<?xml version="1.0"?>
<feed xmlns="http://www.w3.org/2005/Atom" xml:lang="mr">
	<id>https://mr.bharatpedia.org/w/index.php?action=history&amp;feed=atom&amp;title=%E0%A4%B9%E0%A5%88%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A6_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8</id>
	<title>हैदराबाद संस्थान - आवृत्ती इतिहास</title>
	<link rel="self" type="application/atom+xml" href="https://mr.bharatpedia.org/w/index.php?action=history&amp;feed=atom&amp;title=%E0%A4%B9%E0%A5%88%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A6_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8"/>
	<link rel="alternate" type="text/html" href="https://mr.bharatpedia.org/w/index.php?title=%E0%A4%B9%E0%A5%88%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A6_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8&amp;action=history"/>
	<updated>2026-08-27T00:50:22Z</updated>
	<subtitle>विकिवरील या पानाच्या आवृत्त्यांचा इतिहास</subtitle>
	<generator>MediaWiki 1.43.6</generator>
	<entry>
		<id>https://mr.bharatpedia.org/w/index.php?title=%E0%A4%B9%E0%A5%88%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A6_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8&amp;diff=1373&amp;oldid=prev</id>
		<title>ImportMaster: robot: Import pages using विशेष:आयात</title>
		<link rel="alternate" type="text/html" href="https://mr.bharatpedia.org/w/index.php?title=%E0%A4%B9%E0%A5%88%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A6_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8&amp;diff=1373&amp;oldid=prev"/>
		<updated>2022-05-01T18:55:11Z</updated>

		<summary type="html">&lt;p&gt;robot: Import pages using &lt;a href=&quot;/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4&quot; title=&quot;विशेष:आयात&quot;&gt;विशेष:आयात&lt;/a&gt;&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;b&gt;नवीन पृष्ठ&lt;/b&gt;&lt;/p&gt;&lt;div&gt;{{हा लेख|भारतातील निजाम अधिपत्याखालील हैदराबाद संस्थान|हैदराबाद (निःसंदिग्धीकरण)}} &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
== हैदराबाद राज्य ==&lt;br /&gt;
[[File:Hyderabad Coat of Arms.jpg|250px|thumb|Coat]]&lt;br /&gt;
[[File:Asafia flag of Hyderabad State.png|thumb|हैदराबाद ध्वज]]&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
मुख्यत्वे [[गोदावरी]] नदीच्या खोऱ्यात पसरलेले [[हैदराबाद]] राज्य प्रशासकीय दृष्ट्या ४ विभाग आणि १६ जिल्ह्यांमध्ये विभागले होते. [[मराठवाडा]] विभागात [[औरंगाबाद]], [[लातूर जिल्हा|लातूर]] , [[बीड]], [[नांदेड]] आणि [[परभणी]]  हे जिल्हे होते. गुलबर्गा विभागात [[बीदर|बिदर]], [[गुलबर्गा]], [[उस्मानाबाद]], [[रायचूर]] जिल्हे, गुलशनाबाद किंवा [[मेदक]] विभागात [[अत्राफ इ बलदाह]], [[महेबूबनगर]], [[मेदक]], [[नालगोंडा]], [[निझामाबाद]] जिल्हा; तर [[वरंगळ]] विभागात [[आदिलाबाद जिल्हा]], [[करीमनगर]] आणि [[वरंगळ]] [[जिल्हा]] होता .&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
निजामाने इतर बराचसा भाग ब्रिटिशांना विविध वेळी विविध कराराअंतर्गत संपूर्ण किंवा भाडेपट्ट्यावर बहाल केला. प्रशासकीय व्यवस्था मुख्यत्वे सरंजामशाही स्वरूपाची होती. शेतसारा वसुलीकरिता जहागिरी बहाल केलेल्या असत. निजाम हा करांचा काही भाग वेगवेगळ्या वेळी मोगल, मराठे, इंग्रज इत्यादींना तत्कालीन करारांनुसार चौथाई स्वरूपात  देत असे. प्राप्तिकर नसे.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
हैदराबादमध्ये सुरुवातीस फार्सी, नंतर उर्दू भाषा प्रशासकीय व शैक्षणिक व्यवहाराच्या भाषा होत्या; तर जनता प्रामुख्याने तेलुगू, कन्नड व मराठी भाषक होती. इ.स. १९३०मध्ये निजामाकडे ११,००० कर्मचारी होते. स्थानिक मुस्लिम कर्मचाऱ्यांना मुल्की व इतर राज्यातून आलेल्या कर्मचाऱ्यांना गैरमुल्की म्हणत. स्वतंत्र पोस्ट, चलन, पोलीस व रेल्वे यंत्रणा होती. लोकसंख्या १,८०,००,००० होती, ती मुख्यत्वे, हिंदू होती.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==हैदराबाद राज्याचा निजामपूर्व इतिहास==&lt;br /&gt;
[[Image:Golcondafort.jpg|right|thumb|हैदराबादजवळील गोवळकॊंडा किल्ला]]&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
===प्रागैतिहासिक===&lt;br /&gt;
[[गोदावरी]] खोऱ्यातील प्रागैतिहासिक काळाबद्दल विश्वासार्ह ऐतिहासिक पुराव्यांची उपलब्धता नाही.काही आर्य-द्रविड संघर्ष ग्राह्य धरणारे इतिहासकार गोदावरी खोऱ्यात प्रागैतिहासिक काळात द्रविड असावेत असे समजतात त्व त्याच्या समर्थनार्थ अगस्त्य मुनींनी विंध्य पर्वतास दिलेल्या भेटीचा पौराणिक दाखला देतात. गौतम व वसिष्ठ मुनींचा ही या भागात संचार झाला असावा.[http://www.maharashtra.gov.in/english/gazetteer/Nanded/his1.html]&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
===ऐतिहासिक===&lt;br /&gt;
बदामीचे चालुक्य, कल्याणीचे चालुक्य, मौर्य, सुंग, सातवाहन, हल(हाला), शक क्षत्रप, सतकर्णी, वाकाटक, नल, विंध्यसेना, प्रवरसेना, राष्ट्रकूट, देवगिरीचे यादव यांचे या भागात कधीना कधी राज्य होते.,&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
===मध्ययुगीन===&lt;br /&gt;
दिल्लीचे अल्लाउलुद्दीन खिलजी, मुहम्मद तुघलक, गुलबर्गा आणि बिदरचे बहामनी, [[इ.स. १४५५]] जलालखान (तेलंगणा), मुहम्मद खिलजी, गोवळकोंड्याचा इब्राहीम कुतुबशाह यांनीही हैदराबादवर राज्य केले आहे. [[इ.स. १६००]]मध्ये अकबराच्या काळात अहमदनगर मोगलांनी घेतले. जहांगीर व तदनंतर शहाजहानच्या जातीने युद्धात उतरल्यानंतर [[इ.स. १६३२]] पर्यंत तेलंगणापर्यंत मोगलांनी वर्चस्व निर्माण केले. विजापूरच्या आदिलशहाने शहाजहानशी तडजोड करून [[अहमदनगर]] राज्याचा काही भाग स्वतःकडे मिळवला. याच काळात शहाजीराजे भोसले प्रथम अहमदनगरच्या आणि नंतर विजापूरच्या दरबारी सरदार होते. &lt;br /&gt;
&lt;br /&gt;
[[इ.स. १६५३]] मध्ये औरंगजेब दक्षिणेचा सुभेदार झाला. औरंगजेबाने सुरुवातीचा काळ करप्रणालीचा अमल घडवण्यात घातला. [[इ.स. १६५८]] मध्ये औरंगजेबाने आग्ऱ्यास जाऊन बादशाही मिळवली. औरंगजेबाने वैयक्तिकरीत्या प्रयत्न करून [[इ.स. १६८६]]मध्ये विजापूर व [[इ.स. १६८७]] मध्ये गोळकोंडा मोगलांसाठी मिळवले. मराठवाडा आणि बेरार अमरावतीतील मराठ्यांची पाठशिवणी तात्पुरती थांबली. [[इ.स. १६२०]] नंतर छत्रपती शिवाजी महराजांनी मराठी राज्याची रस्थापना केली. परंतु मराठ्यांचे राज्य औरंगजेबास मिळू शकले नाही. दुष्काळांचे उल्लेख विविध काळात दिसतात, त्यात्या वेळच्या राज्यकर्त्यांकरता तो काळ सर्वसाधारणता राजकीयदृष्ट्या कठीण गेल्याचे दिसून येते. ते काळ असे :- [[इ.स. १३९६]] ते [[इ.स. १४०७]]; [[इ.स. १४२१]] ते [[इ.स. १४२२]]; [[इ.स. १४७३]] ते [[इ.स. १४७४]]; [[इ.स. १६२९]] ते [[इ.स. १६३०]]. मध्ययुगीन इतिहासाचे दुसरे वैशिष्ट्य असे की दिल्लीच्या काही बादशहांना दक्षिणेस खास करून [[औरंगाबाद]], अहमदनगर भागांत जातीने यावे लागले. परिणामी औरंगाबाद हे हैदराबाद राज्याचे मध्ययुगीन काळातील राजकीय हालचालींचे प्रमुख केंद्र राहिले.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==हैदराबादचे निजाम==&lt;br /&gt;
[[चित्र:Hyderabad and Berar 1903.jpg|thumb|हैदराबाद आणि बेरार  अमरावती, [[१९०३]]]]&lt;br /&gt;
===निजामशाहीची स्थापना===&lt;br /&gt;
[[इ.स. १६८७]]च्या दख्खन स्वारीत बादशहा औरंगजेबाच्या सैन्यातला चिन खालीच खान नावाचा सैनिक [[गोवळकोंडा]] किल्ल्यास घातलेल्या वेढ्यात जखमी होऊन मेला.  चिन खालीच खानचा मुलगा नवाब गाझिउद्दीनखान हा औरंगजेबाचा पंतप्रधान सादुल्लाखानाचा जावई होता. औरंगजेबाने नवाब गाझिउद्दीनखानचा मुलगा &amp;#039;&amp;#039;&amp;#039;मीर क़मरुद्दीन&amp;#039;&amp;#039;&amp;#039;  यास औरंगजेबाने बालपणीच मनसब दिले होते. तरुणपणी त्याचे चिन फ़तेखान असे नामाभिदान केले. वयाच्या २६व्या वर्षी त्याला विजापूर आणि मावळचा निझाम बनवले नंतर संपूर्ण दख्खनची जबाबदारी त्यास दिली. औरंगजेबानंतर झालेल्या बादशहा फारुखसियाने त्यास निजाम उल मुल्क तर त्यानंतरच्या बादशहाने त्यास असिफ्जाह असे नाव दिले.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
पण दिल्लीच्या बादशहानेच त्याला शह देण्याकरिता [[इ.स. १७२४]] मध्ये एक लढाई घडवून आणली. तीत &amp;#039;&amp;#039;&amp;#039;[[मीर कमरुद्दीन खान सिद्दीकी|मीर कमरुद्दीन खान सिद्दिकी]]&amp;#039;&amp;#039;&amp;#039;चा विजय झाला आधीच कमकुवत झालेली दिल्लीची बादशाही &amp;#039;&amp;#039;&amp;#039;मीर ओमारुद्दीन&amp;#039;&amp;#039;&amp;#039;ची प्रगती थांबवू शकली नाही.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
&amp;#039;&amp;#039;&amp;#039;मीर ओमारुद्दीन&amp;#039;&amp;#039;&amp;#039; / निजाम उल मुल्क/असिफ्जाहने आधी आपली राजधानी औरंगाबाद येथे ठेवली व काही दिवसातच हैदराबाद येथे हलवली. हे राज्य सात त्याच्या सात पिढ्यांनी [[इ.स. १७२४]] ते [[इ.स. १९४८]] या काळात उपभोगले. असिफ्जाहने इंग्रज आणि फ्रेंच दोंघांशी चांगले संबंध ठेवले व मराठ्यांशी युद्धे करून स्वतःची गादी मजबूत केली. २१ मे १७४८ रोजीच्या त्याच्या निधनानंतर सत्तेच्या साठमारीत फ्रेंच व ब्रिटिशांनी वेगवेगळ्या वंशजाना पुढे करून परिस्थिती काही काळ अस्थिर ठेवली. नसीरजंग, मुज्जफरजंग, सालाबातजंग आणि निझाम अली यांनी १३ वर्षे जम बसवण्याचा प्रयत्न केला.  त्यात निझाम अली १७६३मध्ये निझाम झाला व नंतरची ४० वर्षे त्याने राज्य केले. हैदराबाद संस्थानात २२४ वर्षे राज्य करणारे हे घराणे [[समरकंद]] या मध्य आशियातील शहरातून आलेले, मुळात [[बगदाद]]चे होते.[http://4dw.net/royalark/India/hyder.htm]&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
[[मीर उस्मान अली खान]] हा शेवटचा निजाम होता. बऱ्याचदा तो &amp;#039;हिंदू आणि मुस्लिम हे त्याचे दोन डोळे आहेत&amp;#039;, असे म्हणे.&amp;lt;ref&amp;gt;{{स्रोत बातमी|title=Nizam gave funding for temples, and Hindu educational institutions|दुवा=http://missiontelangana.com/nizam-gave-funding-for-temples-and-hindu-educational-institutions/|ॲक्सेसदिनांक=6 ऑक्टोबर 2018}}&amp;lt;/ref&amp;gt;&amp;lt;ref&amp;gt;{{स्रोत बातमी|दुवा=https://cbkwgl.wordpress.com/2013/08/31/national-anthem-of-the-kingdom-of-hyderabad/|title=National Anthem of the Kingdom of Hyderabad|date=2013-08-31|work=cbkwgl|access-date=2018-10-29|language=en-US}}&amp;lt;/ref&amp;gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==निजाम उल मुल्क==&lt;br /&gt;
[[File:NIZAM with SHASTRI.jpg|thumb|right|[[मीर उस्मान अली खान]] - लाल बहादुर शास्त्री के साथ]]&lt;br /&gt;
# [[मीर कमरुद्दीन खान सिद्दीकी]] - (शीर्षकः चिन किलिच खान) असिफ जाह १  [[इ.स. १७२४]] - [[इ.स. १७४८]]&lt;br /&gt;
# [[निज़ाम - उल - मुल्क, आसफ जाह दुसरा]]- (शीर्षकः निझाम उल मुल्क) असिफ जाह २ [[इ.स. १७६२]]-[[इ.स. १८०२]] &lt;br /&gt;
# [[मीर अकबर अली खान]] - (शीर्षकः सिकंदर जाह) असिफ जाह III [[इ.स. १८०२]]-[[इ.स. १८२९]]&lt;br /&gt;
# [[मीर फर्खुंदाह अली खान]] - (शीर्षकः नसिरुद्दौला) असिफ जाह ४ [[इ.स. १८२९]]-[[इ.स. १८५७]]&lt;br /&gt;
# [[मीर तेहनियत अली खान]] - (शीर्षकः अफजलौद्दौला) असिफ जाह ५ [[इ.स. १८५७]]-[[इ.स. १८६९]]&lt;br /&gt;
# मीर [[महबूब अली खान]] - असिफ जाह ६ [[इ.स. १८६९]]-[[इ.स. १९११]]&lt;br /&gt;
# [[मीर उस्मान अली खान]] - (शीर्षकः निझाम सरकार) असिफ जाह ७ [[इ.स. १९११]]-[[इ.स. १९४८]]&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
पहिल्या निजामानंतर झालेल्या सत्ता साठमारीत इंग्रज उजवे ठरले. विविध करारांअंतर्गत निजाम ब्रिटिश सत्तेचे पाईक ठरले. निजामास पुरवलेल्या तथाकथित संरक्षणाचा व सैन्याचा आर्थिक मोबदला म्हणून निजामाकडील काही प्रांत, खास करून बेरार म्हणजे आताचे अमरावती इंग्रजानी मिळवले. निजामशाहीत निजामांच्या आशिर्वादाने हिऱ्या मोत्यांचा व्यापार बहरास आला.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
हैदराबादवर नासीरजंग मीर अहमद [[इ.स. १७४८]]-[[इ.स. १७५०]]; # मुहिउद्दीन मुज्जफरजंग हिदायत [[इ.स. १७५०]]-[[इ.स. १७५१]]; # असिफ़ दौला मीर अली सालाबात [[इ.स. १७५१]]-[[इ.स. १७६२]] या राजांनी राज्य केले. त्यांचे &amp;quot;निझाम&amp;quot; हे नाव कधीच नव्हते&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==हैदराबाद, मोगल, मराठे, टिपू, ब्रिटिश आणि निजाम==&lt;br /&gt;
आसीफ जाहच्या आधीच्या मोगल-मराठा संघर्ष काळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत मराठी फौजांनी काही स्वाऱ्या गोदावरी खोऱ्यात केल्याचे व मोगल अधिपत्याखालील प्रदेशात लुटी केल्याचे उल्लेख आढळतात. नेताजी पालकर-[[इ.स. १६६२]],   प्रतापराव-[[इ.स. १६७०]] बेरार, ऑक्टोबर [[इ.स. १६७२]] रामगीर जिल्हा करीमनगर, ऑक्टोबर [[इ.स. १६७४]] शिवाजी - बेरार. स्वतः छत्रपती शिवाजीने [[इ.स. १६७७]] गोवळकोंड्याला भेट करून कुतुबशहाशी करार केले.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
साताऱ्याचे छत्रपती शाहूंचे कारर्किर्दीत दिल्ली दरबारी होत असलेल्या गादीच्या संघर्षात यशस्वी बाजू घेतल्याने काही काळ मराठवाड्याचाचा काही भागाचे चौथ (शेतसाऱ्याचा चौथा हिस्सा) घेण्याचे अधिकार मिळाले, पण भावी निजाम असिफजहाने [[कोल्हापूर]] आणि [[सातारा]] या गाद्यांच्या संघर्षाचा फायदा घेऊन काही मराठा सरदार स्वतःकडे वळवले व चौथाई देणे बंद केले. तसेच दिल्ली दरबारातील संघर्षाच्या आणि स्वतःच्याचे सैनिकी यशाच्‍या बळावर [[इ.स. १७२४]] पर्य़ंत स्वतःला स्वतंत्रपणे निझाम या नावाने प्रस्थापित केले.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
छत्रपती शाहूंनी रघुजी भोसलेंना फुटीर मराठा सरदारांच्या मागावर पाठवले. मराठा-निजाम संघर्षात निजामास पालखेडच्या लढाईत [[इ.स. १७२८]] मानहानी सहन करावी लागली. तर [[इ.स. १७३३]] मध्ये भास्कर व रघुजी भोसलेंच्या ३०,००० मराठा फौजेस नांदेड निझामाबादचे आक्रमण सोडून माघार घ्यावी लागली. [[इ.स. १७३७]] मध्ये बाजीरावाने भोपाळ येथे निजामाचा पराभव केला. पण निजामाने दक्षिणेत आपले नियंत्रण व्यवस्थित प्रस्थापित केले.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
असिफजहाच्या मृत्यूनंतर निजामाच्या वंशजांमध्ये झालेल्या संघर्षात सलाबतजंगची बाजू घेऊन मराठ्यांनी पुन्हा चौथाईचे अधिकार मिळवले. पण सलाबतजंग गादीवर टिकू शकला नाही. नंतर आलेल्या निझाम अली या निजामास १७६३ च्या राक्षसभुवनच्या लढाईत मराठ्यांनी पुन्हा नमवले. परंतु [[इ.स. १७६६]]  आणि[[इ.स. १७६८]] साली ब्रिटिशांशी करार करून संरक्षणाच्या बदल्यात ब्रिटिशांची मांडिलकी करणे निझाम अलीने पसंद केले.[[इ.स. १८०३]] मध्ये शिंदे, होळकर, भोसले या त्रयीने पुन्हा एकदा निजामास आव्हान दिले, पण अडगावच्या लढाईत मराठ्‍यांना पराभव झेलावा लागला. [[इ.स. १७९९]]मध्ये टिपूचे राज्य संपले. [[इ.स. १८१८]]मध्ये पेशवाई संपली. पेशवाईच्या अस्तानंतर  निजामशाही पुढे १३० वर्षे टिकली पण ब्रिटिश म्हणतील ती पूर्व दिशा ठरली.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
===बेरार===&lt;br /&gt;
निजामास इंग्रजांच्या सैन्यास पैसा देणे जमेना तेव्हा इंग्रजांनी [[इ.स. १८५१]]मध्ये बेरार अमरावती प्रांत तोडून घेतला व निजामाचा स्वतःचे सैन्य बाळगण्याचा अधिकार कायमचा संपला. [[इ.स. १८५७]]पासून निजामाने ब्रिटिशांशी संपूर्ण मैत्री ठेवली. रोहिल्यांनी आणि काही जहागिरदारांनी तत्कालीन क्रांतिकारकांच्या नेतृत्वाखाली अयशस्वी बंड केले. निजामाच्या विश्वासाची भरपाई ब्रिटिशांनी ५१ लाखाचे निजामाचे कर्ज माफ करून केली.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==निजाम कालीन शासन व्यवस्था==&lt;br /&gt;
===सरंजाम===&lt;br /&gt;
सरदार आणि घराणी मूळ मोगल पद्धतीनुसार होती.हे लोक पूर्वी राजाने परवानगी दिली तेवढी फौज बाळगत. राजाच्या आज्ञेवरून त्यांना युद्धास जावे लागे. सैन्याचे व युद्धाचे खर्च निघावेत म्हणून त्यांना वतने (मनसब)/जहागिरी बांधून दिली जात असे. त्या वतनातील शेतसारा गोळा केला जाई व ठरवलेलाला भाग राजाला दिला जात असे. त्यांच्या वतनांवर त्यांचा दर्जा अवलंबून असे. दर्जानुसार चढत्या श्रेणीने  खान, खान  बहादुर, नवाब, जंग, दौला, मुल्क, उमरा, जाह अशी पदवी त्यांना मिळे. तर विभागांची जबाददारी मोगल बादशहा, वजीर, सुभेदार, निजाम इत्यादींकडे देत. हिंदु सरदारांना राय, राजा, राजा बहादुर, राजा राय, रायन बहादुर, वंत, महाराजा, महाराजा बहादुर अश्या पदव्या असत. पण ब्रिटीशोत्तर काळात सैन्य बाळ्गण्याचा अधिकार संपल्यानंतर त्यांना फक्त महसूल गोळा करण्याचे अधिकार किंवा तनखा ठरवून देण्याचा अधिकार मिळाला. काही निजामपूर्व स्थानिक राजांनी पण आपली संस्थाने निजामास शरण जाऊन टिकवून ठेवली.  यांत गडवाल, वानापुर्ति, जतप्रोले, अमरचंटा, गुरूगुंटा, गोपालपेट, जवालगिरी, सोलापूर इत्यादींचा समावेश होता.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
===सालारजंगच्या सुधारणा १८५३-१८८३===&lt;br /&gt;
निजामाच्या तत्कालीन प्रधान मंत्री [[सालारजंग]]ने ब्रिटिशांचे पाहून [[इ.स. १८५८]]पासून प्रशासनात सुधारणा करणे सुरू केले.[[इ.स. १८६७]]मध्ये विभाग,जिल्हे आणि तालुका पातळीवर पगारी नोकरदारांची भरती सुरू केली. पोलीस, न्याय, शिक्षण, पालिका, सार्वजनिक बांधकाम विभागांची घडी घातली. भारतभरातून तत्कालीन सुशिक्षित मुस्लिम समाजास प्रशासनात सामावून घेण्याचा प्रयत्न केला. अलीगडच्या सर सय्यद अहमदना आर्थिक पाठबळ पुरवले. [[इ.स. १८७५]]मध्ये जमीन महसूल गोळा करण्याची मुंबई विभागात होती तशी ब्रिटिश पद्धत सुरू केली. [[इ.स. १८६०]]मध्ये हैदराबाद-सोलापूर रस्ता व [[इ.स. १८६८]]-[[इ.स. १८७८]] या काळात ब्रिटिशांच्या सहकार्याने हैदराबाद राज्यात रेल्वे सुरू झाली. उर्दू आणि इंग्रजी जर्नल्सची सुरुवात झाली.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
===निजामाची सहिष्णुता ===&lt;br /&gt;
[[इ.स. १८९८]]मध्ये निजामाने राजकीय सुधारंणांचे गाजर दाखवले. cabinet व legislative councilची स्थापना केली यात मर्यादित संख्येत निजामाचे शासकीय कर्मचारीच होते. सर्वाधिकार निजामाकडेच होते त्यामुळे ह्या सुधारणा सुशिक्षितांचे समाधान करू शकल्या नाहीत.&amp;lt;ref&amp;gt;{{संकेतस्थळ स्रोत|title=Modern Hyderabad is the vision of Nizam Mir Osman Ali Khan|दुवा=https://archive.siasat.com/news/modern-hyderabad-version-nizam-osman-ali-khan-826265/}}&amp;lt;/ref&amp;gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
===हैदराबाद संस्थानाचे प्रशासकीय विभाजन===&lt;br /&gt;
हैदराबाद संस्थानाचे चार प्रशासकीय विभाग होते. आणि एकूण सर्व मिळून १६ जिल्हे होते.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
अ] &amp;#039;&amp;#039;&amp;#039;औरंगाबाद विभाग-&amp;#039;&amp;#039;&amp;#039;&lt;br /&gt;
#. [[औरंगाबाद जिल्हा]] &lt;br /&gt;
#. [[बीड]] &lt;br /&gt;
#. [[नांदेड]] &lt;br /&gt;
#. [[परभणी]]&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
आ] &amp;#039;&amp;#039;&amp;#039;गुलबर्गा विभाग-&amp;#039;&amp;#039;&amp;#039;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
#. [[गुलबर्गा]]&amp;lt;br/&amp;gt;&lt;br /&gt;
#. [[बीदर]]&amp;lt;br/&amp;gt;&lt;br /&gt;
#. [[उस्मानाबाद]]&amp;lt;br/&amp;gt;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
इ] &amp;#039;&amp;#039;&amp;#039;मेडक विभाग-&amp;#039;&amp;#039;&amp;#039;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
# [[अतराफ इ बलदाह]]&amp;lt;br/&amp;gt;&lt;br /&gt;
# [[मेहबूबनगर]]&amp;lt;br/&amp;gt;&lt;br /&gt;
# [[मेडक]]&amp;lt;br/&amp;gt;&lt;br /&gt;
# [[नलगोंडा]]&amp;lt;br/&amp;gt;&lt;br /&gt;
# [[निझामाबाद]]&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
ई] &amp;#039;&amp;#039;&amp;#039;वरंगळ विभाग-&amp;#039;&amp;#039;&amp;#039;&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
# [[वरंगळ]]&amp;lt;br/&amp;gt;&lt;br /&gt;
# [[आदिलाबाद]]&amp;lt;br/&amp;gt;&lt;br /&gt;
# [[करीमनगर]]&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==निजामकालीन समाज, अर्थकारण==&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
निजाम कालखंडात पाटीलकीची वतने मिळत.&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
==संदर्भ==&lt;br /&gt;
{{संदर्भयादी}}&lt;br /&gt;
&lt;br /&gt;
[[वर्ग:भारतातील संस्थाने‎]]&lt;br /&gt;
[[वर्ग:लाल दुवे असणारे लेख]]&lt;br /&gt;
[[वर्ग:आसफ जाही घराणे]]&lt;br /&gt;
[[वर्ग:हैदराबादचे निजाम]]&lt;br /&gt;
[[वर्ग:हैदराबाद संस्थान]]&lt;/div&gt;</summary>
		<author><name>ImportMaster</name></author>
	</entry>
</feed>