Jump to content

सलाम बॉम्बे!

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १७:०२, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:विकिडेटा माहितीचौकट सलाम बॉम्बे! हा १९८८ सालचा हिंदी भाषेचा भारतीय चित्रपट आहे जो मीरा नायर यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केला आहे. सोनी तारापोरवाला यांनी पटकथा लिहिलेला आहे. या चित्रपटामध्ये भारतातील सर्वात मोठे शहर असलेल्या बॉम्बे म्हणजेच मुंबईच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांचे दिवसागणिक जीवनाचा इतिहास आहे. यामध्ये शफीक सय्यद, हंसा विठ्ठल, चंदा शर्मा, रघुवीर यादव, अनिता कंवर, नाना पाटेकर आणि इरफान खान यांच्या मुख्य भूमिका आहेत.

सर्वोत्कृष्ट परदेशी भाषेच्या चित्रपटासाठी अकादमी पुरस्कारासाठी नामांकित होणारा हा चित्रपट भारताचा दुसरा चित्रपट होता.[] भारतामध्ये देखिल याला अनेक पुरस्कार मिळाले ज्यात राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट हा एक आहे. न्यू यॉर्क टाईम्सच्या "द बेस्ट १००० मूव्हीज एव्हर मेड"च्या यादीमध्ये हा चित्रपट गणला जातो.[]

कथानक[संपादन | स्रोत संपादित करा]

चित्रपट सुरू होण्यापूर्वी कृष्णाने त्याच्या गुंडगिरी करणाऱ्या मोठ्या भावाच्या दुचाकीला आग लावली. यामुळे त्याची आई त्याला जवळच्या अपोलो सर्कसमध्ये नेते आणि सांगिते की जेव्हा तो खराब झालेल्या दुचाकीसाठी ५०० रूपये मिळवेल तेव्हाच तो घरी येऊ शकेल. कृष्णा सर्कससाठी काम करते. सर्कस पुढेल्या गावी जाण्यासाठी निघत असतानाच त्याचा मालक त्याला एक काम सांगतो. पण जेव्हा कृष्ण परततो तेव्हा त्याला आढळले की सर्कस निघुन गेली आहे. आईला परतफेड करण्यासाठी पैसे नसल्यामुळे, तो मुंबईकडे प्रवास करतो. तेथे आल्याबरोबर त्याची काही मालमत्ता लुटल्या जाते. तो चोरांचा पाठलाग करतो, त्यांच्याशी मैत्री करतो आणि ग्रांट रोड रेल्वे स्थानकाजवळील फाल्कलँड रोडच्या शहरातील कुप्रसिद्ध रेड-लाईट भागात जाऊन पोहोचतो. नंतर तो विविध व्यक्तींना भेटतो; काही मादक पदार्थ विक्रेते, काही वेश्या आणि इतर बरेच. तो चांगल्या आणि वाईट मार्गाने पैसे मिळवण्याचा प्रयत्न करतो परंतु तो कधीही पैसे वाचवू शकत नाही.

निर्माण[संपादन | स्रोत संपादित करा]

सलाम बॉम्बेमध्ये दिसणारे बहुतेक तरूण कलाकार हे प्रत्यक्ष रस्तावर व झोपडपट्टीत राहणारी मुले होती. चित्रपटात येण्यापूर्वीच त्यांना मुंबईतील एका विशेष कार्यशाळेत नाट्याचे प्रशिक्षण मिळाले. पुढे १९८९ मध्ये दिग्दर्शक मीरा नायर यांनी चित्रपटात दिसणार्या मुलांचे पुनर्वसन करण्यासाठी सलाम बाळक ट्रस्ट नावाची एक संस्था स्थापन केली. ही ट्रस्ट अद्याप अस्तित्वात आहे आणि आता मुंबई, दिल्ली आणि भुवनेश्वरमधील रस्त्यावरच्या मुलांना पाठिंबा देतो. सिनेमात कृष्णाची भूमिका साकारणारे शफीक सय्यद आता बंगळुरुमध्ये ऑटोरिक्षा चालक म्हणून आपले जीवन जगतात. []

या चित्रपटाने अमेरिका आणि कॅनडा मध्ये सुमारे २ दशलक्ष डॉलर्सची कमाई केली आणि त्या काळात सर्वाधिक कमाई करणारा हिंदी भाषेचा चित्रपट ठरला. फ्रान्समध्ये या चित्रपटाने ६ लाखाहून अधिक तिकिट आणि जर्मनीमध्ये २ लाखाहून अधिक तिकिटे विकली. एकूणच, चित्रपटाने परदेशी बाजारात ७५ लाख डॉलर्सची कमाई केली.

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी

साचा:राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट