श्रीपाद वल्लभाचार्य
Appearance
कवी श्रीपाद वल्लभाचार्य हे पंधराव्या शतकात आंध्र प्रदेशातील विजयनगर या राज्याचे राजे श्री कृष्णदेव यांच्या दरबारातील कवी होते. त्यांनी व्यास सूत्र भाष्य, जैमिनीय सूत्र भाष्य, भागवत टीका सुबोधिनी, पुष्टि प्रवळा, मर्यादा आणि सिद्धान्त, रहस्य संस्कृत यांसह बरीच साहित्य निर्मिती केली.
मधुराष्टकम्[संपादन | स्रोत संपादित करा]
मधुराष्टकम् ही कवी श्रीपाद वल्लभाचार्य यांनी रचलेली ही एक सुंदर संस्कृत रचना आहे. मधुराष्टक या भक्तिरसपूर्ण रचनेत कृष्णप्रेमात सगळेच कसे मधुर होते याचे नितांत सुंदर वर्णन आहे. ही रचना जौनपुरी रागात गायली जाते.