जम्मू आणि काश्मीर (संस्थान)
Jump to navigation
Jump to search
जम्मू आणि काश्मीर हे इ.स. १८४६ ते १९५२ पर्यंत ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या शासनकाळात यासोबतच ब्रिटिश राज दरम्यान भारतातील एक संस्थान होते. १९४८ पुर्वी जम्मू- काश्मीर संस्थान राजा हरिसिंग होते. त्यानंतर जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देत भारतात सामिल केले गेले. जम्मू-काश्मीरचे सामाजिक व राजकीय दृष्टीने तीन भाग पडत ज्यात जम्मू, काश्मीर, व लडाख या विभागांचा समावेश होता. जम्मूविभागात हिंदू व शीख अशी मिश्र लोकसंख्या, काश्मिरी खोऱ्यात मुस्लिम बहुल लोकसंख्या आहे तर लडाखमध्ये प्रामुख्याने बौद्ध लोकसंख्या होती.