<?xml version="1.0"?>
<feed xmlns="http://www.w3.org/2005/Atom" xml:lang="mr">
	<id>https://mr.bharatpedia.org/w/index.php?action=history&amp;feed=atom&amp;title=%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97</id>
	<title>विजयदुर्ग - आवृत्ती इतिहास</title>
	<link rel="self" type="application/atom+xml" href="https://mr.bharatpedia.org/w/index.php?action=history&amp;feed=atom&amp;title=%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97"/>
	<link rel="alternate" type="text/html" href="https://mr.bharatpedia.org/w/index.php?title=%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97&amp;action=history"/>
	<updated>2026-08-24T04:03:54Z</updated>
	<subtitle>विकिवरील या पानाच्या आवृत्त्यांचा इतिहास</subtitle>
	<generator>MediaWiki 1.43.6</generator>
	<entry>
		<id>https://mr.bharatpedia.org/w/index.php?title=%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97&amp;diff=2260&amp;oldid=prev</id>
		<title>ImportMaster: robot: Import pages using विशेष:आयात</title>
		<link rel="alternate" type="text/html" href="https://mr.bharatpedia.org/w/index.php?title=%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97&amp;diff=2260&amp;oldid=prev"/>
		<updated>2022-05-01T18:41:09Z</updated>

		<summary type="html">&lt;p&gt;robot: Import pages using &lt;a href=&quot;/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4&quot; title=&quot;विशेष:आयात&quot;&gt;विशेष:आयात&lt;/a&gt;&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;b&gt;नवीन पृष्ठ&lt;/b&gt;&lt;/p&gt;&lt;div&gt;{{माहितीचौकट किल्ला&lt;br /&gt;
| नाव = विजयदुर्ग  (किल्ला)&lt;br /&gt;
|चित्र = Bastions of vijaydurg.jpg&lt;br /&gt;
|चित्रtitle = विजयदुर्ग  (किल्ला)&lt;br /&gt;
|चित्ररुंदी = 220px&lt;br /&gt;
| मुळ_नकाशा_पट्टी= नाही &lt;br /&gt;
| उंची = 100&lt;br /&gt;
| प्रकार = जलदुर्ग &lt;br /&gt;
| श्रेणी = सोपी &lt;br /&gt;
| ठिकाण = [[सिंधुदुर्ग  जिल्हा|देवगड ]], [[महाराष्ट्र]]&lt;br /&gt;
| डोंगररांग = &lt;br /&gt;
| अवस्था = व्यवस्थित&lt;br /&gt;
| गाव = [[विजयदुर्ग]]&lt;br /&gt;
| स्थापना = ११९३&lt;br /&gt;
| अक्षांश= 16.5607 | रेखांश= 73.3334&lt;br /&gt;
}}&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&amp;#039;&amp;#039;&amp;#039;विजयदुर्ग&amp;#039;&amp;#039;&amp;#039; किंवा घेरिया हा [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील एक  किल्ला आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&amp;#039;&amp;#039;&amp;#039;विजयदुर्ग&amp;#039;&amp;#039;&amp;#039; हा [[सिंधुदुर्ग जिल्हा|सिंधुदुर्ग जिल्ह्यात]] असलेला एक [[जलदुर्ग]] आहे. हा किल्ला मुंबईच्या दक्षिणेस सुमारे २२५ किलोमीटरवर व गोव्याच्या उत्तरेस १५० किलोमीटरवर आहे. सुमारे १७ एकर जागेत हा किल्ला पसरला आहे. या किल्ल्यास तीन तटबंदी आहेत. त्यास चिलखती तटबंदी असे म्हणतात. याच्या तीन बाजू पाण्याने घेरलेल्या आहेत. या किल्ल्यात दोन भुयारी मार्ग आहेत. एक किल्ल्याच्या पूर्वेकडे तर दुसरा पश्चिमेकडे. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==इतिहास==&lt;br /&gt;
विजयदुर्ग हा किल्ला ११ व्या शतकाच्या अखेरीस शिलाहार घराण्यातील राजा भोजने बांधला. पुढे तो बहामनी व नंतर आदिलशाहीच्या ताब्यात होता. टॅव्हेरनिअर याने [[इ.स. १६५० ]]मध्ये या किल्ल्याला भेट दिली होती. तेव्हा त्याने त्याचे वर्णन &amp;#039;विजापूरकरांचा अभेद्य किल्ला&amp;#039; असे करून ठेवले आहे.  छत्रपती शिवाजी महाराजांनी १६६४ च्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये विजयदुर्ग किल्ला जिंकला.{{sfn|अक्कलकोट,२००९|पृ. ३५०}} [[कान्होजी आंग्रे]] आणि त्यांचे पुत्र संभाजी आंग्रे व तुळोजी आंग्रे यांच्या ताब्यात हा किल्ला [[इ.स. १७५६]]पर्यंत होता. पेशवे व इंग्रज यांच्या संयुक्त सैन्याने १३ फेब्रुवारी १७५६ रोजी [[तुळाजी आंग्रे]] यांच्या सैन्याचा पराभव करून विजयदुर्ग ताब्यात घेतला. यामुळे मराठ्यांचे सागरावरील वर्चस्व संपले. इंग्रज-पेशवे करारानुसार विजयदुर्ग पेशव्यांना देण्याचे ठरले होते परंतु इंग्रज सहजासहजी त्याला तयार झाले नाहीत. अखेर [[बाणकोट किल्ला]] व त्या जवळील सात गावे पेशव्यांकडून घेऊन इंग्रजांनी विजयदुर्ग आठ महिन्यानंतर पेशव्यांना दिला. पेशव्यांनी विजयदुर्गाचा प्रांत व सुभेदारी आनंदराव धुळप यांना दिली. {{sfn|अक्कलकोट,२००९|पृ. ३५०-३५१}} १६६४ ते १८१८ पर्यंत या किल्ल्यावर मराठी अंमल होता. त्यानंतर हा किल्ला इंग्रजांनी ताब्यात घेतला.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
विजयदुर्गला पूर्वेकडील जिब्राल्टर असेही म्हणत कारण हा एक अजिंक्य किल्ला होता. ४० किलोमीटर लांब असलेली वाघोटन खाडी हे या किल्ल्याचे बलस्थान आहे. कारण मोठी जहाजे खाडीच्या उथळ पाण्यात येऊ शकत नसत आणि मराठी आरमारातील छोटी जहाजे या खाडीत नांगरून ठेवली जात, पण ती समुद्रावरून दिसत नसत.&lt;br /&gt;
==हवामान==&lt;br /&gt;
पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे [[तांदूळ|भातशेती]] केली जाते.&lt;br /&gt;
==नागरी सुविधा==&lt;br /&gt;
येथे राष्ट्रीयीकृत [[बँक ऑफ इंडिया|बँक ऑफ इंडियाची]] शाखा आहे.&amp;lt;ref&amp;gt;/https://www.bankofindia.co.in/&amp;lt;/ref&amp;gt; शेती, दुग्धव्यवसाय,विहीर खोदणे, शेळ्यामेंढ्यापालन, किराणा दुकान,इतर सेवा व्यवसाय इत्यादीसाठी बँक वित्त पुरवठा करते.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==विजयदुर्गला पोहचायचे कसे: ==&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
विजयदुर्ग हे मुंबई पासून ४८५ किमी अंतरावर आहे तर पुण्यापासून ४५५ किमी अंतरावर आहे &lt;br /&gt;
 Good&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
== राष्ट्रीय संरक्षित स्मारक ==&lt;br /&gt;
या किल्ल्याला [[महाराष्ट्रातील संरक्षित स्मारके|महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक]] म्हणून दिनांक [[१३ डिसेंबर]], [[इ.स. १९१६]] या दिवशी घोषित करण्यात आलेले आहे.&amp;lt;ref&amp;gt;{{संकेतस्थळ स्रोत | दुवा=http://www.asimumbaicircle.com/m_sindhudurg.html | प्रकाशक=आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया, मुंबई सर्कल | भाषा=इंग्रजी | title=सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट, इन्व्हेन्टरी ऑफ मॉन्युमेन्ट्स | ॲक्सेसदिनांक=२२ ऑगस्ट, इ.स. २०१३}}&amp;lt;/ref&amp;gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==विजयदुर्गाचे रहस्य==&lt;br /&gt;
एकदा इंग्रजांनी विजयदुर्ग जिंकण्यासाठी तीन युद्धनौका आणि सैन्य घेऊन स्वारी केली. जलदुर्ग जिंकायचा म्हणजे त्यावर आधी तोफांचा भडिमार करून मग किल्ल्यावर चढाई करायची. त्याअनुषंगाने सगळ्या युद्धनौका किल्ल्याजवळ न्यायाचा त्यांचा मनसुबा होता पण, एकेक करून तीनही युद्धनौका बुडाल्या. याच कारण विजयदुर्गाच्या सभोवताली असणारी जाडजूड भिंत ही भिंत शिवरायांनी बांधून घेतली किल्ल्याचं शत्रूंकडून संरक्षण करण्यासाठी. ही भिंत इतकी खोल आहे की ती ओहोटीतही पाण्याच्या वर दिसत नाही.&lt;br /&gt;
स्वराज्याच्या आरमाराची जहाजं गलबतं-मचवे वगैरे ह्या भिंती वरून सहज ये-जा करत. कारण त्यांचे तळ, उथळ आणि सपाट होते. याविरुद्ध इंग्रजांच्या जहाजाचे तळ निमुळते आणि खोल असत. म्हणूनच पाश्चात्यांची जहाजं गडाजवळ येऊन या भिंतीला धडकून पाण्यात बुडून जातं. या समुद्राच्या तळाशी असणाऱ्या भिंतीमुळं विजयदुर्ग अभेद्य राहीला. सदर भिंत ही शिवरायांच्या कारकिर्दीत बांधल्याच्या तथ्याला नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ओशनोग्रफीतील तज्ञांनी दुजोरा दिला &amp;lt;ref&amp;gt; शिवरायांचे दुर्गविज्ञान आणि दुर्गव्यवस्थापन - प्र. के. घाणेकर &amp;lt;/ref&amp;gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
== संदर्भ आणि नोंदी ==&lt;br /&gt;
{{संदर्भयादी}}&lt;br /&gt;
==संदर्भसूची==&lt;br /&gt;
*{{स्रोत पुस्तक&lt;br /&gt;
| पहिलेनाव = सतीश&lt;br /&gt;
| आडनाव = अक्कलकोट&lt;br /&gt;
| title =  दुर्ग&lt;br /&gt;
| भाषा =  मराठी&lt;br /&gt;
| प्रकाशक =  सह्याद्री प्रकाशन, सांगली&lt;br /&gt;
| वर्ष = २००९&lt;br /&gt;
}}&lt;br /&gt;
{{महाराष्ट्रातील किल्ले}}&lt;br /&gt;
{{मराठा साम्राज्य}}&lt;br /&gt;
[[वर्ग:महाराष्ट्रातील किल्ले]]&lt;br /&gt;
[[वर्ग:सिंधुदुर्ग जिल्हा]]&lt;br /&gt;
[[वर्ग:महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारके]]&lt;/div&gt;</summary>
		<author><name>ImportMaster</name></author>
	</entry>
</feed>