जन गण मन
जन गण मन हे भारताचे राष्ट्रगीत आहे. हे कवी रवींद्रनाथ टागोर यांनी बंगालीमध्ये भारतो भाग्यो बिधाता या नावाने रचलेले आहे.[१][२] याची शैली साधू बंगाली किंवा तत्सम बंगालीमध्ये असून यावर संस्कृतचा प्रभाव आहे.[१] भारतो भाग्यो बिधाता या रचनेला २४ जानेवारी १९५० रोजी भारतीय संविधान सभेने राष्ट्रगीत म्हणून स्वीकारले.[३][४] राष्ट्रगीताच्या अधिकृत प्रस्तुतीकरणाला ५२ सेकंद वेळ लागतो.[४] इंडियन नॅशनल कॉंग्रेसच्या कलकत्ता (आता कोलकाता ) अधिवेशनात सर्वप्रथम हे सार्वजनिकपणे गायले गेले. नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांनी बंगालीमध्ये लिहिलेल्या कवितेतील पाच कडव्यांपैकी एका कडव्याचा संस्कृत भाषांतराचा राष्ट्रगीत म्हणून स्वीकार केलेला आहे.[५]
शब्द संपादन
- ऐका -
चित्र:Jana gana mana vocal.ogg चित्र:Jana Gana Mana instrumental.ogg
प्रवाद संपादन
या कवितेच्या भारताचे राष्ट्रगीत होण्याच्या योग्यतेबद्दल वाद आहे. ही कविता प्रथम भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या १९११ मधील अधिवेशनात म्हटली गेली होती. रवींद्रनाथ टागोर यांनी हे भारताच्या भविष्याचे जयगीत म्हणून लिहिले होते. पुढच्याच दिवशी जॉर्ज पाचवा याचे स्वागत करण्यात आले. वर्तमानपत्रात आलेल्या चुकीच्या उल्लेखांमुळे असा समज पसरला की ते राजाला उद्देशून लिहिले आहे. पण टागोरांनी ही स्वतः ही कविता भारताच्या अंगभूत शक्तीला व ऐतिहासिक वैभवाला उद्देशून लिहिली आहे असे म्हटले आहे.[६] बंगालची फाळणी रद्द केल्याबद्दल पंचम जॉर्ज यांचे अभिनंदन करण्यासाठी स्वागतगीत लिहावे, अशी सूचना प्रद्युत कुमार ठाकूर यांनी रवींद्रनाथ टागोर (ठाकूर) यांना केली होती. परंतु त्याची प्रचंड चीड येऊन टागोर यांनी त्यांना नकार दिला. २७ डिसेंबर १९११ रोजी टागोर यांनी स्वतः चाल लावलेले ‘जन गण मन’ कॉंग्रेसच्या कोलकाता अधिवेशनात गायले.[७]
गीताचा आशय संपादन
या गीतात भारत देश सुजलाम् सुफलाम् आहे, भारतभूमी किती संपन्न आहे, त्यात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांचे औदार्य यासह अनेक गुण व वैभव शब्दबद्ध करण्यात आले आहेत. सर्व जाती, संप्रदाय व पंथ यांचा उल्लेख करण्यात आला आहे. या गीताच्या माध्यमातून त्यांनी सर्व शक्तिमान श्री परमेश्वराला भारताच्या कल्याणासाठी मागणे मागितले आहे.
राष्ट्रगीत म्हणून मान्यता संपादन
घटना समितीने २४ जानेवारी १९५० मध्ये देशाचे अधिकृत राष्ट्रगीत म्हणून ‘जन गन मन’चा स्वीकार केला. या गीताची पाच कडवी असून केवळ पहिलेच कडवे भारतात म्हटले जाते.व त्याच दिवशी म्हणजे २४ जानेवारी १९५० भारताचे राष्ट्रगान ही स्विकृत केले.
जन गण मन पूर्ण गीत संपादन
जनगणमन अधिनायक जय हे, भारत भाग्य विधाता
पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग
विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधितरंग
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिष मागे
गाहे तव जय गाथा
जनगणमंगलदायक जय हे, भारत भाग्यविधाता
जय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे. ||१||
- अहरह तव आव्हान प्रचारित सुनि, तव उदार वाणी
- हिंदु बौद्ध सिख जैन पारसिक मुसलमान ख्रिस्तानी
- पूरब पश्चिम आसे, तव सिंहासन पासे
- प्रेमहार हय गाथा
- जनगणऐक्यविधायक जय हे, भारत भाग्यविधाता
- जय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे. ||२||
पतनअभ्युदयबंधुर पंथा युगयुग धावित यात्री
तुम चिर सारथी, तव रथचक्रे मुखरित पथ दिन रात्री
दारुण विप्लव माजे, तव शंखध्वनि बाजे
संकंट दुखयात्रा
जनगण पथ परिचायक जय हे, भारत भाग्यविधाता
जय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे. ||३||
- घोरतिमिरघननिबिड निशीथे पीडित मूर्छित देशे
- जागृत छिल तव अविचल मंगल नत नयने अनिमेषे
- दुःस्वप्ने आतंके, रक्षा करिले अंके
- स्नेहमयी तुमी माता
- जनगण दुःख त्रायक जय हे, भारत भाग्यविधाता
- जय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे. ||४||
रात्र प्रभातिल उदिल रविच्छवि पुर्व उदयगिरि भाले
गाहे विहंगम पुण्य समीरण नवजीवन रस ढाले
तव करुणारुण रागे, निद्रित भारत जागे
तव चरणे नत माथा
जय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे. भारत भाग्यविधाता ||५||
जन गण मन गीताचा अर्थ संपादन
राष्ट्रगीताचा मराठीतील अर्थ पाहू या. तो असा....
जन-गण-मन अधिनायक जय है भारत भाग्य विधाता
तू जनतेच्या हृदयाचा स्वामी आहेस. भारताचा भाग्योदय करणारा आहेस. तुझा जयजयकार असो!
पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग।
पंजाब , सिंध , गुजरात , महाराष्ट्र , द्राविड म्हणजे दक्षिण भाग , उत्कल म्हणजे आताचा ओडिशा , बंगाल या सर्वांना तुझा नामघोष जागृत करतो. जागे करतो.
विंध्य हिमाचल यमुना गंगा , उच्छल जलधितरंग। विंध्याद्री आणि हिमाचल इथपर्यंत तुझे यशोगान ऐकू येतं.
गंगा-यमुनेच्या प्रवाह संगीतात ते निनादित होतं. उसळी मारणाऱ्या समुद्राच्या लाटाही तुझ्या नामाचा गजर करतात.
तव शुभ नामे जागे , तव शुभ आशिष मांगे ; गाहे तव जय गाथा। जन-गण मंगलदायक जय है , भारत-भाग्य-विधाता।
हे सर्व तुझ्यापाशी आशीर्वाद मागतात. तुझी कीर्ती गातात. तू सर्व लोकांचं मंगल करणारा आहेस.
जय हे , जय हे , जय हे , जय जय जय जय है।।
तुझा जयजयकार. त्रिवार जयजयकार.