राजरत्न आंबेडकर

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट चळवळ चरित्र राजरत्न अशोक आंबेडकर ( ८ डिसेंबर १९८२) हे एक भारतीय सामाजिक व धार्मिक कार्यकर्ता, आणि राजकारणी आहेत. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चुलत पणतू आहेत. ते सध्या भारतीय बौद्ध महासभा या संघटनेचे अध्यक्ष आहेत, आणि या माध्यमातून ते बौद्ध धर्माच्या प्रचाराचे व प्रसाराचे काम करतात.

वैयक्तिक जीवन

साचा:मुख्य राजरत्न आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाऊ आनंदराव यांचे पणतू, मुकुंदराव आंबेडकर (बाबासाहेबांचे पुतणे) यांचे नातू तर अशोक आंबेडकर यांचे पुत्र होत.[१]

शिक्षण

राजरत्न हे उच्चविद्याविभूषित आहेत. सन २००३ मध्ये मुंबई विद्यापीठातून ते बी.कॉम. झाले, सन २००८ इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड ॲंन्ड फायनन्शल अकाउंटंडंट ऑफ इंडिया - देहरादून विद्यापीठातून ते डी.बी.एम. झाले, आयसीएफएआय विद्यापीठातून सन २००८ मध्ये एडीएम व सन २०१० मध्ये एमबीए झाले. व्यवस्थापनात ॲडव्हान्स्ड पदविका, एमबीएपर्यंत शिकलेले आहेत. त्यांनी कंपनी सेक्रेटरी म्हणून एका कंपनीत उच्च पदावर काम केलेले आहे. नोकरीत असताना त्यांचे मन रमत नव्हते. अखेर त्यांनी धम्माला शरण जाण्याचा निर्णय घेतला.[२][३]

धार्मिक कारकीर्द

भारतीय बौद्ध महासभा किंवा बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ही ४ मे १९५५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सुरू केलेली एक भारतातील राष्ट्रीय स्तरावरील बौद्ध संघटना आहे.[४][५][६] याचे मुख्यालय मुंबई मध्ये असून सध्या या संघटनेचे चौथे व सध्याचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून राजरत्न आंबेडकर कार्य करत आहेत.[७] ही संघटना आंतरष्ट्रीय बौद्ध संघटना वर्ल्ड फिलोशिप ऑफ बुद्धिस्ट्सची सदस्य आहे.[८][९][१०]

२३ सप्टेंबर २०१५ रोजी, राजरत्न आंबेडकर यांनी नागपुर येथील इंदोरा बुद्धविहारात भदन्त आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्याद्वारे श्रामणेर दीक्षा ग्रहन केली होती. त्यानंतर त्यांचे "धम्म आंबेडकर" असे नामकरण करण्यात आले होते. राजरत्न यांनी यासाठी २३ सप्टेंबर या दिवसाची निवड केली होती कारण या तारखेलाच बाबासाहेबांना गुजरात (संकल्प भूमी) येथे अस्पृश्यतेबद्दल फार त्रास सहन करावा लागला होता. भारताला बौद्धमय करण्याचे स्वप्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बघितले होते. ते पूर्ण करण्यासाठी त्यांनी बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार करण्याचा निर्णय घेतला.[३][११]

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 'बौद्ध' म्हणून बौद्ध धम्माची दीक्षा घेत जातींच्या दलदलीतून समाजाला बाहेर काढले. त्यामुळे बौद्धांनी परत स्वतःसाठी 'दलित' व 'नवबौद्ध' यासारखे शब्दप्रयोग करू नये, असे राजरत्न आंबेडकरांचे मत आहे. यापूर्वी असे मत यशवंत आंबेडकर यांनीही मांडले होते.[१२]

राजकीय कारकीर्द

राजरत्न आंबेडकर तीन वेळा निवडणूक लढले आहेत. सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये, नांदेड लोकसभा मतदारसंघात बहुजन मुक्ती पार्टीचे उमेदवार म्हणून राजरत्न आंबेडकर लढले आहेत, मात्र त्यांना तृतीत क्रमांकाची मते मिळाली, व प्रथम स्थानी असलेले अशोक चव्हाण विजयी झाले.[२][१३][१४][१५]

हे सुद्धा पहा

संदर्भ

साचा:संदर्भयादी

बाह्य दुवे

साचा:डॉ. बाबासाहेब आंबेडकर