Jump to content

आनंदमठ (कादंबरी)

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट पुस्तक

आनंदमठ ही बंगाली भाषेतील कादंबरी आहे.[] इ.स.१८८२ मधे बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी या काल्पनिक कादंबरीची रचना केलेली आहे.

प्रथम प्रकाशन[संपादन | स्रोत संपादित करा]

संजीवचंद्र चॅटर्जी यांच्या 'बंगदर्शन' मासिकात १८८० ते १८८२ या काळात या कादंबरीचा कथाभाग प्रकाशित होत होता.[]

कथाभाग[संपादन | स्रोत संपादित करा]

१८ व्या शतकात झालेल्या संन्याशाच्या बंडाची पार्श्वभूमी या कथेला आहे. ब्रिटिशांच्या जुलूमाविरुद्ध संन्यासी एकत्र येऊन त्यांनी भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी दिलेला लढा असा या कादंबरीचा आशय आहे. हे सन्यासी स्वतःला भारतमातेचे "संतान" म्हणजे अपत्य असे म्हणत असत.[] हे संन्यासी जंगलातील आनंदमठ नावाच्या गुप्त ठिकाणी राहून कालीमातेची उपासना करीत आणि वंदे मातरमचा जयघोष करीत, स्वातंत्र्यप्राप्तीसाठी सर्वस्व वाहिलेल्या संन्यासी समूहाची कहाणी यात वर्णन केलेली आहे. देशभक्ती आणि मातृभूमीचे स्वातंत्र्य हाच धर्म ही योगी अरविंद यांची शिकवण या कादंबरीच्या कथाभागाचे वैशिष्ट्य आहे.[]

चित्रपट[संपादन | स्रोत संपादित करा]

हेमन गुप्ता यांनी १९५२ साली आनंदमठ कादंबरीवर आधारित हिंदी भाषेत चित्रपट काढला. या चित्रपटातील "वंदे मातरम" हे देशभक्तिपर गीत लोकप्रिय आहे.[] साचा:विस्तार

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]