पुष्यमित्र शुंग

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search
शुंग साम्राज्याचा विस्तार

पुष्यमित्र शुंग हा प्राचीन उत्तर भारतातील एक हिंदू सम्राट होता व शुंग साम्राज्याचा संस्थापक होता. मगध साम्राज्याचा मौर्यांच्या पाडावानंतरचा शासक होता. पुष्यमित्र शुंग हा सुरुवातीला मौर्य साम्राज्याचा सेनापती होता. अशोकानंतर ५० ते ६० वर्षातच मौर्य साम्राज्य लयाला गेले. अशोकानंतर कोणताही मौर्य शासक प्रभावी नव्हता. पुष्यमित्र शुंगने शेवटचा मौर्य सम्राट बृहद्रथ हा दुर्बल आणि अहिंसक असल्यामुळे त्याची हत्या केली व तो स्वतः मगध साम्राज्याचा शासक बनला. अशा प्रकारे शुंग वंशाची स्थापना झाली. शुंग वंशाने मगधवर व उत्तर भारतावर पुढील दीड शतक राज्य केले.

पुष्यमित्र शुंग हा एक महान सेनानी होता. त्याने डेमेट्रियसचे या ग्रीक राजाचे आक्रमण परतवून लावले, तसेच शक राज्यकर्ते व सातवाहनांबरोबर युद्धे करून शुंग साम्राज्य वाढवले. तसेच पुष्पमित्र शुंगाच्या शासनकाळात लयास जाणार्या हिंदू धर्माचे संवर्धन झाले आणि बौद्ध धर्माचा जनसामान्यांवर असणारा प्रभाव कमी होण्यास सुरुवात झाली... हिंदू धर्माला अस्त होण्यासून वाचविण्याचे महान कार्य पुष्पमित्र शुंगाने केले आहे त्यामुळे पुष्पमित्र शुंग राजाचा हिंदू लोक सन्मान करतात... तसेच 14 एप्रिलला पुष्पमित्र शुंगाची जयंती लोक काही ठीकाणी साजरी करतात...

पुष्यमित्र शुंगावरील पुस्तके

  • भारतीय इतिहासातील पडद्याआड गेलेले वीरपुरुष : धोधा बाप्पा, पुष्यमित्र शुंग, पौरस, बख्तार खान, विक्रमादित्य, हरिहर बुक्क (जनार्दन ओक)