भारती कृष्ण तीर्थ कृत गणित लेखन

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:हा लेख भारती कृष्ण तीर्थ (१८८४ ते १९६०) जगन्नाथपुरी पीठाचे शंकराचार्य होते. इतर विषयांसोबत त्यांनी गणित या विषयातही एम.ए. केले होते. त्यांनी काही रोचक युक्त्यांवर आधारलेले हे अंकगणित विषयक लेखन अथर्व वेदाचा आधार असल्याचे सांगत, वैदिक गणित नावाने प्रस्तुत केले गेले. आणि लेखकाच्या मरणोपरान्त ते त्याच नावाने प्रकाशित आणि प्रचलित झाले.

प्रा. एस. जी. दाणी यांच्या साधार मतांनुसार भारती कृष्ण तीर्थ कृत यांतील गुणाकार-भागाकाराच्या गणित विषयक युक्त्या रोचक असल्या तरीही प्रत्यक्षात वेदांवर अथवा प्राचीन भारतीय गणितावर नव्हे तर सामान्य अंक-बीजगणितावर आधारलेल्या आहेत. [१]

वैदिक गणित हे वेदांतून मांडले गेले आहे असा अपप्रचार काहीजण करतात, पण वस्तुस्थिती तशी नाही. हे वैदिक तर नाहीच पण गणितही नाही, असे बहुतेक गणितज्ञांचे मत आहे.[२]साचा:पोकळी असे असले तरी काही शाळांत मुलांना हे तथाकथित 'वैदिक गणित' शिकवतात.

हे ही पहा

संदर्भ

  1. http://mandhataglobal.com/wp-content/custom/articles/MythsandRealityVedicMathematics.pdf Myths and reality : On ‘Vedic mathematics’ S.G. Dani School of Mathematics updated version of the 2-part article in Frontline, 22 October and 5 November 1993) mandhataglobal संकेतस्थळावरील pdf आवृत्ती दिनांक १४ मे २०१७ रोजी सकाळी ९ वाजता जशी पाहिली
  2. http://mandhataglobal.com/wp-content/custom/articles/MythsandRealityVedicMathematics.pdf