प्रतापराव गुजर

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:इतिहासलेखन साचा:संदर्भहीन लेख साचा:बदल

प्रतापराव गुर्जर यांचा पुतळा

प्रतापराव गुर्जर हे मराठा साम्राज्याचे तिसरे सेनापती होते. यांचे खरे नाव कुडतोजी गुर्जर असे होतो. कुडतोजी गुजर यांची स्वराज्य प्रतीची निष्ठा व पराक्रम ध्यानी घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांकडून त्यांना 'प्रतापराव'व गुजर अशी पदवी मिळाली होती ही पदवी मिळण्याचे सबळ कारण हे की त्यांचे खरे नाव कुडतुजी जाधव असे होते पण त्यांनी गुजरात आणि आसपासचे प्रदेशात मोठे यश मिळवले आणि गुजरात प्रदेशात असलेल्या रहिवासी यास आज ही महाराष्ट्रात गुजर म्हणतात महाराष्ट्रात राहतो तो जसा प्रत्येक जाती धर्माचा मराठा समजला जात तसा गुजरात मध्ये राहतो तो पूर्वी गुजराथी नव्हे तर गुजर म्हणून ओळखत असत. म्हणजे गुजरात प्रदेशात म्हणजे गुजरांच्या प्रदेशात प्रताप आणि पराक्रम केला असे ते प्रतापराव गुजर.आजही त्यांची जन्म भूमी असलेल्या सातारा जिल्यातील भोसरे गावात त्यांचे गुजर नावाचे वंशज आणि पूर्वीच्या जाधव आडनावाचे लोकं राहत असलेले आपल्याला पाहायला मिळतील.त्यांचे वाड्याचे अवशेष आजही भोसरे गावात अस्तिवात आहेत.साचा:संदर्भ हवा

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्ऱ्यावरून परतीनंतर प्रतापराव आणि मोरोपंत पिंगळे यांनी पुरंदरच्या तहात गेलेले अनेक दुर्ग परत जिंकून घेतले. साल्हेर किल्ल्यासाठी झालेल्या समोरासमोरच्या लढाईत त्यांनी मुघल सरदार इखलास खान व बहलोल खान यांचा पराभव करून इतिहास घडविला.साचा:संदर्भ हवा

प्रतापराव गुर्जर उर्फ कुडतोजीराव गुर्जर यांच्या गावात मुघलांचे अत्याचार वाढत होते. कुडतोजींना हे काही सहन होत नव्हते. अखेरीस त्यांनी मुघलांविरुद्ध लढा देण्याचे ठरवले. त्यांचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे गावातील स्त्रियांचे, प्राण्यांचे रक्षण करणे. मुघलांच्या खजिन्यावर एकदा एकाच वेळी दोन मराठी वाघांनी हल्ला केला. ते दोन वाघ म्हणजेच खुद्द "छत्रपती शिवाजी महाराज" आणि दुसरे वाघ म्हणजेच "कुडतोजी गुर्जर". छत्रपती शिवाजी महाराज यांनी कुडतोजी गुर्जर यांना स्वराज्याचा विचार सांगितला. कुडतोजीराव खुश झाले. त्यांनी हसत हसत महाराजांना होकार दिला.साचा:संदर्भ हवा

कुडतोजीराव एकदा रागाच्या भरात आपल्या घरादाराची पर्वा न करता मिर्झाराजेंवर चालून गेले. कुडतोजीरावांची निडरता बघून मिर्झाराजे म्हणाले. "आमच्या सोबत आपण सामील होऊन जावा पाहिजे ते आपल्या पायात टाकून देऊ शकतो" त्यावर कुडतोजीराव म्हणाले "आमचे स्वर्ग फक्त महाराजांच्या चरणांशी आहे".मिर्झाराजे कुडतोजीरावांनी काहीही हानी न करता सोडून दिले. शिवाजीमहाराज या सर्व प्रसंगावरून कुडतोजीरावांवर रागावतात; परंतु त्यांनी केलेल्या या प्रतापी कार्यामुळे महाराजांनी त्यांना प्रतापराव गुर्जर अशी पदवी दिली. प्रताराव गुर्जर हे मराठी स्वराज्याचे तिसरे सरसेनापती झाले.साचा:संदर्भ हवा

बहलोलखान स्वराज्यात धुमाकूळ घालत होता; रयतेचा छळ करत होता. त्याचा बंदोबस्त करणे गरजेचे होते. शिवाजी महाराजांनी प्रतापराव गुजरांना खानाचा वध करा असे आदेश दिला. प्रतापराव गुजर यांनी गनिमी काव्याने खानास उमाराणीच्या(जत तालुका सांगली जिल्हा) डोन नदीच्या पात्रात जाऊन त्यांचा सैन्याचा पाणीपुरवठा बंद केला व तिथे खाना सोबत युद्ध झाले. वेळप्रसंग पाहून खान शरण आला. प्रतापराव गुर्जर हे मेहेरबान झाले. युद्धात शरण आलेल्याला मारू नये असे त्यांचा शिपाईधर्म सांगत होता. त्यांनी खानास सोडून दिले. ही बातमी छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत पोहचली. आपल्या रयतेचे हाल करणारा बहलोलखान जिवंत जातो याचा महाराजांना राग आला. त्यांनी एक खरमरीत पत्र पाठवून प्रतापरावांची कान उघाडणी केली. त्या पत्रात एक वाक्य असे होते की बहलोलखानाला मारल्याशिवाय मला तोंड दाखवू नका. त्याकाळी मावळ्यांचा शिवाजीमहाराजांवर असलेला जीव पाहता ही शिक्षा भयंकर होती. प्रतापराव गुर्जर निराश झाले; दुःखी झाले. त्यांना काय करू सुचेना. जिवाची तगमग होत होती. प्रतापरावांनी वेळ न घालवता सैन्य घेऊन खानाचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यांनी ठरवले "खानाला मारल्याशिवाय महाराजांना तोंड दाखवणार नाही. अशातच एके ठिकाणी सैन्याचा तळ पडलेला होता. मन रमत नाही म्हणून जवळचे सहा सरदार घेऊन प्रतापराव शिकारीला गेले होते. काही मैल गेल्यानंतर त्यांच्या हेरांनी बातमी आणली की बहलोलखान जवळच आहे. जवळ म्हणजे कोठे? तर हा समोरचा डोंगर ओलांडला की छावणी आहे. प्रतापराव गुर्जर यांना राग अनावर झाला. सैन्य येईपर्यंत थांबणे त्यांना मंजूर नव्हते. त्यांनी आपल्या सरदारांना घेऊन चढाई करायचा निर्णय घेतला. अवघे सात मराठ्यांनी पंधरा हजारच्या सैन्यावर हल्ला केला. [(१) विसाजी बल्लाळ २) दिपाजी राउत ३) विठ्ठल पिलाजी अत्रे ४) कृष्णाजी भास्कर ५) सिद्धी हिलाल ६) विठोजी शिंदे ७) आणि खुद्द कडतोजी, उर्फ स्वराज्याचे सरसेनापती म्हणजेच “सरनौबत” प्रतापराव गुर्जर] त्यातल्या एकाचेही पाय डगमगले नाहीत. आपण मुत्यूकडे जात आहोत हे माहिती असूनही ते घाबरत नाहीत; माघार घेत नाहीत. ह्या सर्वांची ताकद म्हणजे एकच व्यक्ती "श्री छत्रपती शिवाजी महाराज". सातही सरदारांना वीर मरण अले.साचा:संदर्भ हवा

मराठ्यांच्या इतिहासात नवीन इतिहास घडला गेला होता. हे सर्व महाराजांच्या कानी पडल्यावर महाराज दुःखी झाले. ही उंबराणीची लढाई १५ एप्रिल १६७३ रोजी झाली. या प्रसंगावर "वेडात मराठे वीर दौडले सात" ही कविता गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या आवाजात प्रसिद्ध आहे. लोकशाहीर बशीर मोमीन कवठेकर यांनी 'वेडात मराठे वीर दौडले सात' याच नावाचे व्यवसायिक नाटक लिहिले[१] आणि नंतर त्याचे रूपांतर वगनाट्यात सुद्धा केले, जे विविध तमाशा फडांनी ग्रामीण महाराष्ट्रात सादर करून लोकप्रिय केले.

समाधी

  • प्रतापराव गुजर यांची समाधी कोल्हापूर जिल्ह्यातील नेसरी नावाच्या गावी (तालुका गडहिंग्लज) आहे.साचा:संदर्भ हवा

जन्मगावी त्यांचे काही स्मारक नाही. एका स्मारकाची सुरुवात भुईकोट किल्ला रूपाने सुरू झाली होती. परंतु ते काम अपूर्ण राहिले आहे. सध्या ते पडीक एक खंडहर अवस्थेत आहे.साचा:संदर्भ हवा

[२]

साचा:मराठा साम्राज्य