साचा:बदल क्रांतिवीर खाज्या नाईक सातपुडा प्रदेश तील आदिवासी नायक हे १८३१ ते १८५१ पर्यंत ब्रिटीशांच्या नोकरीत होते. ते सेंधवा घाटच्या भागातून प्रवास करणाऱ्या व्यापाऱ्यांना संरक्षण देण्याचे अतिकठीण कार्य करीत. घनदाट जंगलातून जाणाऱ्या बैलगाड्यांचे सौरक्षण करणाऱ्या पोलीस पथकाचे ते प्रमुख होते. त्यांच्या हातातून एक लुटारू मारला गेला व त्या कारणासाठी त्यांच्यावर खटला भरून १० वर्षे तुरुंगवासाची शिक्षा देण्यात आली.१८५५ला शिक्षा भोगून आल्यावर आपल्याला नोकरीत परत घ्यावे असे त्यांना वाटत होते पण तेव्हा १८५७ क्रांतीचे वातावरण तापू लागले होते तसे ब्रिटिशांना खाज्या नाईकांची गरज भासू लागली परंतु आता ते दुसऱ्याच प्रेरणेने भारले गेले होते. ते दिल्लीच्या बादशहा बहादुर शाह मराठा सेनापती तात्या टोपे व क्रांतिकारकांच्या संपर्कात होते व सूचना मिळताच त्यांनी बंडाचे निशाण फडकावले. त्यांच्या सोबतीला भीमा नाईक, मेवाश्या नाईक धावून आले होते, त्यांनी २२००-२५०० भिल्लांना जमा करून ब्रिटिश वसाहती व खजिना लुटायला सुरुवात केली व ब्रिटिशांना युद्धाचे आवाहन उभे केले तेव्हा त्यांना हनुमंत राव भिल्ल येऊन मिळाला. आजूबाजूच्या खेड्यांमध्ये क्रांतिकारी ज्योत आणि ब्रिटिशाच्या मनात दहशत निर्माण करून सेंधवा घाटावर परिसरावर कब्जा करून उत्तर व दक्षिण भारत अशी ब्रिटीश रसद रोखली व ब्रिटीशांच्या ऐवजी नियंत्रण मिळवून स्वतः कर वसूल करण्यास सुरुवात केली. होळकरांच्या राज्यातून ब्रिटिशांनी गोळा केलेली खंडणी खजिना मुंबईला जात होता तो क्रांतिवीर खाज्या नाईकांनी लुटली ती जवळ जवळ ७०,००,००० रुपये होती, व त्याचे रक्षण १५०० सैनिक करीत होते पण त्यांनी क्रांतिवीर खाज्या नाईक यांच्या भिल्ल क्रांतिकारकांना विरोध न करता शरणागती पत्करली. हा एव्हढा मोठा धक्का ब्रिटिशांना कोणीही दिला नव्हता. ब्रिटीशांचे धाबेच दणाणले व जर क्रांतिवीर खाज्या नाईकांचा बंदोबस्त केला नाही तर भारतात सत्ता टिकणार नाही याची त्यांना खात्री पटली. क्रांतिवीर खाज्या नाईक नाईकांच्या दलात आता महादेव नाईक व दौलत नाईक असेही येऊन मिळाले, तापी नर्मदा खोरे, सातपुडा व विंद्य सातपुडा पर्वत, अक्राणी महाल, खानदेश, मेवासी भागात क्रांतीचा वणवा पेटला अक्राणी महाल भागात ब्रिटिशांच्या विरुद्दः उभे राहिलेले क्रांतीकारी काळूबाबा नाईक ही आता क्रांतिवीर खाज्या नाईकना येऊन मिळाले त्याच प्रमाणे होळकरांच्या धार संस्थानातील रोहिले, मकरानी व अरब सैन्य तसेच बरोडा गायकवाड संस्थानातील गावीत, मावची, चोधरी सैनिक, काठी, गंगठा, संस्थानातील तडवी, पावरा, पाडवी सैनिक और रायंगन चे ठिंगळे भील मराठा सरदार पण खाज्यांना येऊन मिळाले. आता भिल्ल सेना चोहोबाजूने ब्रिटीशांच्या विरोधात उठली होती, "सुलतानपुरच्या" भिल्ल सेनेने " सारंगखेडा " ब्रिटिशाविरुद्ध हल्ला चढविला रायंगनचे ठिंगळे सरदार यांनी सोनगडवर तसेच सारवट चे खात्या सेनापती यांनी रायकोट येथे हल्ला चढविला व ब्रिटिशांना व ब्रिटीश राजेशाही यांना सळो की पळो करून सोडले. मंदाने गावाचे रुमाल्या नाईक ही ब्रिटिशांच्या विरोधात उठाव करत होते. आता ब्रिटिशांनी उठाव दडपण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू केलेले होते. खानदेशात ब्रिटीश सैनिकांच्या पलटनी वाढवल्या गेल्या त्याच प्रमाणे अनेक ब्रिटीश अधिकाऱ्यांच्या नेमनुकाही करण्यात आल्या. व त्यांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे अधिकार देण्यात आले. एवढेच नाही तर भिल्लांशी लढण्या साठी खानदेशातील महादेव कोळी जमातीची पलटण तयार करण्यात आली होती. महादेव कोळी ब्रिटीश सैनिकांमार्फत भिल्लांना जागोजागी घेराव घातला जात होता व त्यांची ताकद कमी करण्यात येत होती. अश्यातच मेजर ईव्हान्सला क्रांतिवीर खाज्या नाईक व त्याचे ३०,००० क्रांतिकारी भिल्ल साथीदार हे बडवानी तळोदाच्या जवळ आम्बापानीच्या जंगलात आश्रयाला असल्याची खबर लागली व त्यांनी गाफील भिल्लांना घेराव टाकला. तरी पण शरण येतील ते भिल्लच कसले त्यांनी जवळ असलेल्या गोफण, दगडांच्या व भिल्खीच्या आधारे व काही बंदुकांच्या आधारे लढण्यास सुरुवात केली, परंतु ब्रिटिशांच्या तैनाती फौजा व अत्याधुनिक बंदुकांपुढे त्यांचा टिकाव लागणे शक्य नव्हते तरीही त्यांनी मोठ्या हिम्मतीने लढाई करून ब्रिटीशांचे दोन अधिकारी व ८०० सैनिक मारले. भिल्लांची खूप हानी झाली. २४६० स्त्री व पुरुषांना कैद करण्यात आले. खाज्या नाईक, मेवाश्या नाईक, भाऊ रावल यांच्या बायकांना कैद झाली व खाज्या नाईकांचा मुलगा " पोलाद्सिंग" हा 'शहीद' झाला. पकडलेल्या कैद्यान्पेकी ५०० पेक्षा आधिक कैद्यांना जागेवरच गोळ्या घालून ठार मारण्यात आले. क्रांतिवीर खाज्या नाईक यांनी आपल्या असंख्य साथीदारांची कत्तल, कुटुंबाची वाताहत पाहूनही खाज्या खचले नव्हते. ते सतत ब्रिटीशांसी लढत राहिले, शेवटी ब्रिटिशांनी त्यांना एकाकी पाडण्यात यश मिळविले व सशर्त माफी मागावी व धुळ्याच्या कल्लेक्टरास शरण यावे म्हणून फर्मान काढले. परंतु त्यांनी सशर्त माफी मागण्यास नकार देऊन संपूर्ण माफी जर देत असाल तर आम्ही शरण येऊ असे उलट उत्तर दिले. हा ब्रिटीशांचा अपमान होता त्यामुळे बोलणे फिसकटले व त्याचा काहीही उपयोग झाला नाही खाज्या नाईकांनी २६/१०/१८५७ला शिरपूरला ब्रिटीश खजिना लुटले व ब्रिटीशांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले. त्यांच्या बरोबर फक्त १५० भिल्ल होते. १७/११/१८५७ साली परत क्रांतिवीर खाज्या नाईक व भीमा नाईक यांनी ७,००,०००चा ब्रिटीशांचा खजिना लुटला. दिनांक ११ एप्रिल १८५८ रोजी खाज्या नाईक , दौलतसिंग नाईक, काळूबाबा नाईक याच्यासह १५०० भिल्ल सैनिकांना मेजर ईव्हान्सने आम्बापानीच्या जंगलात घेराव घालून हल्ला केला त्याचा बरोबर ब्रिटीशांची मोठी तैनाती फौज व अत्याधुनिक शास्त्रे होती.युद्धात ६५० लोक मारले गेले. क्रांतिवीर खाज्या नाईक सह ५७० लोकांना ड्रमच्या आवाजावर गोळ्या घालण्यात आल्या व त्यांचे शीर कापून सेन्धाव्याच्या किल्ल्याबाहेर लात्कावण्यात आले कि पुन्हा जर कोणी उठाव केला तर त्याची हाल असे होतील म्हणून व ४०० स्त्रीयांना अटक झाली ही लढाई १८५७ च्या समरातील " आम्बापानीची लढाई " म्हणून प्रसिद्ध आहे. ह्या लढाईचा उल्लेख कोणत्याही शैक्षणिक पुस्तकात जाणीव पूर्वक टाळल्याचे लक्षात येते,