श्रीरामपूर

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

श्रीरामपूर तालुकासाचा:माहितीचौकट भारतीय शहर साचा:तालुका शहर श्रीरामपूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्याच्या श्रीरामपूर तालुक्याचे मुख्यालय असलेले शहर आहे. हे शहर अहमदनगर जिल्ह्यातील अहमदनगरच्या खालोखाल आकारमानाने दुसऱ्या क्रमांकाचे पण लहान शहर आहे.

साचा:बदल

भौगोलिक स्थान

श्रीरामपूर अहमदनगर जिल्ह्याच्या उत्तरेकडील भागात नगर शहरापासून ७० किमी अंतरावर आहे. शहराच्या उत्तरेस कोपरगाव, दक्षिणेस राहुरी, पूर्वेस नेवासा तर पश्चिमेस संगमनेर ही महत्त्वाची शहरे आहेत.

इतिहास

दौंड - मनमाड रेेल्वेमार्गाचे काम सुरू झाल्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील बेेलापूर गावाजवळ रेेेल्वे स्थानक बांधण्यात आले तसेच बेलापूरपासून १५ किमी अंतरावर असलेल्या हरेगाव येथे महाराष्ट्रातील पहिला सरकारी क्षेत्रातील साखर कारखाना बेलापूर शुगर इंडस्ट्रीज हा १९२० मध्ये सुरू झाला. या कारखान्यामध्ये उत्पादित होणा-या साखरेच्या वाहतुकीसाठी कारखान्यापासुन बेलापूर रेल्वे स्थानकापर्यंत एक नवी रेल्वेलाइन टाकण्यात आली. मालाची चढ उतार करणारे मजूर रेेेल्वे स्थानक परिसरात राहू लागले. इतरही काही व्यवसाय, दुकाने रेल्वे स्थानकाजवळ सुुरू झाले. हळूूूहळू त्या ठिकाणी नवीन गाव वसण्यास सुरुवात झाली. ते गाव म्हणजेच आजचे श्रीरामपूर शहर होय. १९४७ साली श्रीरामपूर नगरपालिकेची स्थापना करण्यात आली.

विशेष बाब - आज रेल्वेस्थानक हे श्रीरामपूर शहरातील मध्यवर्ती भागात आहे परंतु रेल्वेस्थानकाचे नाव आजही बेलापूर असेच आहे.

शहरातील सोईसुविधा

श्रीरामपूरचे टाऊन प्लॅनिंग उत्तम असून बस स्टॅन्ड आणि रेल्वे स्टेशन एकमेकांपासून दोन मिनिटांच्या अंतरावर आहेत. गावात उत्तम नागरी व्यवस्था, स्वच्छता आणि मुबलक पाणीपुरवठा असल्याने श्रीरामपूरच्या स्थानिकांचे जीवनमान चांगले आहे. शहरात अद्ययावत सोयींनी परिपूर्ण असे सरकारी व खाजगी दवाखाने आहेत. संत लूक हॉस्पिटल (जर्मन हॉस्पिटल), कामगार हॉस्पिटल ही शहरातील अनेक वर्षांपासून नावाजलेली रुग्णालये आहेत.

दळणवळण

शिर्डी - औरंगाबाद मार्ग हा श्रीरामपूर शहरातून जातो तसेच राज्यातील अनेक महत्त्वाच्या शहरांना श्रीरामपूर रस्ते मार्गाने जोडलेले आहे.

श्रीरामपूर हे दौंड - मनमाड रेल्वे मार्गावरील महत्त्वाचे स्थानक आहे. अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांना येथे थांबा आहे.

शेती

श्रीरामपूरचे हवामान हे उत्तम आहे व शेतीसाठी प्रवरा नदी व त्या वरील पाण्याचे योग्य नियोजन आहे. शेत जमीन सुपीक असल्यामुळे शेतकरी सुखी समाधानी आहे. ऊस व कांदा ही श्रीरामपूर परिसरातील प्रमुख पिके आहेत.

पर्यटन स्थळे

श्रीरामपूरजवळील खंडाळा गावात गणपतीचे अतिशय निसर्गरम्य परिसरात असलेले मंदिर आहे. बेेेेेेलापूर येेेेथील केेेेशव गोविंद बन हेदेखील शहरवासियांचे आवडते ठिकाण आहे.

साईबाबांची शिर्डी श्रीरामपूरहून अवघ्या ४० तेे ५० किमी अंतरावर आहे. श्री क्षेत्र देवगड हे श्रीरामपूरपासून साधारण ५५ किमी अंतरावर आहे.साचा:विस्तार

तसेच अशोकनगर फाट्यापासून जवळच वळदगाव-शिरसगाव शिवारात भव्य ११ एकर क्षेत्रावर लक्ष्मी अॅग्री ट्युरीझम हे पर्यटन केंद्र आहे अतिशय उत्तम केंद्र आहे

उल्लेखनीय व्यक्ती

१. अशोक तुपे

संदर्भ

साचा:संदर्भयादी

साचा:अहमदनगर जिल्हा