पूनम यादव (क्रिकेट खेळाडू)

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:हा लेख साचा:माहितीचौकट खेळाडू


पूनम यादव (२४ ऑगस्ट, इ.स. १९९१:आग्रा, उत्तर प्रदेश, भारत - ) ही भारतीय महिला क्रिकेट संघासाठी खेळणारी एक क्रिकेटपटू आहे.यादव उजव्या हाताने फलंदाजी आणि लेगब्रेक गोलंदाजी करते.

पूनमने २०२० पर्यंत कसोटी, १२ एकदिवसीय आणि २३ टीट्वेंटी सामने खेळले आहेत[१] एप्रिल २०१३ मध्ये बांगलादेशविरुद्धच्या टी-२० सामन्यातून तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. [२]पूनमने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १६ नोव्हेंबर २०१४ रोजी झालेल्या सामन्याद्वारे कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले, तर १२ एप्रिल २०१३ला बांगलादेशविरुद्ध झालेल्या सामन्याद्वारे तिने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल टाकले. [२]२०१३-१४पासून भारतासाठी खेळत असलेल्या पूनम एक धारदार गोलंदाज म्हणून ओळखली जाते.तिने आजवर विविध प्रादेशिक संघांचे प्रतिनिधित्व केलेले आहे.

वैयक्तिक जीवन आणि पार्श्वभूमी

पूनमचा जन्म २४ ऑगस्ट १९९१ रोजी आग्रा येथे झाला.[२] तिच्या आईचे नाव मुन्नीदेवी आहे आणि तिचे वडील रघुवीर सिंह यादव हे एक लष्करी अधिकारी आहेत. तिचे कुटुंब त्यांच्या गावाहून आग्रा शहरात राहायला आले, तेव्हा पूनममध्ये क्रिकेटची आवड निर्माण झाली.

प्रशिक्षण

आग्रा येथील एकलव्य स्टेडियममध्ये सराव करणारी पूनम एकमेव महिला खेळाडू होती. तिथे ऑफस्पिन फिरकीपटूंची कधीच कमतरता नव्हती, मात्र लेग स्पिन करू शकणारी ती मैदानातील एकमेव गोलंदाज होती आणि तीसुद्धा महिला.पूनमची उंची ४ फूट ११ इंच आहे. आपल्या कमी उंचीचा फायदा घेत फलंदाजांच्या अगदी जवळ बॉल टाकत असे, ज्यात फलंदाज अडकून बाद होत असे. सुरुवातीला तिचे कुटुंब तिच्या क्रिकेटमधल्या महत्त्वाकांक्षेला फारसे अनुकूल नव्हते, पण नंतर तिने जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर आपले स्थान राज्याच्या संघात पक्के केले.

कारकीर्द आणि यश

प्रथम पूनमची निवड केंद्रीय झोन या प्रादेशिक संघात झाली. नंतर ती उत्तरप्रदेश संघासाठी खेळू लागली आणि सध्या ती देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये भारतीय रेल्वेच्या संघाचे प्रतिनिधित्व करते.ती आधी रेल्वेमध्ये लिपिकपदी काम करत असे, आणि आता अधिक्षक पदावर कार्यरत आहे. २०१७ विश्वचषकात पूनमच्या "गुगली"ने फलंदाज चकित होऊ लागल्या आणि लवकरच तीच तिची खास शैली बनली. २०१८ च्या आयसीसी महिला ट्वेंटी२० विश्वचषकात सर्वाधिक बळी घेणाऱ्या दोन खेळाडूंपैकी एक पूनम होती. सप्टेंबर २०१८मध्ये तिच्यापेक्षा जास्त अनुभवी आणि वरिष्ठ खेळाडू झुलन गोस्वामीला मागे टाकत ती टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतासाठी सर्वाधिक बळी घेणारी गोलंदाज ठरली. २०२० च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताला अंतिम सामन्यापर्यंत पोहोचवण्यात पूनमची कामगिरी महत्त्वाची मानली जाते. या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत करत जेतेपद पटकावले होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूंचा आदर्श संघ जाहीर केला, तेव्हा त्यात पूनम ही एकमेव भारतीय क्रिकेटपटू होती.१८ सामन्यांमध्ये २८ बळी घेत पूनम ही टी-२० विश्वचषक सामन्यांमध्ये भारताकडून सर्वाधिक बळी घेणारी खेळाडू ठरली आहे. तिने प्रतिषटक ५.६ धावा दिल्या आहेत. या आकर्षक कामगिरीमुळे टी-२० विश्वचषकात सर्वाधिक बळी घेणाऱ्या महिलांच्या आयसीसी यादीत पूनम ७व्या स्थानावर आहे.[३]

पुरस्कार

  • पूनमला २०१८-१९मध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने पूनमला सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटूचा पुरस्कार दिला.[४]
  • २०१९मध्ये तिला तिच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते अर्जुन पुरस्काराने सम्मानित करण्यात आले.[५]

साचा:संदर्भनोंदी