भातसा धरण

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट धरण

धरणाची माहिती

महाराष्ट्र राज्यातल्या ठाणे जिल्ह्याच्या शहापूर तालुक्यातील साजवली गावाजवळ बांधलेले आणि मुंबईस पाणीपुरवठा करणारे हे एक महत्त्वाचे धरण असून केवळ पाणीपुरवठाच नव्हे तर बहुउद्देशीय असा हा भातसा प्रकल्प आहे. हे धरण भातसाचोरणा या नद्यांच्या संगमावर बांधले आहे. चोरणा ही छोटी नदी भातसा नदीची उपनदी आहे. धरण शहापूर या गावापासून २० किलोमीटरवर आहे.

धरणाचे बांधकाम १९६९मध्ये सुरू झाले. सुरुवातीला कामाचा वेग संथ होता. जेव्हा काम सुरू झाले त्यावेळी १४ कोटी रुपये एवढाच खर्चाचा अंदाज होता. इ.स.१९७३पर्यंत कामाची गती फार कमी होती. तेव्हा पाटबंधारे खात्यामार्फत हे काम हाती घेण्यात आले. डिसेंबर १९८३पर्यंत हया प्रकल्पाचा खर्च ८० कोटी रुपयांवर तर १९९४-९५पर्यंत हा खर्च ३५८ कोटी रुपयांवर पोहचला. २००० सालापर्यंत काम पूर्णावस्थेला आले.

मुंबई शहराचा ५० टक्के(१३५ कोटी लिटर) पाणीपुरवठा भातसा धरणातून होतो. विहार, तानसा, आणि वैतरणा या धरणांतून उरलेले ५० टक्के पाणी उचलले जाते. महाराष्ट्रातील दगडी धरणांमध्ये भातसा धरण सर्वात उंच आहे.

बांधण्याचा प्रकार : दगडी बांधकाम
उंची  : ८९ मीटर (महाराष्ट्रात सर्वोच्च)
लांबी  : ९५९ मीटर
एकूण बांधकाम : ५,१८,००० घनमीटर
एकूण खोदकाम : ७०,५३० घनमीटर


दरवाजे

प्रकार : S - आकार
लांबी : ७२ मीटर
सर्वोच्च विसर्ग : ४६९२.२९ घनमीटर/सेकंद
संख्या व आकार : ५, ( १२ X ५ मी)

पाणीसाठा

चित्र:Bhatsa1.jpg
ओलिताखालील क्षेत्र

पाणलोट क्षेत्रफळ : ३८८.५०चौरस कि.मी.
धरणाचे क्षेत्रफळ  : २७.२५ चौरस कि.मी.
क्षमता  : ९७६.१० दशलक्ष घनमीटर
वापरण्यायोग्य क्षमता  : ९४२.१० दशलक्ष घनमीटर
ओलिताखालील क्षेत्र  : ३०७० हेक्टर

कालवा

डावा कालवा

लांबी  : ५४ कि.मी.
क्षमता  : १०.४३ घनमीटर/सेकंद

या कालव्याच्या वज्रेश्वरी, भिवंडी, तानसा, दिघाशी, उल्हास, कुंभारी अशा वेगवेगळया शाखा असून त्यांची एकूण लांबी ९१ किमी. आहे.

उजवा कालवा

लांबी  : ६७ कि.मी.
क्षमता  : २७.५२ घनमीटर/सेकंद

दोन्ही कालव्यांमुळे येणारे ओलिताखालील क्षेत्र  : ४८९१० हेक्टर
त्यांतली ओलिताखालील शेतजमीन  : २९३७८ हेक्टर

वीज उत्पादन

धरणाच्या जलाशयातून विमोचकाद्वारे नदीत सोडलेले पाणी पिसे येथे बंधारा बांधून त्यातील पाणी उदंचन पद्धतीने मूळ जलवाहिनीत सोडण्यात येते. उदंचन पद्धत ही या धरणाचे वैशिष्ट्य आहे. विद्युतनिर्मिती करून वारपलेले पाणी बोगद्याद्वारे पुन्हा नदीत सोडले जाते. हे सुद्धा या धरणाचे वैशिष्ट्य आहे. या धरणाच्या पायथ्याशी एक विद्युत गृह बांधले असून एका व्हर्टिकल जनरेटरच्या मदतीने ३६ घनमीटर प्रतिसेकंद इतके पाणी वापरून त्यापासून १५ मेगॅवॅट इतकी विद्युत निर्मिती केली जाते.


जलप्रपाताची उंची  : ८५.३० मीटर
जास्तीतजास्त विसर्ग  : २६.१८ क्यूमेक्स
निर्मिती क्षमता  : १५ मेगा वॅट
विद्युत जनित्र  : १ X १५ मेगा वॅट

साचा:महाराष्ट्रातील धरणे पहा : जिल्हावार नद्या