Jump to content

त्रावणकोर संस्थान

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट भूतपूर्व देश

त्रावणकोर संस्थानचे शेवटचे राजा चिथिर थिरूनल बलराम वर्मा
त्रावणकोर संस्थानचे दिवाण सर टी. माधवराव


त्रावणकोर संस्थान हे ब्रिटिश भारतातील एक संस्थान होते.

स्थापना[संपादन | स्रोत संपादित करा]

त्रावणकोर संस्थानची स्थापना इ.स. १७२९ या वर्षी झाली.

राजधानी[संपादन | स्रोत संपादित करा]

त्रावणकोर संस्थानची राजधानी इ.स. १७९५ पर्यंत पद्मनाभपुरम होती, त्यानंतर त्रिवेंद्रम किंवा तिरुवनंतपुरम हीच कायमची राजधानी होती.

संस्थानिक[संपादन | स्रोत संपादित करा]

त्रावणकोर संस्थानचे संस्थानिक वर्मा घराणे होते. प्रसिद्ध भारतीय चित्रकार राजा रवी वर्मा हे त्रावणकोरच्या राजघराण्यातीलाच होते.

चतुःसीमा[संपादन | स्रोत संपादित करा]

त्रावणकोर संस्थानाच्या उत्तरेला आणि पूर्वेला मद्रास प्रांत होता. तर पश्चिमेला अरबी समुद्र, आणि दक्षिणेला हिंदी महासागर होता.

क्षेत्रफळ[संपादन | स्रोत संपादित करा]

त्रावणकोर संस्थानचे क्षेत्रफळ १९,८४४ चौरस किमी इतके होते.

प्रशासकीय विभाजन[संपादन | स्रोत संपादित करा]

त्रावणकोर संस्थानाचे चार विभाग पडले होते-

१. कोट्टायम

२. कोल्लम

३. पद्मनाभपुराम्

४. त्रिवेंद्रम्

भाषा[संपादन | स्रोत संपादित करा]

त्रावणकोर संस्थानात मल्याळम, तमिळ व इंग्रजी या भाषा प्रचलित होत्या.

स्वातंत्र्योत्तर कालखंड[संपादन | स्रोत संपादित करा]

भारत स्वतंत्र झाल्यावर महाराजा बलराम वर्मा यांनी त्रावणकोर संस्थान भारतीय संघराज्यात विलीन केले. त्यानंतर त्रावणकोर संस्थान व कोचीन संस्थान यांचे मिळून त्रावणकोर-कोचीन घटक राज्य बनवण्यात आले. त्यानंतर त्रावणकोरचा कन्याकुमारी भाग हा तामिळनाडू राज्यात गेला व उर्वरित भाग हा केरळ राज्यात आहे.