<?xml version="1.0"?>
<feed xmlns="http://www.w3.org/2005/Atom" xml:lang="mr">
	<id>https://mr.bharatpedia.org/w/index.php?action=history&amp;feed=atom&amp;title=%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A4%97%E0%A4%A1</id>
	<title>जयगड - आवृत्ती इतिहास</title>
	<link rel="self" type="application/atom+xml" href="https://mr.bharatpedia.org/w/index.php?action=history&amp;feed=atom&amp;title=%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A4%97%E0%A4%A1"/>
	<link rel="alternate" type="text/html" href="https://mr.bharatpedia.org/w/index.php?title=%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A4%97%E0%A4%A1&amp;action=history"/>
	<updated>2026-08-26T11:01:11Z</updated>
	<subtitle>विकिवरील या पानाच्या आवृत्त्यांचा इतिहास</subtitle>
	<generator>MediaWiki 1.43.6</generator>
	<entry>
		<id>https://mr.bharatpedia.org/w/index.php?title=%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A4%97%E0%A4%A1&amp;diff=2243&amp;oldid=prev</id>
		<title>ImportMaster: robot: Import pages using विशेष:आयात</title>
		<link rel="alternate" type="text/html" href="https://mr.bharatpedia.org/w/index.php?title=%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A4%97%E0%A4%A1&amp;diff=2243&amp;oldid=prev"/>
		<updated>2022-05-01T17:57:57Z</updated>

		<summary type="html">&lt;p&gt;robot: Import pages using &lt;a href=&quot;/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4&quot; title=&quot;विशेष:आयात&quot;&gt;विशेष:आयात&lt;/a&gt;&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;b&gt;नवीन पृष्ठ&lt;/b&gt;&lt;/p&gt;&lt;div&gt;[[File:Jaigad-Fort-Ratnagiri.JPG|thumb|जयगड किल्ला दृश्य]]&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&amp;#039;&amp;#039;&amp;#039;जयगड&amp;#039;&amp;#039;&amp;#039; हा [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील एक  किल्ला आहे. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २१ जून, इ.स. १९१० रोजी [[महाराष्ट्रातील संरक्षित स्मारके|महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक]] म्हणून घोषित केलेले आहे.&amp;lt;ref&amp;gt;{{संकेतस्थळ स्रोत | दुवा=http://www.asimumbaicircle.com/Gazette%20Notification/Ratnagiri/1.pdf | प्रकाशक=आर्किओलॉजीकल सर्व्हे ऑफ इंडिया, मुंबई सर्कल | भाषा=इंग्रजी | title=गॅझेट नोटिफिकेशन | ॲक्सेसदिनांक=११ ऑक्टोबर, इ.स. २०१३}}&amp;lt;/ref&amp;gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==भौगोलिक स्थान==&lt;br /&gt;
जयगडाचा किल्ला पठारावर आहे. हे पठार समुद्रात काहीसे आत घुसलेले असल्यामुळे याच्या तिन्ही बाजुंना सागराने घेरलेले आहे. येथेच शाल्मीही नदी सागराला येऊन मिळते. त्यामुळे नैसर्गिक आणि सुरक्षीत असे बंदर म्हणून जयगड पुर्वीपासून प्रसिद्ध आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
जयगड हे गाव किल्ल्याच्या दक्षिणेकडील उतारावर वसलेले आहे. जयगड हे गाव सध्या जिंदाल औष्णिक प्रकल्पामुळे बरेच प्रसिद्धीला आले आहे. जयगड गावात जाणाऱ्या फाटय़ापासून आपण पाच मिनिटांमधे जयगडाचा बालेकिल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ येऊन पोहोचतो.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==कसे जाल ?==&lt;br /&gt;
मुंबई-पणजी महामार्गावरील संगमेश्वर हे गाव ओलांडल्यावर घाटाच्या माथ्यावर निवळी फाटा लागतो. येथून जयगडाला अथवा गणपतीपुळे येथे जाण्यासाठी गाडीमार्ग आहे. तसेच रत्‍नागिरी कडून गणपतीपुळे मालगुंड मार्गेही जयगड गाठता येतो. वैशिष्टपूर्ण निसर्गसौंदर्य जयगड किल्ल्याला लाभलेले आहे. कोकण किनारपट्टी व निसर्गसौंदर्याने नटलेल्या कोकण परिसरामध्ये मोठ्या दिमाखात जयगड किल्ला इतिहासाची साक्ष देत उभा आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==इतिहास==&lt;br /&gt;
किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व सांगणारे १६ व्या शतकातील संदर्भ उपलब्ध आहेत. हा किल्ला विजापूरकरांनी बांधला असला तरी फार काळ त्यांना किल्ला ताब्यात ठेवता आला नाही. १५७८-८० च्या दरम्यान संगमेश्वराच्या नाईकांनी किल्ल्याचा ताबा घेतला. आदिलशाहने अनेकदा किल्ला मिळविण्याचे प्रयत्न करूनही त्यास यश आले नाही. पुढे १६९५ च्या दरम्यान हा किल्ला कान्होजी आंग्रे यांच्याकडे होता. १८१८ च्या इंग्रज-मराठा युद्धाच्यावेळी हा किल्ला सहजपणे इंग्रजांना मिळाला. महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा किल्ला म्हणून जयगड किल्ला ओळखला जातो. निसर्गसंपन्न आणि सौंदर्य हे या किल्ल्याचे वैशिष्ट्य आहे&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==छायाचित्रे==&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे==&lt;br /&gt;
[[File:Jaigadh fort 4.jpg|thumb|गडावरील दृश्य]]&lt;br /&gt;
[[File:JaigadhFortDSC02818.jpg|thumb|गडावरील वास्तू]]&lt;br /&gt;
सध्या या बालेकिल्ल्याचा संपूर्ण परिसर तारेची जाळी लावून संरक्षीत केलेला आहे. प्रवेशद्वाराच्या बाहेर सात-आठ फूट खोलीचा खंदक आहे. हा कातळकोरीव खंदक असून तो पाण्याने भरण्यासाठी बनविलेला नाही. त्यामुळे तो कायमच कोरडा असतो. शत्रू तटाला येऊन भिडू नये म्हणून हा खंदक बालेकिल्ल्या भोवती खोदलेला आहे. प्रवेशद्वाराच्या डावीकडून तटबंदीला वळला घालून गेलेला खंदक पार खालपर्यंत नेलेले आहे. उजवीकडील बाजुला खंदकाला एक प्रवेशद्वारही केलेले आहे. खंदकाला प्रवेशद्वार असलेली ही रचना वेगळ्या प्रकारची आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
दोन बुरुजांमधे लपवलेला दरवाजा आहे. प्रवेशद्वारावर पुर्वी नगारखाना असावा अशी त्याची रचना आहे. काही वर्षापुर्वीपर्यंत या नगारखान्याच्या जागेत एक उत्तम विश्रामगृहही बांधलेले होते. सध्या ते बंद केल्यामुळे पूर्णपणे मोडकळीस आलेले आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
दरवाजावर कमलपुष्पे कोरलेली आहेत. दरवाजामधे पहारेकऱ्यांच्या देवडय़ा आहेत. आत आल्यावर तटबंदीवर जाण्यासाठी पायऱ्यांचा मार्ग दिसतो. तटबंदीवर जाण्यासाठी जागोजागी असे मार्ग केलेले आहेत. तटबंदीच्या मधल्या जागेत एक तीन मजली उंच इमारत आपले लक्ष वेधून घेते. या भव्य इमारतीचे छत नष्ट झालेले आहे. याला वाडा अथवा राजवाडा असेही म्हणतात. काहीजण याला कान्होजी आंग्रे यांचा वाडा असेही म्हणतात.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
या वाडय़ाशेजारीच पाण्याची मोठी विहीर आहे. मात्र ती झाडी झुडुपांनी पूर्णपणे झाकली गेली आहे. बाजुलाच गणपतीचे मंदिर आहे. गणपती मंदिरासमोर लहानशी दीपमाळ आहे. दीपमाळेजवळच जयबाचे स्मारक आहे. तटाला लागूनच असलेले हे स्मारक जयबाच्या बलीदानाची स्मृती म्हणून उभारलेले आहे. जयगडाची बांधणी करताना त्याचा तट वारंवार ढासळत होता. त्याचे बांधकाम पक्के व्हावे म्हणून नरबळी द्यावा लागेल अशी लोकांची समजूत होती. तटबंदीच्या नरबळीसाठी जयबा तयार झाला. त्याला तटबंदीमध्ये जीवंत चिणून तटाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. जयबाच्या या त्यागपूर्ण बलीदानामुळे तटबंदी उभी राहीली. म्हणून गडाचे नाव जयगड ठेवण्यात आले अशी कथा प्रसिद्ध आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
तटबंदीवरून पूर्ण गडफेरी करता येते. गडावरून समुद्राकडील देखवा उत्तम दिसतो. तटबंदीमधील बुरुज गोलाकार असून त्यामध्ये जागोजागी माऱ्याच्या जागा केलेल्या आहेत. बुरुजावर तोफांसाठी केलेली सोय दिसते मात्र तोफां आढळत नाहीत. गडफेरी करण्यासाठी तास दीडतासाचा अवधी पुरेसा आहे. दरवाजाच्या बाहेरील खंदकामधील दरवाजातून आत गेल्यावर खंदकाच्या टोकाकडील भागात पायऱ्या आहेत. येथून खालच्या भागात जाता येते. खाली जांभ्या दगडा कोरलेली गुहा आहे. या गुहेत मोहमाया देवीचे मंदिर असून ही ग्रामस्थ असलेल्या घाटगे यांची कुलदेवता आहे. समुद्रकाठापर्यंत उतरल्यावर एक लहान दरवाजा तसेच बुरुज ही पहायला मिळतात. समुद्राकाठचा पडकोटाचा भाग पाहून आपण डांबरी सडकेने धक्क्याकडे येवू शकतो व येथून आपण करहाटेश्वर मंदिराकडेही जावू शकतो.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==गडावरील राहायची सोय==&lt;br /&gt;
==गडावरील खाण्याची सोय==&lt;br /&gt;
जयगड हा कमी उंची असलेला गड असला तरी देखील तेथे तात्काळ पाणी उपलब्ध होत नाही. तरी आपण आपल्या सोबत पाणी व जेवणासाठी डबा असु द्यावा. जय शिवाजी जय भवानी.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
== संदर्भ आणि नोंदी ==&lt;br /&gt;
{{संदर्भयादी}}&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==संदर्भ==&lt;br /&gt;
* [[सांगाती सह्याद्रीचा]] - यंग झिंगारो&lt;br /&gt;
* [[डोंगरयात्रा]] - [[आनंद पाळंदे]]&lt;br /&gt;
* [[दुर्गदर्शन]] - [[गो. नी. दांडेकर]]&lt;br /&gt;
* [[दुर्ग|किल्ले]] - गो. नी. दांडेकर&lt;br /&gt;
* [[दुर्गभ्रमणगाथा]] - गो. नी. दांडेकर&lt;br /&gt;
* [[ट्रेक द सह्याद्रीज]] (इंग्लिश) - [[हरीश कापडिया]]&lt;br /&gt;
* [[सह्याद्री पुस्तक|सह्याद्री]] - [[स. आ. जोगळेकर]]&lt;br /&gt;
* [[दुर्गकथा]] - [[निनाद बेडेकर]]&lt;br /&gt;
* [[दुर्गवैभव]] - निनाद बेडेकर&lt;br /&gt;
* [[इतिहास दुर्गांचा]] - निनाद बेडेकर&lt;br /&gt;
* [[महाराष्ट्रातील दुर्ग]] - निनाद बेडेकर&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
== हे सुद्धा पहा==&lt;br /&gt;
*[[भारतातील किल्ले]]&lt;br /&gt;
{{विस्तार-किल्ला}}&lt;br /&gt;
{{महाराष्ट्रातील किल्ले (विभागवार)}}&lt;br /&gt;
{{महाराष्ट्रातील किल्ले}}&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
[[वर्ग:महाराष्ट्रातील किल्ले]]&lt;br /&gt;
[[वर्ग:महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारके]]&lt;/div&gt;</summary>
		<author><name>ImportMaster</name></author>
	</entry>
</feed>