न्यू कूच बिहार रेल्वे स्थानक
साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक न्यू कूच बिहार रेल्वे स्थानक हे भारताच्या पश्चिम बंगाल राज्यातील कूच बिहार जिल्ह्याच्या कूच बिहार शहरातील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. ईशान्य भारताचे प्रवेशद्वार असलेले कूच बिहार न्यू जलपाईगुडी-गुवाहाटी मार्गावर स्थित असून ईशान्य भारताकडे जाणाऱ्या सर्व गाड्या कूच बिहारमार्गेच धावतात.
१९०१ साली कूच बिहार संस्थानाचे राजे नृपेंद्र नारायण ह्यांनी नॅरोगेजवर चालणाऱ्या कूच बिहार रेल्वेचे उद्घाटन केले. १९१० साली हा मार्ग मीटर गेजमध्ये रुपांतरित करण्यात आला. १९४७ सालच्या भारताच्या फाळणीनंतर बांगलादेशाच्या भूभागातून धावणारे अनेक मार्ग बंद पडले व ह्या भागतील रेल्वे व्यवस्था पूर्णपणे कोलमडली. भारत सरकारने स्वातंत्र्यानंतर नवे रेल्वेमार्ग बनवले व १९६६ साली न्यू कूचबिहार स्थानक कार्यान्वित झाले.
प्रमुख गाड्या संपादन
- दिब्रुगढ राजधानी एक्सप्रेस
- हावडा-गुवाहाटी सराईघाट एक्सप्रेस
- सियालदाह-आगरताळा कांचनगंगा एक्सप्रेस
- हावडा-दिब्रुगढ - कामरूप एक्सप्रेस
- दिब्रुगढ–कन्याकुमारी विवेक एक्सप्रेस
- ब्रह्मपुत्रा मेल
- अवध आसाम एक्सप्रेस