माधव श्रीहरी अणे
Appearance
लोकनायक बापुजी अणे उपाख्य माधव श्रीहरी अणे (ऑगस्ट २९,इ.स. १८८०-जानेवारी २६,इ.स. १९६८) हे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील नेते आणि स्वातंत्र्योत्तर भारत देशातील राजकारणी होते.ते जानेवारी १२,इ.स. १९४८ ते जून १४,इ.स. १९५२ या काळात बिहार राज्याचे राज्यपाल होते.
ते अपक्ष उमेदवार म्हणून इ.स. १९६२ आणि इ.स. १९६७च्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्र राज्यातील नागपूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.
त्यांच्या निवडक लेखांचे ‘अक्षरमाधव’ हे पुस्तक निघाले, तर ‘श्रीतिलकयशोर्णव’ या बापूजींनी रचलेल्या संस्कृत काव्यास साहित्य अकादमीचा पुरस्कार लाभला होता.[१]
बापूजी अणे हे पुसद येथील जंगल सत्याग्रहाशी संबंधित आहेत. 'बापूजी अणे अन् पिवळे दोन आणे' असे त्यावेळी म्हणत असत.