<?xml version="1.0"?>
<feed xmlns="http://www.w3.org/2005/Atom" xml:lang="mr">
	<id>https://mr.bharatpedia.org/w/index.php?action=history&amp;feed=atom&amp;title=%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A7%E0%A4%B0_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80</id>
	<title>श्रीधर स्वामी - आवृत्ती इतिहास</title>
	<link rel="self" type="application/atom+xml" href="https://mr.bharatpedia.org/w/index.php?action=history&amp;feed=atom&amp;title=%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A7%E0%A4%B0_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80"/>
	<link rel="alternate" type="text/html" href="https://mr.bharatpedia.org/w/index.php?title=%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A7%E0%A4%B0_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80&amp;action=history"/>
	<updated>2026-08-25T22:30:53Z</updated>
	<subtitle>विकिवरील या पानाच्या आवृत्त्यांचा इतिहास</subtitle>
	<generator>MediaWiki 1.43.6</generator>
	<entry>
		<id>https://mr.bharatpedia.org/w/index.php?title=%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A7%E0%A4%B0_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80&amp;diff=7258&amp;oldid=prev</id>
		<title>ImportMaster: robot: Import pages using विशेष:आयात</title>
		<link rel="alternate" type="text/html" href="https://mr.bharatpedia.org/w/index.php?title=%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A7%E0%A4%B0_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80&amp;diff=7258&amp;oldid=prev"/>
		<updated>2022-05-01T17:28:14Z</updated>

		<summary type="html">&lt;p&gt;robot: Import pages using &lt;a href=&quot;/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4&quot; title=&quot;विशेष:आयात&quot;&gt;विशेष:आयात&lt;/a&gt;&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;b&gt;नवीन पृष्ठ&lt;/b&gt;&lt;/p&gt;&lt;div&gt;&lt;br /&gt;
[[File:Sridharswami.jpg|thumb|श्रीधर स्वामी]]&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
महान संत प.पू. भगवान &amp;#039;&amp;#039;&amp;#039;श्रीधर स्वामी&amp;#039;&amp;#039;&amp;#039; महाराज मूळचे मराठवाड्यातील गळेगांव ता. बिलोली जिल्हा नांदेड स्वामीजींच्या मातापित्यांनी गाणगापूरला कठोर तपश्‍चर्या केली. दत्तमहाराजांचा संपूर्ण आशीर्वाद लाभला.आणि त्या आशीर्वादाचे गोंडस फळ म्हणजे प.पू. स्वामीजींचा जन्म.श्रीधर स्वामीजींचा जन्म १९०८ साली दत्तजयंतीच्या दिवशी झाला.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
लहानपणापासूनच यांना कथाकीर्तने ऐकण्याची गोडी लागली होती. तसेच रामनामाने हुकमी यश मिळते, असाही त्यांना अनुभव आला होता. शाळेचा अभ्यास, खेळ, देवपूजा, कथाकीर्तनश्रवण व व्यायाम अशा गोष्टीत यांचा बाळपणाचा काळ मजेत चालला होता. पण वयाच्या बाराव्या - तेराव्या वर्षी यांची आई वारली आणि त्यात खंड पडला. त्यानंतर हैदराबाद व गुलबर्गा येथे नातेवाईकांकडे राहून यांनी आपले प्राथमिक शिक्षण पुरे केले व माध्यमिक शिक्षणासाठी हे पुण्याला गेले. पण वेद, उपनिषदे, पुराणे यांना गौणत्व देणाऱ्या आणि आपल्या धर्माची श्रद्धा लोपवून टाकणाऱ्या इंग्रजी शिक्षणात यांना गोडी वाटेना. . श्रुतिस्मृतिपुराणोक्त समाजाच्या उभारणीनेच भारताला पूर्ववत् वैभव प्राप्त होईल, अशी यांची श्रद्धा होती. तेव्हा सनातन आर्य धर्माच्या प्रसारासाठी आपण आपले जीवन समर्पित करावे, असे स्वामींनी ठरवले. त्यासाठी आपण अध्यात्मिक क्षेत्रात अधिकार मिळवावा, असे स्वामींच्या मनाने घेतले. अध्यात्मिक क्षेत्रात प्रगती करण्यासाठी योग्य अशा गुरूची कास धरावी लागते, त्याचप्रमाणे उग्र तपश्चर्याही करावी लागते हे यांना माहीत होते. म्हणून यांनी एका विजयादशमीला सज्जनगडावर तपस्येसाठी जाण्याचा निर्णय घेतला. त्या दिवशी आज हा देह भगवंताला अर्पण करायचा, म्हणून यांनी एका कागदावर पुढील अर्थाचा मजकूर लिहिला -&amp;quot; मी अामरण अस्खलित ब्रह्मचर्य पाळीन. द्रव्याला शिवणार नाही. न मागताही आग्रहाने कोणी दिल्यास त्याचा उपयोग परोपकारार्थ करीन. मठपती होऊन कुठेही राहणार नाही. गरीबाला शक्य होण्याइतक्या साध्या गरजा ठेवीन. स्त्रीपुरूषांना समदृष्टीने बोध करीन. अखिल स्त्रीसमाज मातेप्रामाणे मानीन. देहनिर्वाहाच्या गरजा शक्य तितक्या कमी करून, होईल तितक्या लोककल्याणाकरिता मी तनमनधनाने झटेन, होईल तितका प्रयत्न करून धर्माची अवनती घालवून जग सुखी करीन. हे सर्व पूर्ण होण्याकरिता हा देह कर्तुमकर्तुमन्यथाकर्तुम, अशा भगवंताला मी अर्पण केला आहे. मी मुक्त होऊन जगाला मुक्त करावे, हा पुढचा सर्व भार भगवंतावर आहे. त्याने आपल्या ब्रीदाला उणीव न येईल अशा रीतीने या शरण आलेल्या भक्ताचे काळजीपूर्वक संरक्षण करावे. यापुढे या देहाकडून होणाऱ्या चांगल्या किंवा वाईट कर्माचा जबाबदार तोच आहे.&amp;quot;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
स्वामीजींना लहानपणापासून अध्यात्माची ओढ आणि आवड होती. या ओढीनेच स्वामीजींना समर्थांच्या सज्जनगडावर आणले.सज्जनगडावर स्वामीजींनी साधनेबरोबरच समर्थांची सेवा सुरू केली.साधनेबरोबरच सज्जनगडावर सेवेलाही विलक्षण महत्त्व आहे.कल्याण स्वामींनी समर्थांच्या सान्निध्यात सेवा करून चंदनाप्रमाणे आपला देह सद्गुरूंच्या चरणी झिजवला.... त्या कल्याण स्वामींच्या सेवेची आठवण पुन्हा प. पू. भगवान श्रीधर स्वामी महाराजांनी करून दिली.....&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
साधन आणि सेवेने पावन होऊन सज्जनगडावर समर्थांनी समाधीच्या बाहेर येऊन कल्याण स्वामींना दर्शन दिले होते..... त्याच पद्धतीने श्रीधर स्वामींनाही समर्थांनी समाधीच्या बाहेर येऊन प्रत्यक्ष दर्शन दिलेले आहे.... व दर्शन देऊन स्वामीजींना दक्षिणेकडे (कर्नाटकात) जाऊन कार्य करण्याची समर्थांनी आज्ञा केली..... त्याप्रमाणे श्रीधर स्वामींचे महान कार्य महाराष्ट्रात आहेच..... त्याप्रमाणे दक्षिणेकडेही स्वामीजींनी समर्थांना अभिप्रेत असणारा परमार्थ सर्वसामान्यांना शिकवला.....श्रीधर स्वामींनी आर्य संस्कृती नावाचा ग्रंथ लिहिला.&lt;br /&gt;
[[File:Shridhar swami.jpg|thumb|श्रीधर स्वामींची समाधी.]]&lt;br /&gt;
आर्य संस्कृती हा स्वामीजींनी लिहिलेला ग्रंथ साधकांना साधनेची दिव्यानुभूती देणारा आहे..... साधक अवस्थेतून सिद्धावस्थेपर्यंत पोहोचलेले महान संत श्रीधर स्वामी महाराजांनी १९७३ साली वरदहळ्ळी (वरदपूर), ता. सागर, जि. शिमोगा (कर्नाटक) येथे महासमाधी घेतली.....&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
मधल्या कालखंडात समर्थ संप्रदायाला एक प्रकारची ग्लानी व औदासीन्य  आले होते. आणि समर्थांचे समाधी स्थान सज्जनगड त्याचप्रमाणे चाफळ, शिवथरघळ, समर्थांचे जन्म गाव जांब या ठिकाणांचाही खूप विकास घडवून आणणे गरजेचे होते. श्रीधर स्वामींनी संपूर्ण भारतभ्रमण करून हिंदू धर्माचा आणि समर्थ संप्रदायाचा प्रसार आणि प्रचार केला. त्यांचे असंख्य भक्त महाराष्ट्रात त्याचप्रमाणे कर्नाटकात, व  काही प्रमाणात भारतभर पसरले आहेत. त्यांनी सज्जनगड, शिवथरघळ,  चाफळ या ठिकाणांचा प्रचंड विकास घडवून आणला. त्यांच्या प्रेरणेने त्यांच्या शिष्यांनी गडावर &amp;quot;श्री.समर्थ सेवा मंडळ, सज्जनगड&amp;quot; या संस्थेची स्थापन १९५० साली  केली. स्वामींनी गडावरच्या सर्व ऐतिहासिक वास्तूंची उत्तम डागडुजी करून घेतली आणि गडावर येणाऱ्या समर्थभक्तांची सोय लक्षात घेऊन गडावर मोठ्या प्रमाणात भौतिक सुविधा घडवूनन आणल्या. श्रधर स्वामींची समाधी कर्नाटकातील वरदपूर येथे आहे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==श्रीधर स्वामींची ग्रंथरचना==&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
* आर्य संस्कृती 	&lt;br /&gt;
* [[श्रीमद्दासबोधतत्त्वस्तवः]]	&lt;br /&gt;
* [[श्रीधरस्वामीविरचितं श्रीराममंत्रराजस्तोत्र]]	 &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==चरित्र==	&lt;br /&gt;
* श्रीधरस्वामी चरित्र आणि वाङ्‌मय या मूळ कानडी भाषेतल्या ग्रंथाचा मराठी अनुवाद अजित कुलकर्णी यांनी, तर भावानुवाद डॉ. भालचंद्र कोपरेकर यांनी केला आहे. &lt;br /&gt;
* श्रीमद् सदगुरू भगवान श्रीधर स्वामी (चरित्र, अजित कुलकर्णी)&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
[[वर्ग:समर्थ संप्रदाय]]&lt;br /&gt;
[[वर्ग:हिंदू संत]]&lt;br /&gt;
[[वर्ग:इ.स. १९०८ मधील जन्म]]&lt;br /&gt;
[[वर्ग:इ.स. १९७३ मधील मृत्यू]]&lt;/div&gt;</summary>
		<author><name>ImportMaster</name></author>
	</entry>
</feed>