कागल
Jump to navigation
Jump to search
कागल हे महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्याचे मुख्य गाव आहे. महाराष्ट्र व कर्नाटकच्या सीमेवरील या गावात गोपाळ कृष्ण गोखले यांनी आपले प्राथमिक शिक्षण घेतले. कागल आनंद यादव यांचे जन्मगाव आहे.तसेच बाळासाहेब खर्डेकर व गुणा कागलकर हे येथे वास्तव्यास होते.कागल हे अलिकडे राजकारणाचे विद्यापीठ आहे. जिल्ह्याच्या राजकारणावर प्रभाव टाकणाऱ्या प्रमुख नेत्यांमध्ये या तालुक्यातील बऱ्याच नेत्यांचा समावेश होतो.
व्यवसाय आणि उद्योग
कागल येथे श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना आहे. तसेच येथे पंचतारांकीत एम.आय.डी.सी. आहे.