वाशिम जिल्हा
वाशीम भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा आहे. हा जिल्हा जुलै १ १९९८ रोजी स्थापन झाला. जिल्ह्याची लोकसंख्या १०,२०,२१६ इतकी आहे. वाशीम जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय वाशीम शहर आहे. ही वाकाटकांची राजधानी होती. वाशीम शहराचे प्राचीन नाव वत्सगुल्म आहे. जिल्ह्यातील मुख्य पिके- सोयाबीन, गहू, ज्वारी, बाजरी, तूर व कापूस,ऊस,हळद ही आहेत.
जिल्ह्यातील तालुके
जिल्ह्यातील पर्यटनस्थळे- (नेतंसा येथील)राज्या रामचंद्र यांनी स्थापित केलेले काच नदीवरील प्रभु शंकराचे मंदिर अकदी निसर्गरम्य आहे.
श्री संत अमरदास बाबा मंदिर ऋषीवट (रिसोड), श्री पिंगळाशी देवी (रिसोड),श्री सितला मंदिर (रिसोड),आप्पास्वामी मंदिर (रिसोड), बालाजी मंदिर (वाशीम), श्री रेणुकामाता देवाळा, श्री मध्यमेश्वर मंदिर, श्री क्षेत्र पोहरादेवी, पद्मतीर्थ शिवमंदिर, गणपती मंदिर हिवरा (नवसाचा गणपती) नृसिंह सरस्वती मंदिर (कारंजा), सखाराम महाराज मंदिर (लोणी), चामुंडा देवी वाशिम, गोंदेश्वर बालाजी मंदिर वाशिम,श्री जानगीर महाराज संस्थान शिरपूर जैन (मालेगाव), जैन मंदिर शिरपूर जैन (मालेगाव)
{तालुक्यातील धार्मिक स्थळे}
कारंजा: गुरूमंदिर,जैन मंदिर,राम मंदिर रिसोड: श्री सितला मंदिर
भूगोल
वाशीम जिल्हाच्या पूर्वेस यवतमाळ, उत्तरेस अकोला, ईशान्येस अमरावती, पश्चिमेस बुलढाणा आणि दक्षिणेस हिंगोली हे जिल्हे आहेत. पैनगंगा ही जिल्ह्यातील मुख्य नदी आहे. कास ही तिची मुख्य उपनदी आहे. कास नदी पैनगंगेस मसला पेन या गावा जवळ मिळते. अडाण नदी वाशीम तालुक्यात उगम पावते आणि मंगरुळपीर व मानोरा तालुक्यातून वाहते. वाशीम हे खांडवा-पूर्णा रेल्वेमार्गावरील एक स्थानक आहे.
साहित्य - संस्कृती
वाशिम जिल्ह्यातील अनेक प्रतिभावंतानी विविध क्षेत्रात वाशीम जिल्ह्याचे नाव लौकिक केले असून साहित्य व संस्कृतीचा त्याला एक समृद्ध वारसा लाभला. साहित्य क्षेत्रात बाबाराव मुसळे , नारायण कुलकर्णी कवठेकर , नामदेव कांबळे , एकनाथ पवार , शेषराव धांडे, चाफेश्वर गांगवे अशा अनेक कवी, साहित्यिकांची नामावली आहे.