औरंगाबाद जिल्हा
साचा:हा लेख साचा:माहितीचौकट भारतीय जिल्हा
साचा:जिल्हा सूचना औरंगाबाद जिल्हा महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा विभागातील महत्त्वाचा जिल्हा आहे. औरंगाबाद शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहे.
जगप्रसिद्ध अजंठा-वेरूळ लेणी, बीबी का मकबरा( पानचक्की),(थत्तहोद) दौलताबाद तालुक्यातील देवगिरी(दौलताबाद) किल्ला याच जिल्ह्यात आहेत. औरंगाबाद जिल्हा हा भारताच्या एकमेव जिल्हा आहे ज्यात २ जगप्रसिद्ध जागतिक वारसास्थळ (अजिंठा लेणी व वेरूळ लेण्या) आहेत.साचा:संदर्भ हवा जिल्ह्यातील पैठण हे ऐतिहासिक शहर पैठणी साड्यांसाठी प्रसिद्ध आहे. हिमरू शाल ही प्रसिद्ध आहे . मुहम्मद तुघलकाने औरंगाबाद येथील दौलताबादेत आपली राजधानी वसवली होती (या मुळे औरंगाबाद हे एकेकाळी भारताची राजधानी होती असे म्हणण्यास हरकत नाही) आणि औरंगजेबाचे वास्तव्य तिथे अधिक काळ होते.[१].
जिल्ह्याचे क्षेत्रफळ १०१०० चौ.कि.मी असून लोकसंख्या २८,९७,०१३ (२००१ जनगणना) इतकी आहे. शहरी भागात छावणी तर ग्रामीण भागात लासूर ही मोठी बाजारपेठ आहे. लासूर येथे देवो दाक्षायणी मातेचे मोठे मंदिर आहे. जिल्ह्यातील प्रमुख पीके - कापूस, बाजरी, मका, तूर, मूग, ज्वारी, गहू जिल्ह्यातील प्रमुख नद्या- गोदावरी, तापी, पूर्णा.
औरंगाबाद जिल्ह्यातील टेकड्या - म्हैसमाळ, शुलीभंजन, भेंडाळा, सीतापुरी, सारोळा, गौताळा, अजिंठा, गोगाबाबा टेकडी अशा आठ टेकड्या.
हवामान
जिल्ह्यातील पर्यटनस्थळे
- बिडकीन बाजार(विशेष बाजार तळात बारव आहे.)
- अजंठा- वेरूळ लेण्या-५व्या-८व्या शतकात गुफेत साकारलेल्या लेण्या,
- दौलताबाद किल्ला-तुघलकाची राजधानी ,
- खुलताबाद- मोगल औरंगजेबाची कबर,
- बीबी का मकबरा- बेगम राबीया (औरंगजेबाच्या पत्नीची) कबर,
- घृष्णेश्वर मंदीर- बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक,
- पानचक्की,
- पैठण- संत एकनाथ यांचे गाव, http://santeknath.org/paithan.html
- जायकवाडी धरण- नाथसागरम,
- औरंगाबाद गुफा
हे सुद्धा पहा
जिल्ह्यातील तालुके
- खुलताबाद तालुका
- औरंगाबाद
- सोयगांव तालुका
- सिल्लोड तालुका
- गंगापुर तालुका
- कन्नड तालुका
- फुलंब्री तालुका
- पैठण तालुका
- वैजापूर तालुका