Deprecated: Caller from MediaWiki\Cache\LinkCache::fetchPageRow ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::selectOne ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Page\PageProps::getProperties ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385
रुक्मिणी - मराठीपिडिया Jump to content

रुक्मिणी

मराठीपिडिया कडून
नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही

रुक्मिणी ही कृष्णाची पत्नी होती. हिच्या पित्याचे नाव भीष्मक असून आईचे नाव शुद्धमती होते. भीष्मक विर्दभाचा राजा होता. देवी रुक्मिणीच्या मोठ्या भावाचे नाव सुभानदेव असे होते. रुक्मिणीस महाराष्ट्रात रखुमाई असेही म्हणतात. रुक्मिणीच्या नणंदा लक्ष्मी व सटवाई या देवता असुन त्या दोघी पांडुरंगाच्या सख्या बहिणी मानलेल्या आहेत.

जीवन[संपादन | स्रोत संपादित करा]

रुक्मिणीचे लग्न शिशुपालाशी होण्यापूर्वीच श्रीकृष्णाने तिला तिच्या इच्छेनुसार अंबामाता मंदिरातून पळवून नेले आणि तिच्याशी विवाह केला. पुढे त्यांना जो मुलगा झाला त्याचे नाव त्यांनी प्रद्युम्न असे ठेवले.

जेव्हा यादवांचा संहार झाला तेव्हा रुक्मिणीने अग्निप्रवेश करून आत्महत्या केली.

साहित्यातील उल्लेख[संपादन | स्रोत संपादित करा]

रुक्मिणीस्वयंवर या विषयावर अनेक काव्ये, नाटके आणि कादंबऱ्या लिहिल्या गेल्या आहेत. त्यांतील प्रमुख -

  • नरेंद्र कवी याने लिहिलेले रुक्मिणीस्वयंवर हे (अपूर्ण राहिलेले) काव्य. हे काव्य लिहून झाल्यावर देवगिरीचा उपान्य राजा रामदेवराय राजा याने हे काव्या त्याच्या नावाने प्रसिद्ध व्हावे अशी आज्ञा केली. नरेंद्रकवीला दरवडेखोराच्या हाती हे काव्य देणे अर्थात मान्य नव्हते. काव्यात काही सुधारणा करून ते काव्य दुसऱ्या दिवशी परत दरबारात आणतो असे सांगून नरेंद्रकवीने ताॆ बाड घरी नेले. तो आणि त्याचे दोन भाऊ यांनी रातोरात जागून काव्याची नक्कल करण्यास सुरुवात केली. पहाटेपर्यंत फक्त ९०० ओळी लिहून पूर्ण झाल्या. रामदेवरायाची माणसे आली आणि त्त्यांनी त्या मूळ काव्याची संपूर्ण प्रत ताब्यात घेतली आणि रामदेवरायराजाला नेऊन दिली. राजसत्तेच्या या पाशवी दर्शनाने नरेंद्रकवी राजसभेला विटला आणि तो महानुभाव पंथात दाखल झाला. त्या पंथाने ते काव्य सांकेतिक लिपीत लिहून प्रसिद्ध केले. कानामात्रेचाही फरक न झालेले या काव्याची लिखित प्रत इतिहासाचार्य वि.का. राजवाडे यांच्या हाती पडली. सांकेतिक लिपीचा उलगडा करून ते काव्य राजवाड्यांनी मराठीत आणले. हे ९०० ओळींचे अपुरे काव्य महानुभावपंथीय त्यांच्या पवित्र सात ग्रंथापैकी एक मानतात.

असे असले असले तरी, राजवाड्यांचा अनुवाद केवळ विद्वानांच्या उपयोगाचा आहे, मराठी सामान्य रसिक वाचक अजूनही मुळच्या महानुभावीय रसास्वादाला पारखे झाले आहेत.

हेही पहा[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:कॉमन्स वर्ग साचा:विस्तार