अकलोली
साचा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
अकलोली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील एक गाव आहे.

भौगोलिक स्थान[संपादन | स्रोत संपादित करा]
अकलोली हे भिवंडी तालुक्यातील छोटे शहरवजा गांव आहे. मुंबई पासून ८० कि.मी. अंतरावर आहे. हे गांव तानसा नदीच्या काठावर वसलेले असून वाडा तालुका व भिवंडी तालुका यांच्या हद्दीवर आहे. वज्रेश्वरी व गणेशपूरी, निंबवली ही प्रसिद्ध स्थळे येथून २-३ कि.मी.अंतरावर आहेत.
महत्त्व[संपादन | स्रोत संपादित करा]
अकलोली येथील गरम पाण्याची कुंडे जगप्रसिद्ध आहेत.येथील शिवमंदिराला पौराणिक महत्त्व प्राप्त आहे.शिवमंदिरा समोर असलेल्या गरम पाण्याच्या कुंडात स्नान केल्याने चर्मरोग बरे होतात.सुट्टीच्या दिवसात या ठिकाणी देशातून व परदेशातूनही येथे पर्यटक येत असतात.
हवामान[संपादन | स्रोत संपादित करा]
येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते.
लोकजीवन[संपादन | स्रोत संपादित करा]
==प्रेक्षणीय स्थळे== अकलोली हे ठिकाण ठाणे जिल्यात आहे गरम पाण्याचा झरा म्हणून हे ठिकाण प्रसिद्ध आहे व यात औषधी गुणधर्म आहेत म्हणून हे ठिकाण पर्यटकांसाठी आकर्षक ठिकाण आहे