<?xml version="1.0"?>
<feed xmlns="http://www.w3.org/2005/Atom" xml:lang="mr">
	<id>https://mr.bharatpedia.org/w/index.php?action=history&amp;feed=atom&amp;title=%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%97</id>
	<title>जालियानवाला बाग - आवृत्ती इतिहास</title>
	<link rel="self" type="application/atom+xml" href="https://mr.bharatpedia.org/w/index.php?action=history&amp;feed=atom&amp;title=%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%97"/>
	<link rel="alternate" type="text/html" href="https://mr.bharatpedia.org/w/index.php?title=%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%97&amp;action=history"/>
	<updated>2026-08-26T04:01:34Z</updated>
	<subtitle>विकिवरील या पानाच्या आवृत्त्यांचा इतिहास</subtitle>
	<generator>MediaWiki 1.43.6</generator>
	<entry>
		<id>https://mr.bharatpedia.org/w/index.php?title=%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%97&amp;diff=2029&amp;oldid=prev</id>
		<title>ImportMaster: robot: Import pages using विशेष:आयात</title>
		<link rel="alternate" type="text/html" href="https://mr.bharatpedia.org/w/index.php?title=%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%97&amp;diff=2029&amp;oldid=prev"/>
		<updated>2022-05-01T11:10:30Z</updated>

		<summary type="html">&lt;p&gt;robot: Import pages using &lt;a href=&quot;/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4&quot; title=&quot;विशेष:आयात&quot;&gt;विशेष:आयात&lt;/a&gt;&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;b&gt;नवीन पृष्ठ&lt;/b&gt;&lt;/p&gt;&lt;div&gt;[[चित्र:Panorama of Jallianwala Bagh-IMG 6348.jpg|इवलेसे|जालियानवाला बाग]]&lt;br /&gt;
&amp;#039;&amp;#039;&amp;#039;जालियनवाला बाग&amp;#039;&amp;#039;&amp;#039; [[भारत|भारताच्या]] [[पंजाब]] राज्यातील [[अमृतसर]] शहराचा एक भाग आहे. [[एप्रिल १३]], [[इ.स. १९१९]] रोजी ब्रिटिश पोलिसांनी तेथे भरलेल्या सभेतील निःशस्त्र नागरिकांवर गोळ्या चालवून शेकडोंना ठार मारले.या घटनेला २०१९ साली १०० वर्षे पूर्ण झाली आहेत.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
{{कॉपीपेस्ट | लेखातील मजकूर / विभागातील मजकूर | दुवा =[http://mh-marathi.com/category/art-culture/page/8/ महाराष्ट्रमराठी] | दिनांक = }}&lt;br /&gt;
१३ एप्रिल १९१९ या दिवशी इंग्रजांच्या भारतावरील राजवटीत ब्रिगेडियर-जनरल रेजिनाल्ड डायर याने अमृतसर येथील जालियनवाला बाग या ठिकाणी हे हत्याकांड घडवून आणले. जनरल डायर याच्या हुकुमावरून लष्कराने निःशस्त्र लोकांच्या सभेवर रायफलींच्या १,६०० फैरी झाडल्या. या सभेत स्त्रिया आणि पुरुषांसोबत लहान मुलांचाही समावेश होता. अधिकृत सूत्रांच्या हवाल्यातून या हत्याकांडामधे ३७९ लोकांचा मृत्यू झाला. अनाधिकृत सूत्रांनुसार मृतांचा आकडा १,०००हून अधिक आहे. निःशस्त्र नागरिकांना कोंडीत गाठून असहाय्य अवस्थेत टिपून मारण्यात आले. अनेक जण जीव वाचविण्यासाठी विहिरीकडे धावले तर अनेकांनी भिंती चढून जाण्याचा प्रयत्न केला. पण परिणाम एकच – मरण. या नरसंहाराबद्दल कुणालाना खेदना खंत. डायरने तर उद्दामपणे विधान केले की &amp;#039;त्याला याबद्दल कसलाही खेद होत नाही, गोळ्या संपल्यामुळे त्याचा नाईलाज झाला अन्यथा आणखी माणसे मारण्याने त्याला फरक पडत नव्हता.&amp;#039; आपल्या विरुद्ध डोके वर काढणाऱ्याला काय शासन होते हे दाखवून देण्यासाठी हे भयानक कृत्य इंग्रज सरकारच्या अधिकाऱ्यांनी केले. रक्ताचे पाट वाहिले. मात्र हा अमानुष नरसंहार ‘हिंसा’ या शब्दाच्या अधिकृत व्याख्येत बहुधा सामावला नसावा. कारण या भयानक घटनेविरुद्ध कुण्या मानवतावाद्याने व हिंसेच्या तिरस्कर्त्याने काही केल्याचे ऐकिवात नाही. मात्र अवघ्या तीन वर्षांनंतर नव्या आंदोलनात झालेल्या हिंसेने व्यथित होऊन भरात आलेले आंदोलन महात्मा गांधींनी तडकाफडकी मागे घेतले.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
जालियनवाला बाग सभा :-&amp;lt;br/&amp;gt;&lt;br /&gt;
अमृतसर हे अखंड भारतातील पंजाब राज्यातील एक महत्त्वाचे शहर होते.ज्यांच्यावर तडीपारीचा आदेश जारी करण्यात आला होता, अशा सत्यपाल आणि सैफुद्दीन किचलू या दोन प्रसिद्ध स्वातंत्र्यवीरांच्या सुटकेच्या मागणीसाठी, ० एप्रिल सन १९१९ रोजी सकाळी एक घोळका अमृतसरच्या डेप्युटी कमिशनरच्या घराकडे निघाला होता.  ह्या घोळक्यावर सैन्याच्या एका तुकडीने बेछूट गोळीबार केला. त्याचे पडसाद त्याच दिवशी उमटले. ब्रिटिश सरकारच्या अस्तित्वाची जाणीव करून देण्याऱ्या इमारतींना आगी लावण्यात आल्या. टाऊन हॉल, दोन बँकाच्या इमारती, तारघर, रेल्वेचे गोदाम वगैरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. गुरखा रेजिमेंटने रेल्वे स्थानकाचा बचाव केला. रेल्वे गोदामाच्या एका युरोपियन रक्षकाला जोरदार मारहाण करण्यात आली, तीन बँक कर्मचारी आगीत ठार झाले, तर एका युरोपियन नागरिकाचा रस्त्यात खून करण्यात आला. एका ब्रिटिश महिलेवर प्राणघातक हल्ला करण्यात आला, पण काही भारतीयांनी तिचे प्राण वाचविले. दिवसभर हे थैमान चालू होतेच. ब्रिटिश सैन्याने दिवसभरात केलेल्या गोळीबारात ८ ते२० स्वातंत्र्य सैनिक धारातीर्थी पडले. ह्या नंतररचे दोन दिवस अमृतसर शांत होते, पण पंजाबमधील इतर भागात मात्र हिंसा चालू होतीच. रेल्वेचे रूळ उखडण्यात आले, तारघर, डाकघर, सरकारी इमारतींना आगी लावण्यात आल्या, ३ युरोपियन नागरिक मारण्यात आले. ह्या प्रक्षोभक दंग्यांमुळे अखेर १३ एप्रिल रोजी पंजाबमध्ये मार्शल लॉ जारी करण्यात आला. योगायोग असा की १३ एप्रिलला पंजाबी जनतेचा प्रिय सण ’बैसाखी’ पण होता. रिवाजानुसार हिंदू आणि शीख जनता सण साजरा करण्यास एकत्र जमले. त्यासाठी मोठा जनसमुदाय जालियानवाला बागेत जमला होता. पण मार्शल लॉ मुळे जमावबंदी लागू होती. पाच किंवा जास्त जणांचा जमाव नियमबाह्य होता.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
भगतसिंहाचे वय त्यावेळी अवघे १२ वर्षाचे होते. जालियानवाला बागेत झालेल्या हिंसक गोळीबाराच्या घटनेने त्याच्या मनाला फार मोठा धक्का बसला. दुसऱ्या दिवशी शाळा सुटली तरी तो घरी आला नाही. पुष्कळ वेळ वाट पाहिल्यावरही भगतसिंह घरी न आल्यामुळे घरचे लोक काळजीत पडले. त्या दिवशी शाळेत जायच्या ऐवजी भगतसिंह सरळ ती दुर्देवी घटना जिथं घडली तिथे जाऊन दाखल झाला. तिथे असलेल्या पोलिसांच्या पहाऱ्यातून निसटून त्यांना चुकवून तो कसातरी जालियानवाला बागेत शिरला. तिथे एका बाटलीत भारतीय लोकांच्या रक्ताने माखलेली, भिजलेली, पावन झालेली माती त्याने भरली आणि मगच तो घरी परत आला. खूप उशीर झाल्यामुळे त्याच्या बहिणीने त्याला विचारले, ‘‘तू इतका वेळ कुठं होतास? अन्न झाकून ठेवून आई तुझी किती वेळ वाट पाहात बसलीय.’’ आपल्या हातातली बाटली दाखवत भगतसिंह म्हणाला, ‘‘इंग्रजांनी निर्घृणपणे मारलेल्या आमच्या बांधवांचे हे रक्त आहे. ह्याला नमस्कार कर.’’  नंतर त्याने एक झोळी करून तीत ती बाटली ठेवली आणि फूल वाहून तिची पूजा केली.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
जवळपास दोन दशकांच्या प्रतीक्षेनंतर हुतात्मा उधमसिंह यांनी इंग्लंडमध्ये जाऊन पंजाबचा माजी लेफ्टनंट गव्हर्नर ओडवायर याला कंठस्नान घातले व या अत्याचाराचा प्रतिशोध घेतला. अनेकदा संधी असतानाही शस्त्र न चालविता अखेर हुतात्मा उधमसिंह यांनी ओडवायरला भरसभेत भारतमंत्री झेटलॅंड यांच्या उपस्थितीत यमसदनास धाडले व हिंदुस्थानातील अस्मिता व हिंदुस्थानियांच्या अंगातील रग अजून संपली नसल्याचे दाखवून दिले. हुतात्मा उधमसिंह अभिमानाने व कर्तव्यपूर्तीच्या समाधानात पेंटनविले तुरुंगात फाशी गेले.  पुढे अनेक देशाभिमानी हिंदुस्थानियांच्या प्रयत्नांती हुतात्मा उधमसिंहांचे अवशेष १९७४ साली हिंदुस्थानात आणले गेले व सुनाम या त्यांच्या जन्मग्रामी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले; त्यांच्या अस्थी सतलज नदीत विसर्जित करण्यात आल्या.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
हत्याकांडाच्या प्रतिक्रिया :- &amp;lt;br/&amp;gt;&lt;br /&gt;
जालियानवाला हत्याकांडाच्या भारतभर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. नोबेल पारितोषिक विजेते गुरू रवींद्रनाथ टागोर यांनी त्यांना इंग्रजांनी दिलेली ‘सर’ ही पदवी परत केली. या हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी अनेक क्रांतिकारक जन्माला आले. शहीद उधमसिंग (जे स्वतः या हत्याकांडामधे जखमी झाले होते) यांनी, १३ मार्च १९४० या दिवशी ज्याने जालियानवाला बागेतील हत्याकांडाला योग्य असल्याचे शिफारसपत्र दिले होते, त्या पंजाबच्या लेफ्टनंट गव्हर्नर मिशाएल ओ’डायरवर बंदुकीतून गोळ्या झाडून त्याचा वध केला.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==जालियनवाला बागेतील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवरील हिंदी चित्रपट==&lt;br /&gt;
* जालियांवाला बाग (१९७७)&lt;br /&gt;
* फिल्लौरी (२०१७)&lt;br /&gt;
* रंग दे बसंती&lt;br /&gt;
* ?? (२०१९, यलो टर्बन फिल्म्स)&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==जालियानावाला बागेत झालेल्या दुष्घटनेचा उल्लेख असलेले हिंदी चित्रपट==&lt;br /&gt;
* शहीद उधमसिंह (२०००)&lt;br /&gt;
* गांधी (१९८२)&lt;br /&gt;
* जागृती (१९५६)&lt;br /&gt;
* द एसकेए व्हेंजर्स (इंग्रजी, २०१५)&lt;br /&gt;
* द लेजेंड ऑफ भगतसिंह (२००२)&lt;br /&gt;
* मिडनाईट्‌स चिल्ड्रेन (२०१२)&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==कविता==&lt;br /&gt;
कवयित्री सुभद्राकुमारी चौहान रचित शोकगीत - जालियानवाला बाग में वसंत.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==मराठी पुस्तके==&lt;br /&gt;
* क्रांतिवीर भगतसिंग (विठ्ठलराय भट) &lt;br /&gt;
* क्रूरकर्मा (जनरल डायरचे [[रेखा देशपांडे]] अनुवादित चरित्र, मूळ इंग्रजी लेखक - इयान काॅल्विन आदी लेखक)&lt;br /&gt;
* भगतसिंग (प्रवीण सुशीर)  &lt;br /&gt;
* भगतसिंग, चंद्रशेखर आझाद आणि इतर क्रांतिकारक (मूळ लेखक अजय घोष, मराठी अनुवाद आत्माराम वैद्य) &lt;br /&gt;
* शहीद भगतसिंग (प्रा. [[व.न. इंगळे]])&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
{{विस्तार}}&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
{{भारतीय स्वातंत्र्यलढा}}&lt;br /&gt;
{{पंजाब - जिल्हे}}&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
[[वर्ग:अमृतसर]]&lt;br /&gt;
[[वर्ग:भारतीय स्वातंत्र्यलढ्याशी संबंधित महत्त्वाची स्थाने]]&lt;/div&gt;</summary>
		<author><name>ImportMaster</name></author>
	</entry>
</feed>