Jump to content

दिपाली बरठाकूर

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २१:४३, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट व्यक्ती

दिपाली बरठाकूर (३० जानेवारी १९४१ - २१ डिसेंबर २०१८) ह्या आसाममधील एक भारतीय गायिका होत्या. त्यांनी गाणी प्रामुख्याने आसामी भाषेत गायली गेली.[] त्यांना १९९८ मध्ये भारतातील चौथा-सर्वोच्च नागरी पुरस्कार, पद्मश्री मिळाला.[]

प्रारंभिक जीवन[संपादन | स्रोत संपादित करा]

दिपाली बरठाकूर यांचा जन्म १९४१ मध्ये शिवसागर, आसाम येथील सोनारी येथे झाला. त्यांचे पालक विश्वनाथ बोरठाकूर आणि चंद्रकांती देवी[] होते.[][]

संगीत कारकीर्द[संपादन | स्रोत संपादित करा]

बरठाकूर यांनी गायिका म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. इयत्ता नववीत शिकत असताना, १९५८ मध्ये, त्यांनी ऑल इंडिया रेडिओ, गुवाहाटी,[] वर "मोर बोपई लाहोरी" हे गाणे आणि लचित बोरफुकन (१९५९) चित्रपटासाठी "जोबोने आमोनी कोरे चेनाधों" हे गाणे गायले.[]

त्यांची इतर काही लोकप्रिय आसामी गाणी आहेत:[]

  • "सोनोर खारु नलगे मुक"
  • "जोबोने आमोनी कोरे, चेनाईधों"
  • "जुंधोन जुनालाइट"
  • "कोणमाना बोरोक्सायर सिप"
  • "सेनाई मोई जाऊ देई"
  • "हे बंधु सोमोई पडले अमर फले"

वैयक्तिक जीवन[संपादन | स्रोत संपादित करा]

दिपाली बरठाकूर यांनी त्यांचे शेवटचे गाणे "लुईटो नेजाबी बोई" [] १९६९ मध्ये गायले. त्यानंतर त्यांना मोटार न्यूरॉनच्या गंभीर आजाराने ग्रासले. ज्यामुळे त्यांच्या गाण्यात अडथळा निर्माण झाला आणि त्यांना व्हीलचेअर वापरण्यास भाग पाडले. १९७६ मध्ये त्यांनी आसाममधील प्रख्यात भारतीय कलाकार आणि चित्रकार नील पवन बरुआ यांच्याशी विवाह केला.[][] नील पवन बरुआ यांचे वडील प्रसिद्ध आसामी लेखक बिनंदा चंद्र बरुआ आहेत.

दिपाली बरठाकूर यांचे २१ डिसेंबर २०१८ रोजी गुवाहाटी येथील नेमकेअर हॉस्पिटलमध्ये दीर्घ आजाराने निधन झाले.[] त्यांना "आसामची कोकिळा" म्हणून ओळखले जात असे.[]

पुरस्कार[संपादन | स्रोत संपादित करा]

दिपाली बरठाकूर यांना अनेक वेळा सन्मानित करण्यात आले. विशेष म्हणजे १९९०-९२ मध्ये लोक आणि पारंपारिक संगीतासाठी पद्मश्री पुरस्काराने दिला गेला.

त्यांचे काही पुरस्कार/मान्यता खाली सूचीबद्ध आहेत:

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी