धम्म

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:गल्लत

साचा:बौद्ध धर्म बौद्ध धर्मानुसार धम्म (पाली: धम्म ; संस्कृत: धर्म) म्हणजे तथागत गौतम बुद्धांनी दिलेली शिकवण आणि त्या शिकवणीनुसार दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग होय.[१] धम्म हे त्रिशरणांपैकी एक आहे. धम्म म्हणजे बुद्ध तत्त्वज्ञान किंवा बौद्ध तत्त्वज्ञान असून ते धर्म (Religion) याहून अधिक भिन्न शब्द आहे.

व्युत्पत्ती व भाषांनुसार नामभेद

धम्म हा पाली भाषेतील शब्द धर्म या "योग्य व न्याय्य मार्ग" अश्या अर्थाच्या संस्कृत शब्दावरून आला आहे[२].

पूर्व आशियात धम्म या संज्ञेसाठी 法 हे चिन्ह वापरले जाते; ज्याचा मॅंडरिन भाषेत फा, जपानी भाषेत होकोरियन भाषेत बेओप असा उच्चार होतो. तिबेटी भाषेत या संज्ञेसाठी चोस असा शब्द आहे. उय्गुर, मंगोलियन व अन्य काही मध्य आशियाई भाषांमध्ये धम्म या संज्ञेस नोम हा शब्द असून, तो प्राचीन ग्रीक भाषेती नोमोस (ग्रीकः νόμος) या "कायदा" असा अर्थ असलेल्या शब्दावरून आला आहे.

चार आर्यसत्य

साचा:मुख्य दुःख आहे, दुःखाची उत्पत्ति आहे, दुःखातून मुक्ती आहे आणि मुक्तिगामी आर्य आष्टांगिक मार्ग ही चार आर्यसत्ये म्हणून ओळखली जातात.[३]

आष्टांगिक मार्ग

प्रज्ञा १) सम्यक दृष्टी २) सम्यक संकल्प

शील ३) सम्यक वाचा ४) सम्यक कर्मान्त ५) सम्यक आजीविका

समाधी ६) सम्यक व्यायाम ७) सम्यक स्मृती ८) सम्यक समाधी[४]

धम्म परिषद

बाबासाहेब आंबेडकरांचा धम्मविषयक दृष्टिकोण

साचा:बदल बाबासाहेबांनी एक नवा शब्द शिकवला आणि त्यातून जुने जग उलथवण्याची शक्ती असलेले साहित्य उभे राहिले . तो शब्द म्हणजे ‘ धम्म ’ . ‘ धम्म ’ या शब्दाने समाजात माणसाचे श्रेष्ठत्व आणि ऐहिकता या सर्वात महत्त्वाच्या मूल्यांची प्राणप्रतिष्ठा केली. या नव्या जीवनमूल्यांना त्यांनी धम्म म्हटले .साचा:संदर्भ हवा बाबासाहेबांनी एका धर्माचा त्याग करून दुसरा धर्म स्वीकारला, असे झाले नाही. तर, निखळ प्रज्ञा आणि करुणेचे त्यांना जिथे जिथे अपूर्व मिश्रण आढळले , त्या तत्त्वज्ञानाचा त्यांनी स्वीकार केला. अंधश्रद्धांवर आधारलेल्या जीवनपद्धतीकडून प्रेम आणि निर्मळ बुद्धीच्या बळावर चालणाऱ्या जीवनपद्धतीचा त्यांनी स्वीकार केलासाचा:संदर्भ हवा. या बुद्धिनिष्ठ जीवनपद्धतीचे नाव ‘ धम्म ’ असे आहेसाचा:संदर्भ हवा.

भारताच्या राष्ट्रपतींच्या खुर्चीवर "धम्म चक्र प्रवर्तनाय" हा बुद्धाचा प्रथम संदेश कोरला आहेसाचा:संदर्भ हवा. याचा मूळ हेतू हाच की भारत एक धम्मशासित राज्य निर्माण व्हावे आणि एक उज्ज्वल राष्ट्र घडावेसाचा:संदर्भ हवा. सारा भारत बौद्धमय व्हावा, ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची आंतरिक इच्छा होतीसाचा:संदर्भ हवा.

संदर्भ

साचा:संदर्भयादी

अधिक वाचन

साचा:बौद्ध विषय सूची