कुरुंदवाड संस्थान (थोरली पाती)

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २१:५४, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट भूतपूर्व देश

पटवर्धन घराण्याचे मूळ पुरुष हरभट पटवर्धन ह्यांचे तृतीय पुत्र त्रिंबक हरी पटवर्धन तथा अप्पासाहेब हे कुरुंदवाड संस्थानाचे संस्थापक समजले जातात. मराठा सरदार राणोजी घोरपडे ह्याने अप्पासाहेबांकडून कर्ज घेतले होते. त्याची परतफेड म्हणून् घोरपड्यांनी कुरुंदवाड हे आपले गाव अप्पाला बहाल केले.

अप्पासाहेबांची कारकीर्द इ.स.१७३३ ते इ.स. १७७१ अशी होती. पुढे इ.स. १८११ मध्ये कुरुंदवाडचे कुरुंदवाड आणि शेडबाळ असे दोन् राज्यात विभाजन झाले. घराण्याला वारस नसल्याने शेडबाळ ब्रिटीश साम्राज्यात विलिन झाले. इ.स.१८५४ मध्ये कुरुंदवाड संस्थान पुन्हा विभागले जाऊन थोरली पाती रघुनाथरावाकडे तर धाकटी पाती विनायकरावाकडे गेली. स्वातंत्र्यानंतर दोन्ही संस्थाने भारतात विलिन झाली. []

संदर्भ आणि नोंदी संपादन

साचा:Reflist

हेसुद्धा पहा संपादन

मिरज संस्थान (थोरली पाती)