संथारा व्रत
Jump to navigation
Jump to search
संथारा व्रत हे एक व्रत असून जैन धर्मीय लोक ते करतात, त्यामध्ये अन्न आणि पाण्याचे ग्रहण अचानक कमी करत जाऊन शेवटी त्या दोन्हींचाही पूर्ण त्याग करणे अपेक्षित आहे. जे खरेतर भौतिक जगातील इच्छा संपल्याचे द्योतक म्हणून केले जाते. अन्न आणि पाण्याच्या अभावाने शेवटी व्रतस्थ माणसाचा मृत्यू होतो, आणि म्हणूनच ह्या व्रताला समाधी मरण किंवा संन्यास मरण असेही म्हणतात.