आझाद हिंद फौज
आझाद हिंद फौज ही भारतीय पारतंत्र्याच्या काळात ब्रिटिशांशी लढण्यासाठी निर्माण केलेली भारताची सेना होती. तिचे नेतृत्व सुभाषचंद्र बोस यांनी दुसऱ्या महायुद्धाच्या काळात केले होते.रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेंनेची स्थापना केली.
आझाद हिंद सेनेची स्थापना १९४२ मध्ये झाली. हिचे कार्य सप्टेंबर १९४५ पर्यंत सुरू होते.[१]
युद्धे संपादन
दलनायक संपादन
- सेनापती - सुभाषचंद्र बोस
- जनरल जगन्नाथराव भोंसले
- जनरल जनरल मोहन सिंह
- मेजर जनरल एम.झेड. कियानी
- मेजर जनरल शहानवाज खान
- कर्नल पी.के. सहगल
- कर्नल शौकत मलिक
- [महिला दल प्रमुख] कॅप्टन लक्ष्मी सहगल
आझाद हिंद सेनेची कामगिरी संपादन
- भारतीय स्वातंत्र्यासाठी सुभाषचंद्र बोस यांनी ब्रिटिश शत्रूशी मैत्री केली.
- जानेवारी1941 मध्ये कैदेतून सुटून जर्मनीला गेले. जपानमधील रासबिहारी बोस यांनी सिंगापूर, मलाया, ब्रम्हदेश येथील हिंदी लोकांचा हिंद स्वातंत्र्य संघ स्थापन केला.
- हिंदी सैन्यात राष्ट्रप्रेम निर्माण केले रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेंनेची स्थापना केली.
- मलाया, सिंगापूर, ब्रहादेश, जिंकून जपान व जर्मनीच्या मदतीने तेथे 21 ऑक्टोबर 1943 रोजी हिंदुस्थानचे हंगामी सरकार स्थापन केले.
- जय हिंद, चलो दिल्ली या घोषणेनूसार वाटचाल सुरू केली.
- 1944 मध्ये अंदमान निकोबार ही बेटे मुक्त करून शहीद व स्वराज्य असे नामकरण केले.
- जर्मनी, जपान यांचा पराभव झाला 18 ऑगस्ट 1945 राजी बॅकॉककडून टोकियोकडे जात असताना विमान अपघात झाला त्यात ते मरण पावले.
संदर्भ संपादन
कुशल महाले