हरभजन सिंह

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट क्रिकेटपटू संपूर्ण माहिती हरभजन सिंह (जुलै ३, इ.स. १९८० - हयात) भारताकडून कसोटी व एक-दिवसीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. हरभजनसिंग उजखोरा फलंदाज व उजखोरा मंदगती गोलंदाज आहे.

सुरुवातीची वर्षे आणि वैयक्तिक आयुष्य

साचा:मट्रा हरभजन सिंह यांचा जन्म शीख कुटुंबात झाला. तो सारदार सार्देव सिंह प्लाहाचा एकुलता एक मुलगा आहे, जो बॉल बेअरिंग आणि झडप कारखाना मालकीचा व्यवसाय करणारा होता. पाच बहिणींसोबत वाढत असताना, हार्बजान कौटुंबिक व्यवसायाचा वारसा मिळवण्याच्या मार्गावर होता, परंतु वडिलांनी आपल्या क्रिकेट कारकिर्दीवर लक्ष केंद्रित करून भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा आग्रह धरला.

हार्बजान यांना त्यांचे पहिले प्रशिक्षक चारंजित सिंह बुल्लार यांनी फलंदाज म्हणून प्रशिक्षण दिले होते, परंतु कोचच्या अकाली मृत्यूने त्याला डेव्हिंदर अरोराच्या ताब्यात जाताना फिरकी गोलंदाजीमध्ये रुपांतर केले. अरोरा हर्बजानच्या यशाचे श्रेय एका कामाच्या नीतिमत्तेत जाते ज्यात सकाळी तीन तास प्रशिक्षण सत्र समाविष्ट होते, त्यानंतर दुपारचे सत्र सूर्यास्तानंतर दुपारी 3 वाजेपासून होते.

2000 मध्ये वडिलांच्या निधनानंतर, हरबजान हे कौटुंबिक प्रमुख झाले आणि २००३ पर्यंत त्याच्या तीन बहिणींसाठी विवाह आयोजित केले होते. २००२ मध्ये त्याने किमान २००३ पर्यंत स्वतःचे लग्न नाकारले. २००८ मध्ये त्याने पुन्हा बंगळुरू-आधारित वधूशी जोडणाe्या लग्नाच्या अफवांना दूर केले, तो फक्त "दोन वर्षानंतर" निर्णय घेईल असे सांगून, आणि तो आपल्या कुटूंबाने निवडलेल्या पंजाबी वधूचा शोध घेईल. [१]ज्या देशात क्रिकेटर्स मूर्तिपूजक आहेत, हार्बजानच्या कामगिरीमुळे त्यांना सरकारी प्रशंसा व आकर्षक प्रायोजकत्व मिळाले. २००१ मध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध केलेल्या कामगिरीनंतर पंजाब सरकारने त्याला 5 लाख, जमीन भूखंड आणि पंजाब पोलिसात पोलीस उपसभापती होण्याची ऑफर दिली, ज्याचे त्याने पालन केले नाही (स्वीकार).

कारकीर्द

साचा:बदल अगदी लहान वयात भारतीय संघात दाखल झालेल्या हरभजनच्या कारकिर्दीची सुरुवात विचित्र झाली. त्याच्या गोलंदाजीच्या शैलीवरून वादंग झाले आणि तो संघाबाहेर फेकला गेला. इ.स. २००१ मध्ये भारताच्या दौऱ्यावर स्टीव्ह वॉचा संघ आला होता. संघाचा प्रमुख फिरकी गोलंदाज अनिल कुंबळे खांद्याच्या दुखापतीने जायबंदी झाल्याने, कप्तान सौरव गांगुली चिंतेत पडला होता. ऑसी फलंदाज ऑफस्पिन गोलंदाजाला बिचकून खेळतात, याचा पक्का अभ्यास सौरवने केला असल्याने, त्याने हरभजनसिंगला संघात घेण्याकरता निवड समितीला साकडे घातले. निवड समितीने केवळ कप्तानाच्या आग्रहाखातर हरभजनला संघात घेतले. भारतीय संघाच्या कामगिरीला निर्णायक कलाटणी देणाऱ्या त्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत हरभजनने तब्बल ३२ बळी मिळवून कमाल केली. भारताने मालिका २-१ फरकाने जिंकली आणि हरभजनला मालिकेचा मानकरी ठरवण्यात आले.

इ.स. २००६ ते इ.स. २००८चा काळ हरभजनकरता निराशेचा ठरला. १३ कसोटी सामन्यांत जेमतेम ३७ बळी या काळात हरभजनला मिळवता आले. या काळात त्याला खराब कामगिरीमुळे संघाबाहेर पडावे लागले. इ.स. २००७ मध्ये इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघात हरभजन नव्हता; पहिल्या टी२० वर्ल्ड कपकरता निवड समितीने हरभजनला संघात परत आणले, तो क्षण मोलाचा ठरला. इ.स. २००८ मध्ये गॉल कसोटीत भारतीय संघाला विजयी करून देताना हरभजनने दोनही डावांत मिळून १० बळी मिळवले. चांगली कामगिरी करून हरभजनवर प्रकाशझोत पडला नाही, कारण सेहवागने त्या सामन्यात द्विशतकी खेळी केली होती.

गेल्या वर्षभरात हरभजनला आपल्या फलंदाजीच्या गुणवत्तेची अचानक जाण आली. चालू विंडीज मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यातील विजयात संघाला नितांत गरज असताना हरभजनच्या अर्धशतकी खेळीने कमाल साधली. मायदेशातील मालिकेत न्यू झीलंडविरुद्ध हरभजनने लागोपाठच्या दोन कसोटी सामन्यांत शतके झळकावून संघातील सहकाऱ्यांना चकित केले. इ.स. २०११ वर्ल्ड कपच्या यशात हरभजनसिंगच्या नावासमोर भरपूर बळी नसल्याने, त्याच्यावर टीका केली गेली. प्रत्यक्षात समोरच्या संघातील खेळाडूंनी विचारपूर्वक हरभजनच्या गोलंदाजीचा धोका न पत्करता, नुसते खेळून काढण्याचा निर्णय घेतला होता. हरभजनच्या नावासमोर जास्त बळी नसले तरी त्याने आपल्या १० षटकांत खूप कमी धावा दिल्या आहेत, तसेच पॉवर प्लेच्या महत्त्वाच्या षटकात टिच्चून गोलंदाजी केली आहे. ४०० बळींचा टप्पा पार केल्यावर बोलताना माझ्यात अजून भरपूर क्रिकेट बाकी आहे, असे त्याने बोलून दाखवले आहे. तंदुरुस्ती टिकवून पुढचा वर्ल्ड कप खेळायचा हरभजनचा निग्रह आहे.

भारतातील सर्वांत चांगला ऑफस्पिन गोलंदाज कोण, या प्रश्‍नाला उत्तर देताना बिशनसिंग बेदी यांनी, वीरेंद्र सेहवाग भारतातील सर्वांत चांगला ऑफस्पिन गोलंदाज असल्याचे सांगितले.साचा:संदर्भ हवा

डो मनिका कसोटी सामन्यादरम्यान हरभजन सिंगने ४०० कसोटी बळींचा टप्पा पार केला. असे अचाट काम करणारा तो फक्त तिसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. अनिल कुंबळे ६१९ बळी आणि कपिल देव ४३२ बळी हे दोनच भारतीय गोलंदाज हरभजनच्या पुढे आहेत. इ.स. २००१ मध्ये अनिल कुंबळेच्या अनुपस्थितीत बलाढ्य ऑसी संघाला पराभूत करण्यात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या हरभजनने गेल्या दहा वर्षांत भारतीय संघाकरता भरपूर कष्ट केले आहेत.

निवृत्ती

24 डिसेंबर 2021 रोजी हरभजन सिंगने २३ वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीला निरोप दिला. साचा:भारतीय संघ - क्रिकेट विश्वचषक, २०११ साचा:भारतीय संघ - क्रिकेट विश्वचषक, २००७ साचा:मुंबई इंडियन्स संघ २००८ साचा:मुंबई इंडियन्स संघ २०१० २०-२० चँपियन्स लीग

संदर्भ