<?xml version="1.0"?>
<feed xmlns="http://www.w3.org/2005/Atom" xml:lang="mr">
	<id>https://mr.bharatpedia.org/w/index.php?action=history&amp;feed=atom&amp;title=%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%B5_%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A5</id>
	<title>शाबरी विद्या व नवनांथ - आवृत्ती इतिहास</title>
	<link rel="self" type="application/atom+xml" href="https://mr.bharatpedia.org/w/index.php?action=history&amp;feed=atom&amp;title=%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%B5_%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A5"/>
	<link rel="alternate" type="text/html" href="https://mr.bharatpedia.org/w/index.php?title=%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%B5_%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A5&amp;action=history"/>
	<updated>2026-08-28T06:01:02Z</updated>
	<subtitle>विकिवरील या पानाच्या आवृत्त्यांचा इतिहास</subtitle>
	<generator>MediaWiki 1.43.6</generator>
	<entry>
		<id>https://mr.bharatpedia.org/w/index.php?title=%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%B5_%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A5&amp;diff=7318&amp;oldid=prev</id>
		<title>ImportMaster: robot: Import pages using विशेष:आयात</title>
		<link rel="alternate" type="text/html" href="https://mr.bharatpedia.org/w/index.php?title=%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%B5_%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A5&amp;diff=7318&amp;oldid=prev"/>
		<updated>2022-05-01T18:44:14Z</updated>

		<summary type="html">&lt;p&gt;robot: Import pages using &lt;a href=&quot;/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4&quot; title=&quot;विशेष:आयात&quot;&gt;विशेष:आयात&lt;/a&gt;&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;b&gt;नवीन पृष्ठ&lt;/b&gt;&lt;/p&gt;&lt;div&gt;शाबरी विद्या किवा मंत्र किंवा विद्या कोणी व कशासाठी  तयार केली ?&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
क्षनाथांनी ती विद्या काव्याद्वारे प्रसारीत केली. हे मंत्र सिद्ध असल्यामुळे भूत, पिशाच्च बाधा, पीडा, संकटे यांचा नाश करणारे आहेत. प्राणायाम, साधनेद्वारे हे मंत्र सिद्ध करता येतात. नवनाथांनी या विद्येत भर घातली. विशेषतः मछिंदरनाथनी ती विद्या काव्याद्वारे प्रसारीत केली. हे मंत्र सिद्ध असल्यामुळे भूत, पिशाच्च बाधा, पीडा, संकटे यांचा नाश करणारे आहेत. प्राणायाम, साधनेद्वारे हे मंत्र सिद्ध करता येतात.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
शाबरीकवच हंस ग्रंथ संस्कृत भाषेत लिहिलेला आहे. शाबरीकवच हे मच्छिंद्र आणि गोरखनाथ यांनी लिहिले आहे आणि इतर नवनाथांनी हा ग्रंथ लिहिण्यात हातभार लावला आहे. शाबरी कवच वाचन केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात असे मानले जाते.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
=== नवनाथ (9 नारायण) ===&lt;br /&gt;
कलियुगाचा नुकताच प्रारंभ झाला. त्यावेळी विष्णूने नवनारायनांना बोलाविले. आपल्याला सर्वांना पृथ्वीवर अवतार घ्यायचा आहे. त्यामुळे धर्माचा उदय होईल. लोक सत्याने व न्यायाने वागतील व सुखाने राहतील. इतर देवही अवतार घेणार आहेत, असे विष्णूने सांगितले. त्याप्रमाणे नवनारायणांनी पृथ्वीवर अवतार घेतले. तेच पुढे नवनाथ म्हणून नावारुपाला आले.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
=== मत्स्येंद्रनाथ ===&lt;br /&gt;
&amp;lt;poem&amp;gt;&lt;br /&gt;
&amp;quot;अरे हा कविनारायण ।&lt;br /&gt;
च्छोदरी पावला जनन।।&lt;br /&gt;
तरी मच्चेंद्र ऐसे याते नाम।&lt;br /&gt;
जगामाजी मिरवी की ।।33।।&lt;br /&gt;
(नवनाथ ग्रंथ अध्याय 1, ओवी 33 वी)&amp;lt;/poem&amp;gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
एकदा शंकर व पार्वती कैलास पर्वतावर गप्पा मारत बसले होते. मला अनुग्रह द्यावा, अशी विनंती पार्वतीने शंकराला केली. जागा शांत हवी, म्हणून यमुनातीरी शंकराने अनुग्रह दिला. यमुनेच्या पाण्यात कविनारायण एका मासळीच्या पोटात बसले होते. त्यांनी शंकराचा हा सर्व उपदेश ऐकला. शंकराने पार्वतीला या उपदेशाचे सार काय? असा प्रश्‍न केला, तेव्हा कविनारायण मध्येच उत्तरला सगळं काही ब्रह्मस्वरुप आहे. शंकराने उत्तर ऐकले व समजून चुकले की कविनारायण मासळीच्या पोटात आहेत.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
शंकर म्हणाले, की तू अवतार घेतल्यावर बद्रीकाश्रमास ये. तेथे मी तुला दर्शन देईल. पुढे मासळीने अंडे घातले. ते अंडे उमलले. त्यातून सुंदर मुलगा बाहेर आला. कामिक नावाचा कोळी तेथे आला. त्याला मूलबाळ नव्हते. मुलगा पाहून त्याला आनंद झाला. मुलाला त्याने घरी नेले. कामिकाची पत्‍नी सारद्वता हिलाही आनंद झाला. तिने बाळाला छातीशी धरले, तर तिला लगेच पान्हा फुटला. माशाच्या पोटी जन्माला म्हणून त्याचे नाव मत्स्येंद्रनाथ ठेवले. मत्स्येंद्रनाथ स्त्री राज्यात आले. तेथे मैनाकिनीशी त्यांचा विवाह झाला. त्यांना मुलगा झाला. त्याचे नाव मिनीनाथ ठेवले. मच्छिंद्रनाथांचे जन्मस्थान यमुनातीरी आहे. त्यांची संजीवन समाधी सावरगाव (ता. पाटोदा, जि. बीड) येथे आहे. मायंबा म्हणूनही हे देवस्थान प्रसिद्ध आहे. येथे जाण्यासाठी नगर जिल्ह्यातील नगर-पाथर्डी रोडवरून देवराई फाट्यावरून [[वृद्धेश्‍वर]], तेथून सावरगावला जाता येथे. मढीवरूनही [[वृद्धेश्‍वर]]ला व पुढे मच्छिंद्रनाथ गडावर जाता येते.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
=== गोरक्षनाथ ===&lt;br /&gt;
&amp;lt;poem&amp;gt;&amp;quot;&amp;quot;तरी आता न लावी उशिर ।&lt;br /&gt;
हे गोरक्षनाथ निघे बाहेर ।।&lt;br /&gt;
ऐंसे वदता नाथ मच्छिंद्र ।।&lt;br /&gt;
बाळ शब्द उदेला ।।75।।&lt;br /&gt;
(अध्या 9 वा, ओवी 75)&amp;lt;/poem&amp;gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
मत्स्येंद्रनाथ तीर्थाटन करीत चंद्रगिरी गावी आले. एका बाईला (सरस्वती) त्यांनी पूर्वी पूत्रप्राप्तीसाठी भस्म दिले होते. तिच्या घरी येऊन अलख असे म्हणाले. सरस्वतीबाई दाराशी आल्या, तर बाई तुझा मुलगा कुठे आहे, असे मत्स्येंद्रनाथांनी विचारले. कुठला मुलगा बाबा, असं त्या बाई म्हणाल्या, मी भस्म दिले होते. ते वाया जाणार नाही, असे नाथ म्हणाले. बाईने ते भस्म उकिरड्यात टाकले होते. तेथे मस्त्येंद्रनाथ गेले. &amp;quot;अलख निरंजन, हरि नारायणा बाहेर ये&amp;#039;, असे म्हणताच उकिरड्यातून बारा वर्षांचा मुलगा बाहेर आला. तू गोवरात (उकिरड्यात) जन्मलास म्हणून तुझे नाव गोरक्षनाथ आहे, असे म्हणून मत्स्येंद्रनाथांनी गोरक्षनाथांना तीर्थटनासाठी बरोबर नेले. गोरक्षनाथांचे जन्मस्थान चंद्रगिरी (बंगाल) येथे आहे, तर संजीवन समाधी गिरनार पर्वत (सौराष्ट्र) येथे आहे. सौराष्ट्र काठेवाड प्रांतात जुनागड जिल्ह्यात गिरणार पर्वत आहे. राजटोकाहून जुनागड सुमारे 100 कि.मी. अंतरावर आहे. गिरणारहून द्वारकाधाम, सोरटी सोमनाथाला जाता येते. गिरणारच्या टोकावर गोरक्षनाथांचे लहान मंदिर आहे. तेथे काळ्या पाषाणची मूर्ती आहे. हा नेपाळ प्रांत आहे. तेथील हे देवस्थान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळेच तेथील लोकांना गुरखा किंवा गोरखा म्हणत असावे. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
नगर जिल्ह्यातील डोंगरगण (ता. नगर) जवळ गोरक्षनाथांनी तपश्‍चर्या केली. येथे जाण्यासाठी नगर-औरंगाबाद रोडवरून शेंडी गावाच्या पुढे गेल्यावर डोंगरगणला जाता येते. तेथून ३ किलोमीटर अंतरावर हा गोरक्षनाथ गड आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
=== गहिनीनाथ ===&lt;br /&gt;
&amp;lt;poem&amp;gt;तेंगे करूनी पंचभूत।&lt;br /&gt;
दृश्‍यत्त्व पावले संजीवनी अर्थ।।&lt;br /&gt;
करभंजन ते संधीत ।&lt;br /&gt;
प्रेरक झाला जीवित्त्वा ।।61।।&lt;br /&gt;
(अध्याय 10, ओवी 61)&amp;lt;/poem&amp;gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
कनकगिरी गावात मस्त्येंद्रनाथाने गोरक्षनाथाला गुरुमंत्र दिला. तेथेच गोरक्षनाथ एकदा मंत्रांचा जप करीत बसले. गावातील काही मुले चिखलाचा गोळा घेऊन आले व बाबा आम्हाला गाडी करून द्या, असे म्हणू लागले; परंतु बाबाने गाडी नाही करता येणार, असे सांगितल्यावर मुलांनीच गाडी तयार केली. आता त्याला गाडीवान हवा म्हणून गोरक्षनाथांनी गाडीवान तयार करून दिला. गाडीवानाचा मातीचा पुतळा तयार करताना तोंडातून मंत्राचा जप चालूच होता. पुतळा तयार होताच करभंजन नारायनाने त्यात प्रवेश केला. चिखलाचा पुतळा जिवंत झाला. मुले घाबरली. गोरक्षनाथही गडबडले. इतक्‍यात मत्स्येंद्रनाथ तेथे आले. त्यांना हा प्रकार काय झाला, ते समजले. दोघांनी त्या मुलाला उचलले व एका ब्राम्हणाकडे दिले. ब्राह्मणाचे नाव मधुनाथा होते. त्याच्या बायकोचे नाव गंगा होते. दोघांनी ते बाळ घेतले. मत्स्येंद्रनाथांच्या सांगण्यावरून त्याचे नाव गहिनीनाथ ठेवले. गहिनीनाथांचे जन्मस्थान कनकगिरी (जगन्नाथपुरी) येथे आहे. संजीवन समाधी चिंचोली (जि. बीड) येथे गहिनीनाथ गडाजवळ आहे. येथे जाण्यासाठी बीडहून आल्यास येवलवाडी (ता. पाटोदा) येथील जालिंदरनाथांचे दर्शन घेऊन डोंगरकिन्ही येथे जाऊन हातोला फाट्यामार्गे कुसळंब व तेथून चिंचोलीला जाता येते. नगरहून निघाल्यास नगर बीड रस्त्यावरून (अडबंगनाथ गड मार्गे) जाता येते.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
=== जालिंदरनाथ ===&lt;br /&gt;
&amp;lt;poem&amp;gt;विप्रो हाते सलील बाळ ते जातें।&lt;br /&gt;
रक्षता स्पर्शता लागे हाते।।&lt;br /&gt;
दृष्टी पाहता बाळाने ।&lt;br /&gt;
जुळवत रुदन करी ।।112।।&lt;br /&gt;
(अध्याय 11 ओवी 112)&amp;lt;/poem&amp;gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
पांडवकुळात हस्तिनापूर ब्रहद्रवा नावाचा राजा होता. त्याने सोमयज्ञ केला. यज्ञातील विभूती घेण्यासाठी राजाने यज्ञकुंडात हात घातला. त्याच्या हाताला मूल लागले. अत्यंत सुंदर व गोंडस दिसणारे हे मुल रडू लागले. राजाने त्याला कुंडाबाहेर काढले व आनंदाने राणीकडे घेऊन गेले. अग्नीने दिलेल्या या मुलाचे नाव &amp;quot;जालंदरनाथ&amp;#039; असे ठेवले. जालंदर नाथ या नावाचा अपभ्रंष होऊन पुढे जालिंदरनाथ हे नाव प्रसिद्ध झाले. त्यांनी पुढे नाथ संप्रदायाची दीक्षा घेतली. जालिंदरनाथांचे जन्मस्थान हस्तीनापूरमध्ये आहे. तर संजीवन समाधी येवलवाडी (ता. पाटोदा, जि. बिड) येथे आहे. येथे जाण्यासाठी पाथर्डी-बीड रस्त्यावरून रायमोहा गावापासून येवलवाडी व पुढे जालिंदरनाथांच्या समाधीस्थळी जाता येते.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
=== कानिफनाथ ===&lt;br /&gt;
&amp;lt;poem&amp;gt;त्वरे येऊन कर्णदृसी।&lt;br /&gt;
दृष्टी पाहे ब्रह्मचारी ।&lt;br /&gt;
सहज करूनी उभयकरी ।।&lt;br /&gt;
नमस्कारी प्रेमाणे ।।११५।।&lt;br /&gt;
(अध्यय १२ वा, ओवी ११५)&amp;lt;/poem&amp;gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
बद्रीकाश्रमात शंकर, अग्निदेव व जालिंदरनाथ गप्पा मारत होते. शंकर म्हणाले हे पहा जालंदर, हिमालयात एक मोठा हत्ती आहे. त्याच्या कानात प्रब्रुद्धनारायणाने जन्म घेतला आहे. आपण तेथे जाऊ, तिघेही हिमालयात गेले. हत्ती पर्वतावर होता. जालिंदरनाथांनी मोठ्याने हाक दिली, हे प्रब्रुद्धनारायणा. तेव्हा एक सोळा वर्षाचा मुलगा हत्तीच्या कानातून बाहेर आला. त्यामुळे त्याचे नाव कानिफनाथ असे ठेवले. कानिफनाथांनी खाली उतरून सर्वांना नमस्कार केला. कानिफनाथांचे जन्मस्थान गिरीटंक (हिमालय) पर्वतावर आहे. संजीवन समाधी मढी (ता. पाथर्डी, जि. नगर) येथे आहे. येथे जाण्यासाठी नगर-पाथर्डी रस्त्यावरून तिसगावपासून मढीला जाता येते.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
=== भर्तरीनाथ===&lt;br /&gt;
&amp;lt;poem&amp;gt;भर्तरी भंगताचि बाळ त्यांत ।&lt;br /&gt;
तेजस्वी मिरविले शकलांत ।।&lt;br /&gt;
क्षिकेचे मोहळ व्यक्त ।&lt;br /&gt;
तेही एकांग जाहले ।।२७।। &lt;br /&gt;
(अध्याय २४, ओवी २७) &amp;lt;/poem&amp;gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
भर्तरीनाथांच्या जन्माचे गुढ उकलले नाही. मात्र ग्रंथाल उल्लेखील्याप्रमाणे एकदा उर्वशीचे अनुपम सौंदर्य पाहून सूर्याचा वीर्यपात झाला. त्या वीर्याचा एक भाग कौलिक ऋषीच्या भिक्षापात्रात पडला. त्यातून ३१०३ वर्षांनी भगवान अवतार घेतील, हे ऋषींनी ओळखले. त्यांनी हे पात्र जपून ठेवले. ठरल्या वेळी द्रमीलनारायणाने त्यात प्रवेश करून प्रकट झाले. बालकाचा जन्म झाला. ते म्हणजे भर्तरीनाथ. त्याला एका हरिणीने आपल्या पिलांसोबत मोठे केले. हरणांच्या संगतीत झाडांचा पाला खाऊन तो मोठा झाला. एकदा जंगलातून जयसिंग व रेणुका हे ब्राह्मण दाम्पत्य जात होते. त्यांनी मुलाला जवळ केले. त्याला माणसांची भाषा शिकविली. पुढे गोरक्षनाथांनी त्याला नाथपंताची दीक्षा दिली. भर्तरीनाथांचे जन्मस्थान नैमिष्यारण्य आहे. तर संजीवन समाधी हरंगुल (ता. गंगाखेड, जि. परभणी) येथे आहे. येथे जाण्यासाठी गंगाखेड तालुक्‍यातून वडगाव फाट्यावर उतरून हरंगुलला जाता येते. बीड जिल्ह्यातील बारा ज्योतिर्लिंगपैकी परळी वैजनाथ- गंगाखेड रोडवरून वडगाव फाट्यावरून जाता येते.  &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
=== रेवणनाथ ===&lt;br /&gt;
&amp;lt;poem&amp;gt;पातला परी अकस्मात ।&lt;br /&gt;
येता झाला बाळ जेय ।।&lt;br /&gt;
सहज चाली पुढे चालत ।&lt;br /&gt;
बाळ दृष्टी देखिले ।।२१।।&lt;br /&gt;
(अध्याय ३४, ओवी २१ की १२१?)&amp;lt;/poem&amp;gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
ब्रह्मदेवाचे वीर्य रेवा नदीच्या तीरावर पडले. त्याचाच पूर्व संकेतानुसार चमसनारायणांनी प्रवेश केला. एक मुलगा जन्मास आला. सहजसरुख नावाच्या कुणब्याने त्याला पाहिले. त्याने व त्याच्या पत्‍नीने या बाळाला सांभाळले. रेवा नदीकाठी सापडला म्हणून त्याचे नाव रेवणनाथ ठेवले. दत्तात्रयांनी त्याला महिमासिद्धी दिली. रेवणनाथांचे जन्मस्थान रेवानदी, तर संजीवन समाधी रेणावी (विटा, ता. खानापूर, जि. सांगली) येथे आहे. येथे जाण्यासाठी विटे गावातून १० कि.मी. अंतरावर रेणावी हे गाव आहे. तेथेच हे देवस्थान आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
=== वटसिद्ध नागनाथ ===&lt;br /&gt;
&amp;lt;poem&amp;gt;असो वटवृक्ष पोखरांत ।&lt;br /&gt;
अंड राहिले दिवस बहूत ।।&lt;br /&gt;
अवि होत्र नारायण त्यांत ।&lt;br /&gt;
ईश्‍वर सत्ते संचारला ।।९२।।&lt;br /&gt;
दिवसेंदिवस अंडात।&lt;br /&gt;
वाडी लागले जीववंत ।।&lt;br /&gt;
देह होता सामर्थ्यवंत ।&lt;br /&gt;
भगन लागे अंड ते ।।९३।।&lt;br /&gt;
त्यांत तलवर पोखरांत ।&lt;br /&gt;
बाळ रुदन करी अत्यंत ।।&lt;br /&gt;
निढळवाणी कोण त्यांते ।&lt;br /&gt;
रक्षणाते नसेची ।।९४।। &lt;br /&gt;
(अध्याय ३६, ओवी ९२, ९३, ९४)&amp;lt;/poem&amp;gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
ब्रह्मदेवाचे वीर्य एका सर्पिणीने भक्ष केले. तीच्या पोटी अग्निहोत्र नारायणाने प्रवेश केला. अस्तिक ऋषिंच्या सांगण्यावरून सर्पिण झाडाच्या ढोलीत बसून राहिली. सर्पिणीने एक अंडे घातले. ते फुटून मूल बाहेर आले. ते रडू लागले. याच वेळी कोश धर्मा नावाचा ब्राह्मण तेथून जात होता. त्याने ते बाळ घेतले. पत्‍नी सुरादेवीला दाखविले. त्यांनी त्याचा सांभाळ केला. वडाच्या ढोलीत जन्मला म्हणून त्याचे नाव वटसिद्ध नागनाथ असे ठेवले. दत्तात्रयांनी त्याला नाथपंथाची दीक्षा दिली. नागनाथांचे जन्मस्थान नैमिष्यारण्य येथे आहे. तर संजीवन समाधी वडवळ (ता. चाकूर, जि. लातूर) येथे आहे. येथे जाण्यासाठी लातूरवरून २५ कि.मी. अंतरावर चाकूर तालुक्‍यात वडवळ हे गाव आहे. हैद्राबाद - परळी रेल्वे मार्गावर हे तीर्थस्थान आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
=== चरपटीनाथ ===&lt;br /&gt;
&amp;lt;poem&amp;gt;या परी बहुता दिवशी । &lt;br /&gt;
ईश्‍वर आता अवतार ।।&lt;br /&gt;
विप्पलायन त्या रेतासी । &lt;br /&gt;
नारायण संचारला ।।२१।।&lt;br /&gt;
(अध्याय ३८, ओवी २१)&amp;lt;/poem&amp;gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
एकदा पार्वतीच्या विवाहप्रसंगी सर्व देव जमले होते. पार्वतीच्या सौंदर्याला पाहून ब्रह्मदेवाचे वीर्यपतन झाले. ते ब्रह्मदेवाने टाचेने रगडले. त्यामुळे त्याचे दोन भाग झाले. एका भागाचे योगे साठ हजार वालखित्य ऋषी उत्पन्न झाले. दुसरा भाग मात्र नदीत वाहत जाऊन एका कुशास अडकला. त्यात पिप्पलायण यांनी प्रवेश केला. त्याच वेळी बालकाचा जन्म झाला. सत्यश्रवा नावाचा ब्राह्मण पुनीत गावात राहता होता. एक दिवस भागीरथीच्या किनाऱ्यावर त्याला मुलगा दिसला. ब्राह्मणाने ते मूल उचलून सत्यश्रवाकडे दिले व सांभाळण्यास सांगितले. त्याचे नावही &amp;quot;चरपटीनाथ&amp;#039; असे ठेवण्यास सांगितले. सत्यश्रवा व त्याची पत्‍नी चंद्रा यांनी त्याचा सांभाळ केला. पुढे दत्तात्रेरयांनी त्याला अनुग्रह दिला. चर्पटीनाथांचे जन्मस्थान रेवानदी, तर संजीवन समाधी मात्र नाही. कारण ते गुप्त रूपाने अद्यापही भ्रमण करीत आहेत, असा उल्लेख ग्रंथांत आढळतो. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
या नवनाथांबरोबरच मत्स्येंद्रनाथांचे चौरंगीनाथ, मीननाथ हे शिष्य आहेत. प्रत्येक नाथांचे काही शिष्य सिद्ध आहेत. त्यांची संख्या ८४ आहे. या शिष्यांनाच ८४ सिद्ध असे म्हणतात.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
[[वर्ग:नाथ संप्रदाय]]&lt;/div&gt;</summary>
		<author><name>ImportMaster</name></author>
	</entry>
</feed>