ठाणे जिल्हा
साचा:माहितीचौकट भारतीय जिल्हा हा लेख ठाणे जिल्ह्याविषयी आहे. ठाणे शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या
ठाणे जिल्हा भारतातील महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा आहे. ०१ ऑगस्ट २०१४ मध्ये या जिल्ह्याचे विभाजन करून पालघर या नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यात आलेली आहे. ठाणे जिल्ह्यात प्रामुख्याने आगरी, कुणबी, आदिवासी व ठाकूर समाजाची लोक गाव समुहाने वस्ती करून राहत असत. ठाणे जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येत कुणबी व आगरी समाजाची लोकसंख्या जास्त आहे. ठाणे जिल्ह्यांतील स्थानिक भाषा म्हणून आगरी बोलीकडे प्रामुख्याने पाहिले जाते.
चतुःसीमा संपादन
- पश्चिम- अरबी समुद्र,मुंबई जिल्हा
- उत्तर- पालघर जिल्हा
- पूर्व- अहमदनगर जिल्हा, नाशिक जिल्हा
- दक्षिण- रायगड जिल्हा, पुणे जिल्हा