महाराष्ट्र भूषण पुरस्कार

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:विस्तार महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा महाराष्ट्र शासनाकडून देण्यात येणारा हा सर्वात मोठा पुरस्कार आहे. हा पुरस्कार खालील क्षेत्रांत केलेल्या विशेष योगदानासाठी दिला जातो :-

  • आरोग्यसेवा
  • उद्योग
  • कला
  • क्रीडा
  • पत्रकारिता
  • लोक प्रशासन
  • विज्ञान
  • समाजसेवा

निकष

सप्टेंबर, इ.स. २०१२ मध्ये महाराष्ट्र भूषणच्या निकषांमध्ये बदल करण्यात येऊन यापुढे हा पुरस्कार परप्रांतीय व्यक्तींनाही देण्यात येईल असे ठरवले गेले परंतु त्यासाठी त्या परप्रांतीय व्यक्तीचे महाराष्ट्रात किमान १५ वर्षे वास्तव्य असणे गरजेचे करण्यात आले.

स्वरुप

पुरस्कार विजेत्याला ₹ १० लाख रोख व प्रशस्तीपत्र दिले जाते. पूर्वी ५ लाख रुपये रोख आणि प्रशस्तीपत्र दिले जात होते परंतु सप्टेंबर, इ.स. २०१२ मध्ये महाराष्ट्र भूषणच्या निकषांमध्ये बदल करण्यात येऊन पुरस्काराची रक्कम ५ लाख रुपयांवरून १० लाख रुपये करण्यात आली.

सन्मानित व्यक्ती[१]

वर्ष नाव क्षेत्र
१९९६ पु. ल. देशपांडे साहित्य
१९९७ लता मंगेशकर कला, संगीत
१९९९ विजय भटकर विज्ञान
२००० सुनील गावसकर क्रीडा
२००१ सचिन तेंडुलकर क्रीडा
२००२ भीमसेन जोशी कला,संगीत
२००३ अभय बंग आणि राणी बंग समाजसेवा व आरोग्यसेवा
२००४ बाबा आमटे समाज सेवा
२००५ रघुनाथ अनंत माशेलकर विज्ञान
२००६ रतन टाटा उद्योग
२००७ रा.कृ. पाटील समाज सेवा
२००८ नानासाहेब धर्माधिकारी समाज सेवा
२००८ मंगेश पाडगावकर साहित्य
२००९ सुलोचना लाटकर कला, सिनेमा
२०१० जयंत नारळीकर विज्ञान
२०११ अनिल काकोडकर विज्ञान
२०१५ बाबासाहेब पुरंदरे इतिहासलेखन
२०१९ राम सुतार शिल्पकला
२०२१ आशा भोसले गायन

टिप: इ.स. २०१२, २०१३ व २०१४मध्ये हा पुरस्कार कोणालाही मिळाला दिला नाही.

आणखी संस्था

सरकारखेरीज याच नावाचा पुरस्कार देणाऱ्या आणखी काही संस्था आहेत. उदा० OBC-NT या राजकीय पक्षाने अनिलकुमार पालीवाल यांना महाराष्ट्रभूषण हा पुरस्कार दिला आहे.

डॉ. मोहन चव्हाण यांना दि. २१-१२-२०१४ रोजी महात्मा कबीर समता परिषदेतर्फे महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला.

पनवेल वेल्फेअर सोशल क्लबतर्फे युवा कलावंताला दिला जाणारा 'महाराष्ट्र भूषण पुरस्कार' युवा तबलावादक अविनाश पाटील यांना दिला. (एप्रिल २०१४) .