अरुण बालकृष्ण कोलटकर
Appearance
साचा:माहितीचौकट साहित्यिक अरुण बालकृष्ण कोलटकर (नोव्हेंबर १, १९३२ - सप्टेंबर २५, २००४) हे मराठी, हिंदी, व इंग्रजी भाषांत कविता करणारे भारतीय कवी होते.
परिचय[संपादन | स्रोत संपादित करा]
कोलटकरांचा जन्म कोल्हापुरात झाला. त्यांचे शालेय शिक्षण तेथील राजाराम माध्यमिक विद्यालयात झाले. मुंबईच्या सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्सचे पदवीधारक असलेले कोलटकर एक उत्तम ग्राफिक्स डिझायनर व जाहिरात क्षेत्रातील अत्यंत यशस्वी कलादिग्दर्शक होते. १९५०–१९६० च्या दशकांत त्यानी लिहिलेल्या कविता या मुंबईतील विशिष्ठ बोली मराठीतल्या असून त्यात मुंबईत आलेल्या निर्वासितांच्या व गुन्हेगारांच्या जीवनाचे दर्शन घडते. उदाहरणार्थ, मै भाभीको बोला / क्या भाईसाबके ड्यूटीपे मै आ जाऊ? / भड़क गयी साली / रहमान बोला गोली चलाऊॅंगा / मै बोला एक रंडीके वास्ते? / चलाव गोली गांडू.[१]
प्रकाशित काव्यसंग्रह[संपादन | स्रोत संपादित करा]
मराठी[संपादन | स्रोत संपादित करा]
- अरुण कोलटकरच्या कविता (१९७७)
- चिरीमिरी (२००४)
- द्रोण (२००४)
- भिजकी वही (२००४)
- अरुण कोलट्करच्या चार कविता
इंग्रजी[संपादन | स्रोत संपादित करा]
- कलेक्टेड पोएम्स इ्न इंग्लिश
- जेजुरी
- काळा घोडा पोएम्स
- द बोटराईड ॲन्ड अदर पोएम्स
- सर्पसत्र
पुरस्कार[संपादन | स्रोत संपादित करा]
- २००५चा साहित्य अकादमी पुरस्कार
- कुसुमाग्रज पुरस्कार
- २००५चा बहिणाबाई पुरस्कार
- १९७६चा राष्ट्रकुल काव्य पुरस्कार
इतर[संपादन | स्रोत संपादित करा]
- अरुण कोलटकर हे ’शब्द’ या लघु नियतकालिकाचे रमेश समर्थ व दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांच्याबरोबर सहसंपादक होते.
बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]
साचा:मराठी साहित्यिक साचा:मराठी कवी
- ↑ अरुण कोलटकर : पहिल्या कविता, लेख, समीक्षेचा अंतःस्वर. देवानंद सोनटक्के पद्मगंधा प्रकाशन पुणे, २०१२