<?xml version="1.0"?>
<feed xmlns="http://www.w3.org/2005/Atom" xml:lang="mr">
	<id>https://mr.bharatpedia.org/w/index.php?action=history&amp;feed=atom&amp;title=%E0%A4%AA%E0%A5%80.%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80._%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5</id>
	<title>पी.व्ही. नरसिंहराव - आवृत्ती इतिहास</title>
	<link rel="self" type="application/atom+xml" href="https://mr.bharatpedia.org/w/index.php?action=history&amp;feed=atom&amp;title=%E0%A4%AA%E0%A5%80.%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80._%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5"/>
	<link rel="alternate" type="text/html" href="https://mr.bharatpedia.org/w/index.php?title=%E0%A4%AA%E0%A5%80.%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80._%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5&amp;action=history"/>
	<updated>2026-08-27T21:33:32Z</updated>
	<subtitle>विकिवरील या पानाच्या आवृत्त्यांचा इतिहास</subtitle>
	<generator>MediaWiki 1.43.6</generator>
	<entry>
		<id>https://mr.bharatpedia.org/w/index.php?title=%E0%A4%AA%E0%A5%80.%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80._%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5&amp;diff=8516&amp;oldid=prev</id>
		<title>ImportMaster: robot: Import pages using विशेष:आयात</title>
		<link rel="alternate" type="text/html" href="https://mr.bharatpedia.org/w/index.php?title=%E0%A4%AA%E0%A5%80.%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80._%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5&amp;diff=8516&amp;oldid=prev"/>
		<updated>2022-05-01T18:14:39Z</updated>

		<summary type="html">&lt;p&gt;robot: Import pages using &lt;a href=&quot;/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4&quot; title=&quot;विशेष:आयात&quot;&gt;विशेष:आयात&lt;/a&gt;&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;b&gt;नवीन पृष्ठ&lt;/b&gt;&lt;/p&gt;&lt;div&gt;{{माहितीचौकट पंतप्रधान&lt;br /&gt;
| नाव = पामुलपर्ती वेंकट नरसिंहराव &lt;br /&gt;
| लघुचित्र =P V Narasimha Rao.png &lt;br /&gt;
| पद = १२ वे [[भारतीय पंतप्रधान]]&lt;br /&gt;
| कार्यकाळ_आरंभ = [[जून २१]], [[इ.स. १९९१]] &lt;br /&gt;
| कार्यकाळ_समाप्ती = [[मे १६]], [[इ.स. १९९६]]&lt;br /&gt;
| राष्ट्रपती = [[रामस्वामी वेंकटरमण]] व [[शंकर दयाळ शर्मा]]&lt;br /&gt;
| मागील = [[चंद्रशेखर]]&lt;br /&gt;
| पुढील = [[अटलबिहारी वाजपेयी]]&lt;br /&gt;
| मतदारसंघ = नंदयाळ, [[आंध्र प्रदेश]]&lt;br /&gt;
| पद2 = {{AutoLink|भारतीय परराष्ट्रमंत्री}}&lt;br /&gt;
| कार्यकाळ_आरंभ2 = [[मार्च ३१]], [[इ.स. १९९२]]&lt;br /&gt;
| कार्यकाळ_समाप्ती2 = [[जानेवारी १८]], [[इ.स. १९९३]]&lt;br /&gt;
| मागील2 = [[माधवसिंह सोलंकी]]&lt;br /&gt;
| पुढील2 = [[दिनेश सिंग]]&lt;br /&gt;
| कार्यकाळ_आरंभ3 = [[जून २५]], [[इ.स. १९८८]] &lt;br /&gt;
| कार्यकाळ_समाप्ती3 = [[डिसेंबर ५]], [[इ.स. १९८९]]&lt;br /&gt;
| मागील3 = [[राजीव गांधी]]&lt;br /&gt;
| पुढील3 = [[इंद्रकुमार गुजराल]]&lt;br /&gt;
| कार्यकाळ_आरंभ4 = [[जानेवारी १४]], [[इ.स. १९८०]] &lt;br /&gt;
| कार्यकाळ_समाप्ती4 = [[जुलै १९]], [[इ.स. १९८४]]&lt;br /&gt;
| मागील4 = [[श्यामनंदन मिश्रा]]&lt;br /&gt;
| पुढील4 = [[इंदिरा गांधी]]&lt;br /&gt;
| पद5 = {{AutoLink|आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री}}&lt;br /&gt;
| कार्यकाळ_आरंभ5 = [[सप्टेंबर ३०]], [[इ.स. १९७१]] &lt;br /&gt;
| कार्यकाळ_समाप्ती5 = [[जानेवारी १०]], [[इ.स. १९७३]]&lt;br /&gt;
| मागील5 = [[के.ब्रम्हानंद रेड्डी]]&lt;br /&gt;
| पुढील5 = [[जे.वेंगल राव]]&lt;br /&gt;
| पद6 = {{AutoLink|काँग्रेस अध्यक्ष}}&lt;br /&gt;
| कार्यकाळ_आरंभ6 = [[मे ३०]], [[इ.स. १९९१]] &lt;br /&gt;
| कार्यकाळ_समाप्ती6 = [[सप्टेंबर २३]], [[इ.स. १९९६]]&lt;br /&gt;
| मागील6 = [[राजीव गांधी]]&lt;br /&gt;
| पुढील6 = [[सीताराम केसरी]]&lt;br /&gt;
| पद7 = {{AutoLink|संसद सदस्य|एमपी}}&lt;br /&gt;
| मतदारसंघ7              = [[रामटेक (लोकसभा मतदारसंघ)|रामटेक]]&lt;br /&gt;
| कार्यकाळ_आरंभ7 = [[इ.स. १९८४]] &lt;br /&gt;
| कार्यकाळ_समाप्ती7 = [[इ.स. १९८९]]&lt;br /&gt;
| मागील7 = {{AutoLink|जतीराम चैतराम बर्वे}}&lt;br /&gt;
| पुढील7 ={{AutoLink|पी.व्ही. नरसिंहराव}}&lt;br /&gt;
| कार्यकाळ_आरंभ8 = [[इ.स. १९८९]] &lt;br /&gt;
| कार्यकाळ_समाप्ती8 = [[इ.स. १९९१]]&lt;br /&gt;
| मागील8 = {{AutoLink|पी.व्ही. नरसिंहराव}}&lt;br /&gt;
| पुढील8 ={{AutoLink|तेजसिंहराव लक्ष्मणराव भोसले}}&lt;br /&gt;
| मतदारसंघ8              = [[रामटेक (लोकसभा मतदारसंघ)|रामटेक]]&lt;br /&gt;
| जन्मदिनांक           =[[जून २८]], [[इ.स. १९२१]]&lt;br /&gt;
| जन्मस्थान            = [[करीमनगर]], [[आंध्र प्रदेश]], [[भारत]]&lt;br /&gt;
| मृत्युदिनांक           =[[डिसेंबर २३]], [[इ.स. २००४]]&lt;br /&gt;
| मृत्युस्थान            =[[नवी दिल्ली]], [[भारत]]&lt;br /&gt;
| राष्ट्रीयत्व               =&lt;br /&gt;
| पक्ष                  =[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]&lt;br /&gt;
| पती                  =&lt;br /&gt;
| पत्नी                  = &lt;br /&gt;
| नाते                  =&lt;br /&gt;
| अपत्ये                = &lt;br /&gt;
| निवास                =&lt;br /&gt;
| शाळा_महाविद्यालय      =&lt;br /&gt;
| व्यवसाय              = [[वकील]]&lt;br /&gt;
| धंदा                  = &lt;br /&gt;
| धर्म                  = [[हिंदू]]&lt;br /&gt;
| सही                  =&lt;br /&gt;
| संकेतस्थळ             =&lt;br /&gt;
| तळटीपा               =&lt;br /&gt;
}}&lt;br /&gt;
&amp;#039;&amp;#039;&amp;#039;पामुलपर्ती वेंकट नरसिंहराव&amp;#039;&amp;#039;&amp;#039; ([[तेलुगू भाषा|तेलुगू]]: పాములపర్తి వెంకట నరసింహారావు ; [[रोमन लिपी]]: &amp;#039;&amp;#039;Pamulaparti Venkata Narasimha Rao&amp;#039;&amp;#039; ;) ([[जून २८]], [[इ.स. १९२१]] - [[डिसेंबर २३]], [[इ.स. २००४]]) हे भारताचे [[इ.स. १९९१]] ते [[इ.स. १९९६]] या काळात [[:वर्ग:भारताचे पंतप्रधान|पंतप्रधान]] होते. त्याच काळात ते [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे]] अध्यक्षही होते. भारताच्या नवीन आर्थिक धोरणाची सुरुवात त्यांच्या पंतप्रधान-कारकिर्दीत झाली.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
== व्यक्तिगत माहिती ==&lt;br /&gt;
राव यांचा जन्म [[आंध्र प्रदेश]]मधील [[करीमनगर जिल्हा|करीमनगर जिल्ह्यातील]] [[वंगारा]] या गावी झाला. त्यांचे शिक्षण [[उस्मानिया विद्यापीठ]], [[मुंबई विद्यापीठ]] आणि [[नागपूर विद्यापीठ]] अशा तीन विद्यापीठांमध्ये झाले. त्यांना मातृभाषा [[तेलुगू भाषा|तेलुगू]]बरोबरच [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]], [[मराठी]], [[उर्दू]], [[कन्नड (निःसंदिग्धीकरण)|कन्नड]] आणि [[हिंदी भाषा]] या भाषाही अवगत होत्या.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
== राजकारणात प्रवेश ==&lt;br /&gt;
त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात आणि [[स्वामी रामानंद तीर्थ]] यांच्या नेतृत्वाखालील [[हैदराबाद मुक्तिसंग्राम|हैद्राबाद मुक्तिसंग्रामात]] भाग घेतला. सर्वप्रथम ते इ.स. १९६२ साली केंद्रीय मंत्री झाले. ते इ.स. १९७१पर्यंत केंद्रात मंत्री होते. इ.स. १९७१ ते इ.स. १९७३ या काळात ते [[आंध्र प्रदेश]]चे मुख्यमंत्री होते. त्यानंतर परत ते केंद्रीय राजकारणात उतरले. त्यानंतर त्यांनी गृह, परराष्ट्र आणि संरक्षण यासारखी महत्त्वाची खाती सांभाळली. इ.स. १९७७ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते पराभूत झाले. पण राव [[हनामकोंडा (लोकसभा मतदारसंघ)|हनामकोंडा मतदारसंघातून]] लोकसभेवर निवडून गेले. ते इ.स. १९८४ आणि इ.स. १९८९ च्या निवडणुकीत महाराष्ट्रातील [[रामटेक]] मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
== पंतप्रधानपद ==&lt;br /&gt;
राजकारणातून निवृत्त होण्याच्या उद्देशाने त्यांनी इ.स. १९९१ची लोकसभा निवडणुक लढवली नाही. मात्र निवडणूक प्रचारादरम्यान काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि पंतप्रधानपदाचे उमेदवार [[राजीव गांधी]] यांची हत्या झाली. त्यानंतर राव यांची काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी सर्वानुमते निवड झाली. लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यावर काँग्रेस पक्ष केंद्रात सरकार बनविण्याच्या स्थितीत होता. पक्षाचे नेते म्हणून राव यांची निवड झाली आणि त्यांनी जून २१, इ.स. १९९१ रोजी भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
नरसिंह रावांच्या सरकारपुढे देशाची आर्थिक स्थिती सांभाळण्याचे मोठे आव्हान होते. त्यांनी [[मनमोहन सिंग]] या निष्णात अर्थतज्ज्ञाची अर्थमंत्री म्हणून नेमणूक केली. देशाची आर्थिक स्थिती सांभाळण्यासाठी [[आंतरराष्ट्रीय नाणेनिधी]]चे कर्ज मिळवणे गरजेचे होते. आणि त्यासाठी रुपयाचे अवमूल्यन आणि खतांवरील सरकारी अनुदान कमी करणे असे जनतेत लोकप्रिय नसलेले निर्णय सरकारला घ्यावे लागले.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
नरसिंह राव सरकारने सत्तेवर आल्यानंतर दिलेल्या आश्वासनाप्रमाणे दहशतवादग्रस्त [[पंजाब]] राज्यातील निवडणुका फेब्रुवारी, इ.स. १९९२मध्ये घेतल्या. त्यानंतर [[बियंत सिंग]] यांच्या नेतृत्वाखाली लोकनियुक्त सरकार अधिकारारूढ झाले. त्या सरकारने इ.स. १९९२ आणि इ.स. १९९३ सालांदरम्यान दहशतवादाविरुद्ध कठोर पावले उचलून राज्यात शांतता निर्माण केली.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
तसेच अर्थमंत्री [[मनमोहन सिंग]] यांनी फेब्रुवारी, इ.स. १९९२मध्ये परकीय गुंतवणुकीला पोषक अर्थसंकल्प सादर केल्यामुळे शेअर बाजारात तेजीचे वातावरण होते. मात्र मे, इ.स. १९९२मध्ये [[हर्षद मेहता]] आणि इतर काही शेअर दलालांनी केलेला हजारो कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीला आला. त्यानंतर उद्योगात आणि शेअर बाजारात मंदीचे वातावरण निर्माण झाले.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
जुलै, इ.स. १९९२मध्ये नरसिंह राव सरकार शेअर बाजारातील घोटाळा वेळीच थांबवू शकले नाही असा आरोप करून लोकसभेतील सर्व विरोधकांनी सरकारविरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणला. पण तो फेटाळला गेला.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
== बाबरी मशीद ==&lt;br /&gt;
जुलै, इ.स. १९९२मध्ये [[विश्व हिंदू परिषद]] आणि [[भारतीय जनता पक्ष]] या संघटनांनी अयोध्येत वादग्रस्त जागी बाबरी मशिदीच्या जागी राममंदिर बांधण्यासाठी [[कारसेवा]] सुरू केली. पण नरसिंह रावांनी मध्यस्थी करून ४ महिन्यांचा वेळ मागून घेतला आणि त्या काळात त्या प्रश्नावर तोडगा काढायचे आश्वासन दिले. सरकार दिलेल्या कालावधीत तोडगा काढण्यात अपयशी ठरणार असे दिसताच [[विश्व हिंदू परिषद]] आणि [[भारतीय जनता पक्ष]] यांनी डिसेंबर ६, इ.स. १९९२ पासुन अयोध्येत परत कारसेवा सुरू करायचा निर्णय घेतला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री [[कल्याण सिंग]] यांनी न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून बाबरी मशिदीला धक्का लावण्यात येणार नाही असे आश्वासन दिले. पण अयोध्येत कारसेवकांनी बाबरी मशीद उद्ध्वस्त केली. त्याच दिवशी सायंकाळी केंद्र सरकारने [[कल्याण सिंग]] यांचे सरकार बरखास्त करून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
बाबरी मशीद पाडल्यानंतरच्या प्रतिक्रियेत देशभर जातीय दंगली उसळल्या. त्यात शेकडो लोक मारले गेले. अयोध्येतील घटनांना जबाबदार ठरवून राव सरकारने [[राष्ट्रीय स्वयंसेवक संघ]], [[विश्व हिंदू परिषद]] आणि [[बजरंग दल]] या संघटनांवर बंदी आणली. तसेच [[भारतीय जनता पक्ष]] सत्तेत असलेली [[राजस्थान]], [[मध्य प्रदेश]] आणि [[हिमाचल प्रदेश]] ही राज्य सरकारे बरखास्त केली. अयोध्येतील घटना, त्यानंतर देशात झालेल्या दंगली, हिंदुत्ववादी संघटनांवर आणलेली बंदी आणि राज्य सरकार बरखास्ती या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे नेते [[अटलबिहारी वाजपेयी]] यांनी राव सरकारविरुद्ध दुसरा अविश्वास प्रस्ताव आणला. पण तो फेटाळला गेला.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
जुलै, इ.स. १९९३मध्ये राव सरकारविरुद्ध सर्व विरोधकांनी तिसरा अविश्वास प्रस्ताव आणला. पण तो २५१ विरुद्ध २६५ मतांनी फेटाळला गेला आणि सरकार थोडक्यात बचावले.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
== विधानसभा निवडणुका ==&lt;br /&gt;
[[उत्तर प्रदेश]], [[मध्य प्रदेश]], [[राजस्थान]], [[हिमाचल प्रदेश]] आणि [[दिल्ली]] या राज्यांतील विधानसभांसाठी नोव्हेंबर, इ.स. १९९३मध्ये मतदान झाले. त्या निवडणुकींसाठी भारतीय जनता पक्षाने आक्रमक प्रचार केला. त्या सर्व निवडणुका जिंकून भाजप राव सरकारपुढे मोठे आव्हान उभे करणार असे वातावरण निर्माण झाले. पण [[मध्य प्रदेश]] आणि [[हिमाचल प्रदेश]]मध्ये काँग्रेस पक्षाने स्पष्ट बहुमत प्राप्त केले. [[उत्तर प्रदेश]] विधानसभेत भाजप सर्वात मोठा पक्ष होता पण काँग्रेस आणि जनता दलाच्या पाठिंब्यावर [[समाजवादी पक्ष]] आणि [[बहुजन समाज पक्ष]] यांच्या युतीचे नेते [[मुलायम सिंग यादव]] मुख्यमंत्री झाले. केवळ [[दिल्ली]] आणि [[राजस्थान]] या राज्यात भाजप सरकार स्थापन करू शकला. अशाप्रकारे त्या निवडणुकीत भाजपची पीछेहाट झाली आणि नरसिंह रावांचे सरकार अधिक मजबूत झाले.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
== भ्रष्टाचाराचे आरोप व सरकारची अधोगती ==&lt;br /&gt;
इ.स. १९९४मध्ये साखर आयातीत झालेला भ्रष्टाचार उघडकीस आला. हा राव सरकारच्या काळातील उघडकीस आलेला दुसरा घोटाळा होता. तसेच डिसेंबर, इ.स. १९९४मध्ये [[आंध्र प्रदेश]] आणि [[कर्नाटक]] राज्य विधानसभा निवडणुकीत कॉॅंग्रेस पक्षाचा मोठा पराभव झाला.त्या पराभवास राव यांना जबाबदार धरून मनुष्यबळ विकासमंत्री [[अर्जुन सिंग]] यांनी राव यांच्याविरुद्ध बंड केले. मार्च, इ.स. १९९५मध्ये [[महाराष्ट्र]], [[गुजरात]], [[बिहार]] आणि [[ओडिशा|ओरीसा]] या राज्यात विधानसभा निवडणुका झाल्या. त्यात केवळ [[ओडिशा|ओरिसा]]मध्ये काँग्रेस पक्ष सरकार बनवू शकला. [[महाराष्ट्र]] राज्यात पक्षाचा प्रथमच पराभव झाला तर [[गुजरात]] राज्यात भाजपने मोठा विजय मिळवला. देशातील वातावरण राव सरकारविरुद्ध जाऊ लागले.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
इ.स. १९९६ च्या लोकसभा निवडणुकीत कॉॅंग्रेस पक्षाचा इ.स. १९७७पेक्षाही मोठा पराभव झाला. नरसिंह रावांनी राजीनामा दिला.  काँग्रेसला [[एच.डी. देवेगौडा|एच्.डी.देवेगौडा]] यांच्या नेतृत्वाखालील [[संयुक्त आघाडी]] सरकारला बाहेरून पाठिंबा द्यावा लागला.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
सत्तेवरून पायउतार झाल्यावर रावांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तीन खटल्यांना सामोरे जावे लागले. त्यात अनिवासी भारतीय [[लखुभाई पाठक]] यांना फसविल्याबद्दल एक खटला होता. त्याचप्रमाणे जुलै, इ.स. १९९३मधील अविश्वास प्रस्तावाविरोधात मत देण्यासाठी [[झारखंड मुक्ती मोर्चा]]च्या खासदारांना लाच देणे आणि [[सेंट किट्स]] प्रकरण या इतर दोन खटल्यांनाही त्यांना सामोरे जावे लागले. लखुभाई पाठक फसवणूक प्रकरणी न्यायालयाने आरोप निश्चित केल्यानंतर रावांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या जागी [[सीताराम केसरी]] यांची अध्यक्षपदी निवडणूक झाली. तसेच जानेवारी, इ.स. १९९७मध्ये रावांना काँग्रेस संसदीय पक्ष्याच्या नेतेपदाचाही राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर ते काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वापासून अलग पडले.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
== निवृत्ति ==&lt;br /&gt;
इ.स. १९९८ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना पक्षाने उमेदवारी नाकारली. त्यानंतर ते सक्रिय राजकारणातून निवृत्त झाले.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
डिसेंबर २३, इ.स. २००४ रोजी त्यांचे निधन झाले.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
{{क्रम-सुरू}}&lt;br /&gt;
{{क्रम-मागील|मागील=[[चंद्र शेखर]]}}&lt;br /&gt;
{{क्रम-शीर्षक|शीर्षक=[[भारतीय पंतप्रधान]]|वर्ष=[[जून २१]], [[इ.स. १९९१]]–[[मे १६]], [[इ.स. १९९६]]}}&lt;br /&gt;
{{क्रम-पुढील|पुढील=[[अटलबिहारी वाजपेयी]]}}&lt;br /&gt;
{{क्रम-मागील|मागील=[[माधवसिंह सोलंकी]]}}&lt;br /&gt;
{{क्रम-शीर्षक|शीर्षक=[[:वर्ग:भारतीय परराष्ट्रमंत्री|भारतीय परराष्ट्रमंत्री]]|वर्ष=[[मार्च ३१]], [[इ.स. १९९२]]–[[जानेवारी १८]], [[इ.स. १९९३]]}}&lt;br /&gt;
{{क्रम-पुढील|पुढील=[[दिनेश सिंग]]}}&lt;br /&gt;
{{क्रम-मागील|मागील=[[राजीव गांधी]]}}&lt;br /&gt;
{{क्रम-शीर्षक|शीर्षक=[[:वर्ग:भारतीय परराष्ट्रमंत्री|भारतीय परराष्ट्रमंत्री]]|वर्ष=[[जून २५]], [[इ.स. १९८८]]–[[डिसेंबर ५]], [[इ.स. १९८९]]}}&lt;br /&gt;
{{क्रम-पुढील|पुढील=[[इंद्रकुमार गुजराल]]}}&lt;br /&gt;
{{क्रम-मागील|मागील=[[श्यामनंदन मिश्रा]]}}&lt;br /&gt;
{{क्रम-शीर्षक|शीर्षक=[[:वर्ग:भारतीय परराष्ट्रमंत्री|भारतीय परराष्ट्रमंत्री]]|वर्ष=[[जानेवारी १४]], [[इ.स. १९८०]]–[[जुलै १९]], [[इ.स. १९८४]]}}&lt;br /&gt;
{{क्रम-पुढील|पुढील=[[इंदिरा गांधी]]}}&lt;br /&gt;
{{क्रम-मागील|मागील=[[के.ब्रम्हानंद रेड्डी]]}}&lt;br /&gt;
{{क्रम-शीर्षक|शीर्षक=[[:वर्ग:आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री|आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री]]|वर्ष=[[सप्टेंबर ३०]], [[इ.स. १९७१]]–[[जानेवारी १०]], [[इ.स. १९७३]]}}&lt;br /&gt;
{{क्रम-पुढील|पुढील=[[जे.वेंगल राव]]}}&lt;br /&gt;
{{क्रम-मागील|मागील=[[राजीव गांधी]]}}&lt;br /&gt;
{{क्रम-शीर्षक|शीर्षक=[[:वर्ग:काँग्रेस अध्यक्ष|काँग्रेस अध्यक्ष]]|वर्ष=[[मे ३०]], [[इ.स. १९९१]]–[[सप्टेंबर २३]], [[इ.स. १९९६]]}}&lt;br /&gt;
{{क्रम-पुढील|पुढील=[[सीताराम केसरी]]}}&lt;br /&gt;
{{क्रम-शेवट}}&lt;br /&gt;
{{भारतीय पंतप्रधान}}&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
{{DEFAULTSORT:नरसिंहराव,पी. व्ही}}&lt;br /&gt;
[[वर्ग:भारतीय राजकारणी]]&lt;br /&gt;
[[वर्ग:भारताचे पंतप्रधान]]&lt;br /&gt;
[[वर्ग:भारतीय गृहमंत्री]]&lt;br /&gt;
[[वर्ग:भारतीय परराष्ट्रमंत्री]]&lt;br /&gt;
[[वर्ग:आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री]]&lt;br /&gt;
[[वर्ग:काँग्रेस अध्यक्ष]]&lt;br /&gt;
[[वर्ग:नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष]]&lt;br /&gt;
[[वर्ग:६ वी लोकसभा सदस्य]]&lt;br /&gt;
[[वर्ग:७ वी लोकसभा सदस्य]]&lt;br /&gt;
[[वर्ग:८ वी लोकसभा सदस्य]]&lt;br /&gt;
[[वर्ग:९ वी लोकसभा सदस्य]]&lt;br /&gt;
[[वर्ग:१० वी लोकसभा सदस्य]]&lt;br /&gt;
[[वर्ग:११ वी लोकसभा सदस्य]]&lt;br /&gt;
[[वर्ग:नंद्यालचे खासदार]]&lt;br /&gt;
[[वर्ग:रामटेकचे खासदार]]&lt;br /&gt;
[[वर्ग:बेरहामपूरचे खासदार]]&lt;br /&gt;
[[वर्ग:हणमकोंडाचे खासदार]]&lt;br /&gt;
[[वर्ग:लोकसभेतील विरोधीपक्षनेते]]&lt;br /&gt;
[[वर्ग:इ.स. १९२१ मधील जन्म]]&lt;br /&gt;
[[वर्ग:इ.स. २००४ मधील मृत्यू]]&lt;br /&gt;
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]&lt;/div&gt;</summary>
		<author><name>ImportMaster</name></author>
	</entry>
</feed>