंपनीची स्थापना केली. १८९६ मध्ये [[चिंचपोकळी]] येथील एक दिवाळखोर तेल गिरणी विकत घेतली आणि तिची एका कापडाच्या गिरणीत रूपांतर केले. या गिरणीचे नाव त्यांनी अलेक्झांड्रा मिल असे ठेवले. पुढे दोन वर्षांनंतर नफा मिळवण्यासाठी ती मिल टाटांनी विकली आणि १८७४ मध्ये [[नागपूर]]ला एका स्पिनिंग मिलची स्थापना केली, १ जानेवारी १८७७ रोजी त्यांनी एम्प्रेस मिलची स्थापना केली.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
त्यांच्या जीवनात चार ध्येये होती. एक पोलाद कंपनी, एक जागतिक दर्जाची शिक्षण संस्था, एक अद्वितीय हॉटेल आणि एक हायड्रो-इलेक्ट्रिक वीजनिर्मिती कंपनी. ३ डिसेंबर १९०३ रोजी मुंबईतील कुलाबा वॉटरफ्रंट येथील ताजमहल हॉटेलचेया उद्घाटन झाले. त्यावेळी भारतात स्वतःची वीज असणारे ते एकमेव हॉटेल होते.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==टाटा स्टील==&lt;br /&gt;
[[टाटा स्टील]] (पूर्वी टिस्को - टाटा आयर्न आणि स्टील कंपनी लिमिटेड) ही [[आशिया]]तील पहिली आणि भारतातील सर्वात मोठी स्टील कंपनी आहे. तिच्या कोरस ग्रुपने दरवर्षी २.८ कोटी टन स्टीलचे उत्पादन केल्यानंतर ती जगातील पाचव्या क्रमांकाची स्टील कंपनी ठरली.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==टाटांनी स्थापन केलेल्या अन्य संस्था== &lt;br /&gt;
[[चित्र:Iisc-Founder.jpg|thumb|right| इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बेंगलोर येथील टाटांचा पुतळा]] &lt;br /&gt;
* बंगलोरची इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स :  विज्ञान आणि अभियांत्रिकी यांमधील संशोधन आणि शिक्षणासाठी  प्रख्यात भारतीय संस्था.&lt;br /&gt;
* टाटा हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर सप्लाय कंपनी (नवीन नाव -  टाटा पॉवर कंपनी) : ८००० मेगावॅटपेक्षा जास्त क्षमतेच्या स्थापित क्षमतेची भारतातील सर्वात मोठी खाजगी वीज कंपनी.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==व्यक्तिगत जीवन==&lt;br /&gt;
टाटांनी हिराबाई दाबू यांच्याशी विवाह केला. त्यांची मुले दोराबजी टाटा आणि रतन टाटा यांना सुद्धा टाटा ग्रुपचे अध्यक्ष म्हणून यश मिळाले. टाटाची बहीण जेरबाईने मुंबईतील एका व्यापाऱ्याशी लग्न केले. त्यांचा मुलगा त्यांना शापुरजी सकलातवाला हे बिहार आणि ओरिसामध्ये टाटा ग्रुपचे कोळशाचा व लोखंडाचा व्यापार सांभाळत होते. नंतर ते टाटांचे मॅन्चेस्टर कार्यालय सांभाळण्यासाठी इंग्लंडला निघून गेले आणि नंतर ब्रिटिश संसदेचे सदस्य झाले.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==मृत्यू==&lt;br /&gt;
१९०० साली व्यवसायानिमित्त जर्मनीला गेले असताना ते खूप आजारी पडले. १९ मे १९०४ रोजी बॅड नौहैम या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर इंग्लंडमधील पारशी समाजाच्या ब्रूकवूड दफन भूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==वारसा==&lt;br /&gt;
झारखंडमधील साचि गावात टाटांचा लोखंड व पोलाद प्रकल्प उभारला गेला. येथील रेल्वे स्टेशनचे नाव टाटानगर असे ठेवले गेले. आता झारखंडमधील जमशेदपूर या नावाने ओळखले जाणारे हे एक मोठे शहर आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==पुस्तके==&lt;br /&gt;
*आर. एम. लाला (१ मे २००६). द लव ऑफ इंडिया: द लाइफ ॲंड टाइम्स ऑफ जमशेदजी टाटा पेंग्विन पुस्तकं &lt;br /&gt;
*दीनशॉ एडुलजी वाका (१९१५). जे. एन. टाटाचे जीवन आणि जीवन कार्यः&lt;br /&gt;
*टाटायन-गिरीश कुबेर. टाटा उद्योगसमूहाची समग्र माहिती देणारे मराठीतील पुस्तक.&lt;br /&gt;
प्रकाशन-राजहंस प्रकाशन.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==टाटांचा जीवन परिचय==&lt;br /&gt;
*१८३९- ३ मार्चला जमशेदजी टाटांचा जन्म झाला.&lt;br /&gt;
*१८५३- हीराबाई दबू सोबत लग्न झाले.&lt;br /&gt;
*१८५८- आपल्या वडिलांच्या व्यवसायमध्ये सहभागी झाले.&lt;br /&gt;
*१८६८- स्वतःची कंपनी स्थापन केली.&lt;br /&gt;
*१८७४- महारानी मीलची स्थापना केली.&lt;br /&gt;
*१९०१- यूरोप आणि अमेरिकेची यात्रा केली, जेणे करून स्टीलचे शिक्षण घेता येईल.&lt;br /&gt;
*१९०३- ताज महल हॉटेलची स्थापना केली.&lt;br /&gt;
*१९०४- १९ मेला देहवास झाला.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==सुविचार==&lt;br /&gt;
&amp;quot;स्वातंत्र्याचे समर्थन करण्याची ताकद नसणे आणि आवश्यक असल्यास त्याचे रक्षण करणे, हा एक क्रूर भ्रम असेल आणि स्वातंत्र्याचे रक्षण करण्याची ताकद केवळ व्यापक औद्योगिकीकरण आणि देशाच्या आर्थिक जीवनात आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या ओतणेतूनच येऊ शकते.&amp;quot;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&amp;quot;मुक्त उपक्रमात, समुदाय हा केवळ व्यवसायातील दुसरा भागधारक नसून, खरे तर त्याच्या अस्तित्वाचा उद्देश आहे.&amp;quot;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&amp;quot;आमच्यात एक प्रकारचा दानधर्म पुरेसा आहे... तो म्हणजे गोधडी परोपकार जी चिंध्या झालेल्यांना कपडे घालते, गरिबांना खायला घालते आणि आजारी लोकांना बरे करते. मी गरीब किंवा दुःखी माणसाला मदत करू पाहणाऱ्या उदात्त भावनेचा निषेध करण्यापासून दूर आहे. असणं... एखाद्या राष्ट्राची किंवा समाजाची प्रगती ही त्याच्या सर्वात कमकुवत आणि असहाय्य सदस्यांना मदत करण्याइतकी नाही तर सर्वोत्तम आणि सर्वात प्रतिभावान व्यक्तींना उंचावणे, जेणेकरून त्यांना देशाची सर्वात मोठी सेवा करता येईल. .&amp;quot;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&amp;quot;झटपट वाढणारी विविध प्रकारची सावली असलेली झाडे लावलेले रुंद रस्ते निश्चित करा. लॉन आणि बागांसाठी भरपूर जागा आहे याची खात्री करा. फुटबॉल, हॉकी आणि उद्यानांसाठी मोठी जागा राखून ठेवा. हिंदू मंदिरांसाठी जागा निश्चित करा, मोहम्मद मशिदी आणि ख्रिश्चन चर्च.&amp;quot; -&amp;#039;&amp;#039;&amp;#039;टाटा यांनी मुलगा दोराबला लिहिलेल्या पत्रात त्यांच्या टाउनशिपबद्दलच्या त्यांच्या दृष्टीबद्दल सांगितले जे कालांतराने जमशेदपूर होईल.&amp;#039;&amp;#039;&amp;#039;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&amp;quot;तो लोकांच्या नजरेत डोकावणारा माणूस नव्हता. त्याला सार्वजनिक मेळावे आवडत नव्हते, भाषणे करायची त्याची पर्वा नव्हती, त्याच्या चारित्र्याच्या बळकटपणाने कोणत्याही माणसावर कितीही मोठेपणा येण्यापासून रोखले, कारण तो स्वतः महान होता. स्वतःच्या मार्गाने, बहुतेक लोकांपेक्षा मोठे. त्याने सन्मान मागितला नाही आणि त्याने कोणत्याही विशेषाधिकाराचा दावा केला नाही, परंतु भारताची आणि तिच्या असंख्य लोकांची प्रगती ही त्याच्याबरोबर कायमची उत्कट इच्छा होती.&amp;quot; &amp;#039;&amp;#039;&amp;#039;टाटा यांच्या निधनाबद्दल टाइम्स ऑफ इंडिया&amp;#039;&amp;#039;&amp;#039;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&amp;quot;जरी इतर अनेकांनी गुलामगिरीच्या साखळ्या सोडवण्यावर आणि स्वातंत्र्याच्या पहाटेच्या दिशेने वाटचाल झपाट्याने करण्याचे काम केले, तर टाटांनी स्वप्न पाहिले आणि ते मुक्तीनंतर जसे घडले पाहिजे तसे जीवनासाठी काम केले. इतर बहुतेकांनी गुलामगिरीच्या वाईट जीवनातून मुक्तीसाठी काम केले. टाटांनी आर्थिक स्वातंत्र्याचे चांगले जीवन जगण्यासाठी स्वातंत्र्यासाठी काम केले.&amp;quot; -&amp;#039;&amp;#039;&amp;#039;डॉ झाकीर हुसेन, भारताचे माजी राष्ट्रपती&amp;#039;&amp;#039;&amp;#039;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&amp;quot;तो नशिबाचा माणूस होता हे स्पष्ट आहे. खरंच, जणू काही त्याच्या जन्माची वेळ, त्याचे जीवन, त्याची प्रतिभा, त्याची कृती, त्याने ज्या घटना घडवल्या किंवा प्रभावित केल्या त्या घटनांची साखळी आणि त्याने केलेल्या सेवा. आपल्या देशाला आणि त्याच्या लोकांसाठी प्रदान केलेले, हे सर्व भारताच्या महान नशिबाचा भाग म्हणून पूर्व-नियत होते.&amp;quot; - &amp;#039;&amp;#039;&amp;#039;जे. आर. डी. टाटा&amp;#039;&amp;#039;&amp;#039;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&amp;quot;आजच्या पिढीतील कोणत्याही भारतीयाने भारताच्या वाणिज्य आणि उद्योगासाठी यापेक्षा जास्त काम केले नव्हते.&amp;quot; —&amp;#039;&amp;#039;&amp;#039;लॉर्ड कर्झन, टाटा यांच्या निधनानंतर भारताचे व्हाईसरॉय&amp;#039;&amp;#039;&amp;#039;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==संदर्भ==&lt;br /&gt;
{{विस्तार}}&lt;br /&gt;
{{टाटा समूह}}&lt;br /&gt;
{{DEFAULTSORT:टाटा,जमशेदजी}}&lt;br /&gt;
[[वर्ग:पारशी व्यक्ती]]&lt;br /&gt;
[[वर्ग:भारतीय उद्योगपती]]&lt;br /&gt;
[[वर्ग:पोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती]]&lt;br /&gt;
[[वर्ग:इ.स. १८३९ मधील जन्म]]&lt;br /&gt;
[[वर्ग:इ.स. १९०४ मधील मृत्यू]]&lt;br /&gt;
[[वर्ग:टाटा कुटुंब]]&lt;/div&gt;</summary>
		<author><name>ImportMaster</name></author>
	</entry>
</feed>