रत्नागिरी जिल्हा
साचा:जिल्हा सूचना साचा:माहितीचौकट भारतीय जिल्हा
रत्नागिरी जिल्हा भारत देशातील महाराष्ट्र राज्याच्या ३६ जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. या जिल्ह्याच्या पश्चिमेस अरबी समुद्र, दक्षिणेस सिंधुदुर्ग जिल्हा, पूर्वेस सातारा जिल्हा, कोल्हापूर जिल्हा व सांगली जिल्हा तर उत्तरेस रायगड जिल्हा (जुने नाव कुलाबा जिल्हा) आहे. रत्नागिरी शहर हे या जिल्ह्याचे मुख्यालय आहे. या जिल्ह्याची शहरी लोकसंख्या ११.३३% इतकी आहे.
हल्लीचा रत्नागिरी जिल्हा हा ब्रिटिश काळात आणि नंतरही उत्तर रत्नागिरी जिल्हा म्हणून ओळखला जात होता. हल्लीच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला दक्षिण रत्नागिरी जिल्हा म्हणत. दक्षिण रत्नागिरी जिल्ह्यात सावंतवाडी या संस्थानाचाही समावेश होता. सन १९८१ साली या जिल्ह्यांची नावे बदलली.
भूगोल
रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमा
- पश्चिमेस अरबी समुद्र
- दक्षिणेस सिंधुदुर्ग जिल्हा
- पूर्वेस सातारा जिल्हा व सांगली जिल्हा व कोल्हापूर जिल्हा
- उत्तरेस रायगड जिल्हा
रत्नागिरी जिल्ह्यातील तालुकानिहाय नद्या
काजळी, केव, गड, बोर, मुचकुंदी, वाशिष्टी, शास्त्री, सावित्री,जगबुडी
तालुके
रत्नागिरी जिल्ह्यात खालील तालुके समाविष्ट आहेत:
दळणवळण
रत्नागिरी ते कोल्हापूर (राष्ट्रीय महामार्ग २०४)
मुंबई ते कोचीन (राष्ट्रीय महामार्ग 66)
प्रेक्षणीय स्थळे
- आंबडवे
- गणपतीपुळे
- गणेशगुळे
- गुहागर
- चिपळूण
- जयगड
- नाणीज
- पावस
- पूर्णगड
- माचाळ
- मार्लेश्वर
- रत्नागिरी (शहर)
- शेरीवली
- संगमेश्वर
- रसाळगड
- महिपतगड
रत्नागिरी जिह्यातील गड-किल्ले
१. आंबोळगड
२. गोपाळगड
३. गोविंदगड
४. जंगली जयगड
५. जयगड
६. पालगड
७. पूर्णगड
8. भवानीगड
9. महिपतगड
१0. महीमंडणगड
११. यशवंतगड
१२. रत्नदुर्ग
१३. रसाळगड
१४. विजयगड
१५. सुवर्णदुर्ग
शेती
रत्नागिरी जिल्हा हापूस आंब्यांसाठी जगप्रसिद्ध आहे. आंब्याप्रमाणेच काजू, नारळ, फणस, आमसूल(रातांबा) इत्यादींची लागवड येथे केली जाते. तांदळाची शेती येथे प्रामुख्याने केली जाते
डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ,दापोली (स्थापना ;१८ मे १९७२ ) रत्नागिरी जिल्हा एक निसर्गरम्य व पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जातो जिल्ह्याला लाभलेला समुद्रकिनारा व आजूबाजूची निसर्गरुपी डोंगररांग आहे त्याच्यामुळे रत्नागिरी येथे पर्यटक संपूर्ण जगातून येत असतात.
राजकीय संरचना
लोकसभा मतदारसंघ (१) : रत्नागिरी-सिंधुदुर्ग.
विधानसभा मतदारसंघ (५) : दापोली, गुहागर, चिपळूण, रत्नागिरी व राजापूर.
रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध व्यक्ती
- महर्षी धोंडो केशव कर्वे
- महामहोपाध्याय पां वा. काणे
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
- लोकमान्य बाळ गंगाधर टिळक
- भागोजी कीर (यांच्या नावाचा रस्ता मुंबईत माहीम येथे आहे.)
- विनायक दामोदर सावरकर
- अनंत लक्ष्मण कान्हेरे
संदर्भ
साचा:महाराष्ट्रातील जिल्हे साचा:रत्नागिरी जिल्ह्यातील तालुके