रथसप्तमी
रथसप्तमी हा दिवस माघ शुद्ध सप्तमी या दिवशी साजरा केला जातो.[१][२] या सप्तमीला अचला सप्तमी असेही म्हटले जाते.[३][४] आरोग्य सप्तमी, अर्क सप्तमी,माघी सप्तमी अशीही या दिवसाला अन्य नावे आहेत.[५]
स्वरूप
हिंदू धर्मीयांच्या मते रथसप्तमी हा सूर्याच्या उपासनेचा दिवस आहे.[६]भविष्य पुराणात असा उल्लेख सापडतो[७] अदिती आणि कश्यप यांचा पुत्र सूर्य याचा हा जन्मदिवस आहे असे मानले जाते.[३] या दिवशी भक्त सकाळी सूर्योदयापूर्वी स्नान करतो.. लाल फुले, चंदन, कापूर अर्पण करून छोट्या कलशातून सूर्याला अर्घ्य देतो. अशा पूजने समृद्धी प्राप्त होते असा संकेत रूढ आहे.[३] सात घोडे आणि सारथी अरुण यांसह सूर्याची पूजा करताना सूर्याची सोन्याची प्रतिमा रथात ठेवतात.[८]तुळशी वृंदावनाच्या समोर रथ आणि सूर्य यांची रांगोळी काढतात. या दिवशी अंगणात मातीच्या एका छोट्या बोळक्यात दूध ठेवून ते उकळवून आटवतात व सूर्याला खिरीचा नैवेद्य दाखवतात. [९]या दिवसाचे व्रत म्हणून महत्त्व असल्याने या दिवशी उपवासही केला जातो.[१०] [११] महाराष्ट्रात मकरसंक्रातीला सुरू झालेले स्त्रियांचे तिळगुळाचे व हळदीकुंकवाचे दैनंदिन समारंभ रथसप्तमीच्या दिवशी संपतात. रथसप्तमी ही वसंत पंचमीनंतर दोन/तीन दिवसांनी येते.
या दिवशी दिलेले दान विशेष लाभदायी मानले जाते.[१२]
भारताच्या विविध प्रांतांत
- कोणार्क -
कोणार्क येथील सूर्य मंदिरात या दिवशी सूर्य नारायणाचा जन्मोत्सव साजरा होतो. मंदिरात येणाऱ्या भाविकांच्या सुविधेसाठी मंदिर आणि प्रशासन यांच्यातर्फे व्यवस्था उपलब्ध करून दिल्या जातात.[१३]
- दक्षिण भारत- वसंत ऋतूच्या आगमनाचा हा सण दक्षिण भारतातही उत्साहाने साजरा केला जातो. संस्कृतीच्या दृष्टीनेही या दिवसाचे विशेष महत्त्व आहे.[१४] या दिवशी सूर्यपूजन केले जाते.[१५][१६]
मलियप्पा मंदिरात रथयात्रा आयोजित केली जाते. विविध वाहने तयार केली जातात आणि त्यातून देवांची मिरवणूक या दिवशी काढली जाते. या पुण्य पर्वासाठी तीर्थक्षेत्री भाविक गोळा होतात.[१७]
दक्षिण भारतात समुद्राच्या किनारी असलेल्या गावांमध्ये या दिवशी "ब्रह्मोत्सव " साजरा होतो. रथयात्रा काढली जाते.[१८]
तिरुपती येथील बालाजी मंदिरात हा दिवस विशेष उत्साहाने साजरा केला जातो.[१९] या दिवशी तिरुपती येथे सूर्य जयंती उत्सव साजरा करण्याची पद्धती अनेक शतके सुरू आहे असे मानले जाते.[२०] बिहार, झारखंड, ओरिसा अशा भारतातील विविध प्रांतांत हा दिवस उत्साहाने साजरा केला जातो.[२१]
वैदिक देवता
सूर्याची उपासना ही वैदिक साहित्यात दिसून येते.[२२] गायत्री मंत्र म्हणजेच सविता ( सूर्य) या देवतेचा गायत्री छंदातील मंत्र आहे. सूर्य उपासनेचे प्राचीन संदर्भ आपल्याला अशाप्रकारे वैदिक साहित्यात दिसून येतात.[२३]
अन्य महत्त्व
याच दिवशी नर्मदा जयंती असते.[२४]यानिमित्ताने अमरकंटक येथे मोठी यात्रा भरते.[२५]
हे ही पहा
संदर्भ
- ↑ साचा:स्रोत पुस्तक
- ↑ साचा:स्रोत पुस्तक
- ↑ ३.० ३.१ ३.२ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:स्रोत पुस्तक
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:स्रोत पुस्तक
- ↑ साचा:स्रोत पुस्तक
- ↑ साचा:स्रोत पुस्तक
- ↑ साचा:स्रोत पुस्तक
- ↑ साचा:स्रोत पुस्तक
- ↑ साचा:स्रोत पुस्तक
- ↑ साचा:स्रोत पुस्तक
- ↑ साचा:स्रोत बातमी
- ↑ साचा:स्रोत पुस्तक
- ↑ साचा:स्रोत पुस्तक
- ↑ साचा:स्रोत पुस्तक
- ↑ साचा:स्रोत बातमी
- ↑ साचा:स्रोत पुस्तक
- ↑ साचा:स्रोत पुस्तक
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:स्रोत पुस्तक
- ↑ साचा:स्रोत पुस्तक
- ↑ साचा:स्रोत पुस्तक
- ↑ साचा:स्रोत पुस्तक