Deprecated: Caller from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::selectOne ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Page\PageProps::getProperties ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385
रामदासी मठ, अकोला - मराठीपिडिया

रामदासी मठ, अकोला

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १६:५५, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:बदल

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
अकोला येथील रामदासी मठ
नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
चरणपादुका

आजही अकोल्या सारख्या शहरात समर्थ सम्प्रदायाची व त्या सम्प्रदायातील एक वेगळी परंपरा शहराच्या मध्य वस्तीतील माळीपुरा भागात श्रीबाबाजी मठाच्या रुपानं आढळते. अकोला दर्शनिक (गॅझेटियर) मध्ये या मठाचा इतिहास तीन शतकांपासून असल्याचं आढळतं.

या समर्थसम्प्रदायी परंपरेचा प्रारंभ एकोबा पासून असल्याची माहिती मिळते. त्यांचे शिष्य तुकोबा. एकोबा आणि तुकोबा या नामसद्रृश्यामुळं हे संत वारकरी सम्प्रदायाचे तर नसावेत असं वाटण्याची शक्यता असली तरी वस्तुस्थिती मात्र तशी नाही. यातील एकोबा हे संत एकनाथ नसून एकोबा रामदासी होते व तुकोबा हे संत तुकाराम नसून एकोबाचे शिष्य तुकोबा रामदासी होते. त्यांचा काळ शके १६२५ (इ.स. १७०३) म्हणजे अठराव्या शतकाचा पूर्वार्ध मानतात. बाबाजी रामदासी हे त्यांचे शिष्य.

एकोबानी त्यांचे शिष्य तुकोबा रामदासी हे ब्रम्हचारी होते, त्यामुळं त्यांच्यानंतरची त्यांच्या वंशाची परंपरा नाही. त्यांचे वडील मुसलमानी राजवटीतील उद्गीरचे अधिकारी होते तथापि त्यांच्या विषयी काही चुकीच्या गैरसमजामुळं त्यांचे आईवडील व अन्य कुटुम्बीय मारले गेले व तुकोबा अकोल्याला आले. त्यांच्या संतत्त्वाची प्रचीती आल्यान तेथील गुलजारखान यानं त्यांना सरोपा (शिरपाव) देऊन त्यांचा सन्मान केला व मठास अभय दिलं. त्यामुळं हिन्दू-मुसलमान समाजात एकोपा प्रस्थापित झाला. तुकोबा रामदासी यांनी आत्मसिंधू नामक ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ तत्त्वविवरणपर आहे. त्याचं स्वरुप गुरू-शिष्य संवादात्मक असून ब्रम्ह सत्य, जगन्मिथ्या या शांकरमताचं अनुकरण व विवरण-विवेचन त्यात केल्याचं आढळतं. समर्थांच्या आत्मारामाचा तुकोबा रामदासींच्या आत्मसिंधूवर जो प्रभाव आहे तो दोन्ही ग्रंथातील नामसादृश्यामुळं देखील जाणवतो.

ब्रम्ही सृष्टी जालीच नाही। तेथ ज्ञान, अज्ञान, विज्ञान कायी ? ब्रम्ह ठायीच्या ठायी । जैसे तैसे ।। (आत्मसिंधू प्र.४)

एवढय़ा एकच मध्यवर्ती ओवीवरूनही आत्मसिंधूच्या आशयाची सहज कल्पना येईल.

आत्मसिंधू बरोबरच त्यांनी काही मराठी व दाक्खनी पदरचनाही केली. समर्थांच्या हिंदी दक्ख्नी पदांविषयी मी त्यांच्या विषयीच्या एका ग्रंथात विवेचन केलंच आहे. त्यांचं आणखी एक वैशिष्ट्य असं की त्यांनी विविध धर्मात एकात्मता मानली व तिचा पुरस्कारही केला. सौ.शांताबाई परसोडकरांनी बाबाजी महाराज चरित्रात त्यांचं पुढील दक्खिनी पद बाराव्या अध्यायात उद्घृत केलं आहे.

खुन की खून पहिचान बा रे ।

मझ्जुद (मौजूद) भरा उसे हात नही उसे पॉव नही ।

उसे शीर नही। हुशियार रहो ।

वहॉं जात नही, वहॉ पात नही ।

वहॉं दिन नही, वहॉ रात नही ।

दास तुका के कान लगे ।

एको गोविंदने बात कही ।