Deprecated: Caller from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::selectOne ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Page\PageProps::getProperties ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385
मयुरेश्वर अभयारण्य - मराठीपिडिया

साचा:माहितीचौकट संरक्षित क्षेत्र

मयुरेश्वर अभयारण्य हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील अभयारण्य आहे. ते पुण्यापासून ७२ किमी आणि दौंडपासून ३५ किमी अंतरावर आहे.

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
पाखुर्डी
नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
चिंकारा
नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
भारतीय लांडगा
नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
आखुड बोटांचा सर्पगरुड
नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
धाविक

इतिहास संपादन

हा भाग भारतीय वन्यजीव संस्थेने १९ ऑगस्ट १९९७ मध्ये अभयारण्य घोषित केला.

वनस्पती आणि वन्यजीव संपादन

मयुरेश्वर अभयारण्यामध्ये बहुतांश बाभूळ, खैर, हिवर, सिसू, बोर, करवंद यांसारख्या शुष्क पानझडी वनस्पती आणि गवताळ प्रदेश आढळतो.

इथे अनेक प्रकारचे पक्षीही आढळतात, जसे, धाविक, भारतीय नीलपंख, घार, भारतीय राखी धनेश, कंठवाला होला, पांढऱ्या छातीचा धीवर, चिमण चंडोल, खाटीक, छोटा तपकिरी होला, निळ्या गालाचा राघू, पांढऱ्या कंठाची मनोली, सातभाई, गरुड, इ.

प्राण्यांमध्ये चिंकारा, तरस, भारतीय लांडगा, भारतीय कोल्हा, खोकड, भारतीय ससा हे प्राणी इथे आढळतात.

इतर माहिती संपादन

मयुरेश्वर अभयारण्य त्यामध्ये आढळणारे वन्यजीव आणि पक्षी याबरोबरच तिथल्या निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. चिंकारा पाहण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे. पर्यटक स्वतःच्या गाडीतून किंवा पायी चालत प्राणी पाहू शकतात.

मे २०१६ मध्ये इथले शुल्क पुढीलप्रमाणे होते:

  • प्रवेश शुल्कः ₹३० प्रत्येकी
  • चार चाकी गाडीचे शुल्कः ₹१००
  • दुचाकीचे शुल्कः ₹२५
  • कॅमेरा: ₹५०

अभयारण्यामध्ये वनविभागाचे दोन तंबू आहेत. राहण्याची सर्वात जवळची व्यवस्था सुपे गावामध्ये आहे.

अभयारण्याला भेट देण्यचा सर्वोत्तम काळ ऑगस्ट अखेर ते फेब्रुवारी आहे. उन्हाळ्यामध्ये इथे खूप गरमी आणि दमट हवमान असते.

अंतर संपादन

  • पुणे – ७४ किमी
  • बारामती – ४१ किमी
  • मुंबई – २२० किमी
  • सातारा – ८८ किमी
  • अहमदनगर – १११ किमी
  • बीड – १९८ किमी
  • सोलापूर – २११ किमी
  • नाशिक – २६५ किमी
  • कोल्हापूर – २०५ किमी

संदर्भ संपादन

साचा:Refbegin

साचा:Refend