Deprecated: Caller from MediaWiki\Cache\LinkCache::fetchPageRow ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::selectOne ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Page\PageProps::getProperties ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385
सारागढीची लढाई १८९७ - मराठीपिडिया Jump to content

सारागढीची लढाई १८९७

मराठीपिडिया कडून
नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
लढाई झालेल्या ठिकाणचा नकाशा

१२ सप्टेंबर १८९७ रोजी ब्रिटीश भारतीय लष्कर (शिख सैनिक) आणि पख्तुन ओराकझाई (आदिवासी) यांच्या दरम्यान सारागढीची लढाई लढली गेली. ही लढाई तिराह मोहिमेच्या अगोदर झाली. ही लढाई उत्तर-पश्चिम फ्रंटियर प्रांतात (आता खैबर पख्तुनखवा, पाकिस्तान) घडली. ब्रिटिश भारतीय सैन्य तुकडीत २१ शिख सैनिक होते. ते ३६ व्या शिखांच्या बटालियनचे (सध्याचे सिख रेजिमेंटचे चौथे बटालियन) सैनिक होते. हे सैन्य तेथे तैनात होते आणि सुमारे १०,००० अफगाणांनी त्यांच्यावर हल्ला केला. हवलदार इशर सिंह यांच्या नेतृत्वाखाली शिखांनी हार पत्करण्या पेक्ष्या लढुन मृत्यूस सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. याच कारणास्तव काही लष्करी इतिहासकारांनी या लढाईला इतिहासातील सर्वात महान लढ्याची उपमा दिली आहे. .[] दोन दिवसांनी दुसर्या ब्रिटीश भारतीय सैन्याच्या तुकडीने हा प्रांत परत काबिज केला होता. १२ सप्टेंबर रोजी "सारागढी दिन" म्हणून दरवर्षी या लढाईचे शिख सैनिक सज्ज होतात. []

तुकडीतील सैनिक[संपादन | स्रोत संपादित करा]

all २१ शिख कमिशन अधिकारी ज्यांनी सारागढीच्या लढाईत आपले प्राण गमवाले त्यांना मरणोपरांत भारतीय ऑर्डर ऑफ मेरिट बहाल केला. त्या वेळी भारतीय सैनिकांना देण्यात येणारा हा सर्वात मोठा शौर्य पुरस्कार होता. व्हिक्टोरिया क्रॉस हा त्यासंबंधीचा गौरव पुरस्कार होता. हा पुरस्कार भारताच्या राष्ट्रपतींनीकडुन देण्यात येणार्या आजच्या परम वीर चक्राच्या समतुल्य मानला जातो. बहादुर पुरस्कारांच्या २१ प्राप्तकर्त्यांची नावे अशी आहेत [][]

  1. हवलदार ईशर सिंह (रेजिमेंटल १६५)
  2. नायक लाल सिंह (३३२)
  3. लान्स नाईक चंदा सिंह (५४६)
  4. सिपाही सुंदर सिंह (१३२१)
  5. सिपाय राम सिंह (२८७)
  6. सिपाय उत्तर सिंह (४९२)
  7. सिपाही साहिब सिंह (१८२)
  8. सिपाय हिरा सिंह (३५९)
  9. सिपाही दया सिंग (६८७)
  10. सिपाही जीवन सिंग (७६०)
  11. सिपाही भोला सिंग (७९१)
  12. सिपाय नारायण सिंह (८३४)
  13. सिपाही गुरमुख सिंह (८१४)
  14. सिपाही जीवन सिंह (८७१)
  15. सिपाय गुरमुख सिंह (१७३३)
  16. सिपाय राम सिंह (१६३)
  17. सिपाही भगवान सिंग (१२५७)
  18. सिपाही भगवान सिंग (१२६५)
  19. सिपाही बुटा सिंग (१५५६)
  20. सिपाही जीवन सिंग (१६५१)
  21. सिपाही नंद सिंग (१२२१)

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]