संथारा व्रत

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १३:२९, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:विकिडेटा माहितीचौकट

संथारा व्रत हे एक व्रत असून जैन धर्मीय लोक ते करतात, त्यामध्ये अन्न आणि पाण्याचे ग्रहण अचानक कमी करत जाऊन शेवटी त्या दोन्हींचाही पूर्ण त्याग करणे अपेक्षित आहे. जे खरेतर भौतिक जगातील इच्छा संपल्याचे द्योतक म्हणून केले जाते. अन्न आणि पाण्याच्या अभावाने शेवटी व्रतस्थ माणसाचा मृत्यू होतो, आणि म्हणूनच ह्या व्रताला समाधी मरण किंवा संन्यास मरण असेही म्हणतात.